शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

उत्तर प्रदेशच्या तीन साधूंवर जमावाकडून संशयातून हल्ला, पश्चिम बंगालमधील पुरुलिया येथील खळबळजनक प्रकार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2024 09:33 IST

ही घटना गुरुवार, ११ जानेवारीला घडल्याचे सांगण्यात येत आहे.

कोलकाता : पश्चिम बंगालच्या पुरुलिया जिल्ह्यात उत्तर प्रदेशातील तीन साधूंवर जमावाने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. हे साधू मकर संक्रांतीनिमित्त गंगासागरला चालले होते. त्यांच्या भाषेमुळे गफलत झाल्याने ते मुले पळविणाऱ्या टोळीतील असल्याचा संशय लोकांना आला. त्यातून ही घटना घडली, असे पोलिसांनी सांगितले.

ही घटना गुरुवार, ११ जानेवारीला घडल्याचे सांगण्यात येत आहे. पुरुलियाचे पोलिस अधीक्षक अविजीत बॅनर्जी यांनी सांगितले की, हे साधू भाड्याच्या बोलेरो गाडीतून चालले होते. गौरांगडीतील काली मंदिराजवळ त्यांनी  तीन मुलींना रस्ता विचारला. तथापि, भाषा भिन्नतेमुळे मुलींना वाटले की ते आपला पाठलाग करीत आहेत. 

पालघरची पुनरावृत्ती, भाजपचा आरोपभाजप प्रवक्ता शहजाद पुनावाला यांनी सांगितले की, ही घटना पालघर भाग-२ आहे. महाराष्ट्रातील पालघरमध्येच अशीच घटना घडली होती. पश्चिम बंगालच्या मंत्री तथा तृणमूल नेत्या शशी पांजा यांनी सांगितले की, तीन मुलींना पळविण्याचा प्रयत्न केल्याच्या संशयावरून हा प्रकार झाला आहे. भाजप घटनेला चुकीचे वळण देत आहे.

मुलीनी आरडाओरडा केला. त्यामुळे स्थानिक लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या गाडीची तोडफोड केली. पोलिसांनी साधूंना वाचविले. या प्रकरणी १२ हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगाल