शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

भारताचे तीन रॉ एजंट अटकेत, जाधव प्रकरणातून लक्ष हटवण्यासाठी पाकचा नवा डाव

By admin | Updated: April 15, 2017 11:15 IST

पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधून तीन भारतीय रॉ एजंट्सला अटक केल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे

ऑनलाइन लोकमत
अब्बासपूर, दि. 15 - पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधून तीन भारतीय रॉ एजंट्सला अटक केल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर भारत - पाकिस्तानमधील संबंध ताणले जात असतानाच ही बातमी आली आहे. जाधव प्रकरणावरुन लक्ष भरकटवण्याच्या हेतून पाकिस्तानने हा नवा डाव खेळल्याची शक्यता आहे. दुसरीकडे भारताने कडक पाऊल उचलत पाकिस्तानसोबत सर्व द्विपक्षीय चर्चांवर स्थगिती आणली आहे. 
 
 पाकिस्तानधील वृत्तपत्र डॉनने दिलेल्या वृत्तानुसार या सर्वांवर एका पोलीस ठाण्यात स्फोट करण्यासोबत राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये सामील होण्याचा आरोप आहे. खालाकोट येथे पोलिसांनी या सर्वांना तोंडावर कपडा बांधून प्रसारमाध्यमांसमोर हजर केलं. मोहम्मद खलील, इम्तियाज आणि रशीद अशी त्यांची नावे आहेत. हे सर्व अब्बासपूरच्या टरोटी गावाचे रहिवासी असल्याचं सांगण्यात आलं आहे. यामधील दोघांचं वय 30 ते 35 तर तिस-याचं वय 20 ते 25 वर्ष असल्याचं पोलीस सांगत आहेत. 
 
खलील हा मुख्य संशयित असल्याचं पुंछचे पोलीस उप अधीक्षक साजिद इमरान यांनी सांगितलं आहे. पाकिस्तानने केलेल्या दाव्यानुसार नोव्हेंबर 2014 मध्ये आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी तो भारतातून बंदी चेचिया गावी आला होता. येथे त्याचा संपर्क काही रॉ एजंट्सशी झाला, ज्यांनी त्याला भूलथापा देत आपल्यासोबत काम करण्यासाठी तयार केलं. खलीलला वाहतूक परवाना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. परतल्यानंतर आपल्याच गावातील इम्तियाज आणि रशीदला आपल्यासोबत काम केल्यास चांगले पैसे मिळतील सांगत तयार केलं. अब्बासपूर सेक्टरमध्ये जवळपास 14 ते 15 वेळा नियंत्रण रेषा पार केल्याची माहिती खलीलने दिल्याचं पोलीस सांगत आहेत. तसंच त्याच्या साथीदारांनी पाच ते सहा वेळा सीमारेषा पार केली आहे. 
 
खलील आपल्यासोबत सिगारेट आणि मोबाईल सीम कार्ड ज्यामध्ये पूल, मशीद, लष्कर आणि पोलिसांशी संबंधित फोटो होते, घेऊन जात असे असं पोलीस उप अधीक्षक साजिद इमरान सांगतात. त्यांच्याकडे दोन सीम कार्ड सापडले आहेत जे त्याच्या नावे रजिस्टर होते. या सीमकार्डवरुन तो भारतीय अधिका-यांशी संपर्क साधत होता. पैशांशिवाय भारतीय मद्यदेखील तो घेऊन येत होता ज्याची विक्री तो करत असे असंही पोलीस सांगत आहेत.
 
गतवर्षी 27 डिसेंबर रोजी अब्बासपूर पोलीस स्थानकाच्या बाहेर झालेल्या स्फोटात यांनी आईडीचा वापर केला होता. जे त्यांनी सीमारेषेपलीकडून म्हणजेच भारतातून आणलं होतं असा दावा साजिद इमरान यांनी केली आहे. खलीलला कोणत्याही कायदा अंमलबजावणी कार्यालयाबाहेर स्फोट घडवून आणण्यासाठी पाच लाखांची ऑफर दिली गेली होती असंही अधिकारी सांगत आहेत. यामधील दीड लाख रुपये खलील तर इम्तियाज आणि रशीदला प्रत्येकी 50 हजार देण्याचं ठरवण्यात आलं होतं. भारतीय अधिका-यांना वृत्तपत्रातून त्यांच्या कामाची माहिती मिळाली. पण पैसे घेण्यासाठी पोहोचले असता त्यांना कोणीच भेटलं नाही असंही अधिका-याने सांगितलं आहे. 
 
आपला मृत्यू झाला आहे दाखवण्यासाठी त्यांनी काही फोटो काढले होते, पण त्याआधीच त्यांची माहिती वृत्तपत्रांमध्ये आली होती. 26 सप्टेंबरला एका व्यक्तीने त्यांना पाहिल्याचं सांगितल्यानंतर पोलीस अलर्ट झाले. यानंतर आम्ही गुप्तचर यंत्रणेच्या सहाय्याने त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवत त्यांना अटक केलं असं अधिका-याने सांगितलं आहे.