शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

अनैतिक संबंध लपवण्यासाठी तीन हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 00:33 IST

केरळमध्ये महिलेस अटक; मुलगी व आई-वडिलांना दिले विष

कन्नूर : स्वत:चे परपुरुषाशी असलेले अनैतिक संबंध उघड होऊ नयेत, म्हणून एका महिलेने आपल्या ९ वर्षांच्या मुलीला तसेच वृद्ध आई-वडिलांना जेवणात उंदरांना मारण्याचे विषय घालून मारून टाकले, असे उघडकीस आले आहे. तिला १५ दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे. कन्नूर जिल्ह्याच्या पिनराई गावातील या घटनेमुळे संपूर्ण केरळमध्ये खळबळ उडाली होती आणि स्वत: मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून, त्याची नीट चौकशी करण्याचे आदेश दिले होते.पिनराई गावात राहणाऱ्या या महिलेच्या नऊ वर्षांच्या ऐश्वर्या या मुलीचा २१ जानेवारी महिन्यात संशयास्पद मृत्यू झाला. त्यावेळी तिला विषबाधा झाल्याचे या महिलेने सांगितले होते. त्यावर लोकांनी विश्वासही ठेवला. पण त्यानंतर ७ मार्च रोजी तिची ६९ वर्षे वयाची आईही त्याच पद्धतीने मरण पावली. तेव्हा घरातील विहिरीच्या पाण्यातून विषबाधा झाल्याचा दावा तिने केला. तेव्हाही कोणाला शंका आली नाही.मात्र त्यानंतर १३ एप्रिल रोजी तिचे ७६ वर्षांचे वडीलही अचानक मरण पावले. तेव्हाही तिने पाण्यातून विषबाधा हे कारण सांगितले. एवढेच नव्हे, तर मलाही पाण्याचा त्रास झाला, असे सांगून ती रुग्णालयात दाखल झाली. त्यामुळे तिच्या घराबाहेरील विहिरीच्या तसेच गावातील सर्व विहिरींच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. मात्र त्या पाण्यातून विषबाधा होणे शक्यच नाही, असा अहवाल आला. त्यामुळे गावकरी व पोलीस यांचा संशय वाढला. मुलीने पाहिले होतेहे प्रकरण गंभीर असल्याने पोलिसांनी बारकाईने चौकशी सुरू केली. तेव्हा या महिलेचे अनेक पुरुषांशी संबंध होते, असे लक्षात आले. तिने नवºयाशी आधीच घटस्फोट घेतला होता. तिच्या ९ वर्षांच्या ऐश्वर्याने तिला एका पुरुषासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिले होते आणि ते स्वत:च्या आजी-आजोबांना सांगितले होते. त्यामुळे तिने आधी मुलीला मारून टाकले. त्याप्रकारे मारल्याने कोणाला संशय येत नाही, हे लक्षात आल्यानंतर तिने आई-वडलांनाही मारून टाकले, असे उघड झाले आहे.

टॅग्स :Murderखून