शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

महिला नक्षलीसह तीन जण चकमकीत ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2020 01:23 IST

छत्तीसगढ : तिघांवरही १८ लाखांचे बक्षीस

रायपूर : छत्तीसगढमध्ये नक्षल प्रभावित कांकेर जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत महिला नक्षलीसह तीन नक्षलींना ठार करण्यात आले. यावेळी सशस्त्र सीमा दलाचा (एसएसबी) एक जवान जखमी झाला. बस्तर क्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी यांनी सांगितले की, तोडोकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पादकेलबेडा व कोसरडा गावातील जंगलात सुरक्षा दलांनी तीन नक्षलींना ठार केले. ठार करण्यात आलेल्या नक्षलींवर एकूण १८ लाख रुपयांचे बक्षीस आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, एसएसबी व जिल्हा दलाच्या संयुक्त दलाला गस्तीवर रवाना करण्यात आले होते. जंगलात असताना नक्षलींनी त्यांच्यावर गोळीबार केला. सुरक्षा दलानेही याला चोख प्रत्युत्तर दिले. चकमकीनंतर काही नक्षली घटनास्थळाहून पळून गेले. त्यानंतर सुरक्षा दलाने घटनास्थळाची तपासणी घेतली असता, तीन नक्षलींचे मृतदेह आढळले. ठार करण्यात आलेल्या नक्षलींची ओळख पटली असून, ते पीएलजीएच्या कंपनीचे सदस्य ज्योती, बदरू व गुड्डू हे होते. यातील ज्योतीवर आठ लाख रुपये तर इतर दोन नक्षलींवर प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस होते. घटनास्थळाहून एक इन्सास व एक्स ९५ शस्त्रांसह तीन शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर स्फोटकेही जप्त केली आहेत. आज जप्त केलेली शस्त्रे नक्षलींनी रावघाट भागात २०१८मध्ये सुरक्षा दलांकडून लुटली होती. सुंदरराज यांनी सांगितले की, कांकेर जिल्ह्यात एसएसबीची २८वी व ३३वी बटालियन २०१६पासून तैनात आहे. आजच्या चकमकीत एसएसबी जवान जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बस्तर भागात सुरक्षा दलांनी मागील आठवड्यात झालेल्या चकमकींमध्ये सात नक्षलींना ठार केले आहे. या भागात नक्षलविरोधी मोहीम राबविण्यात येत आहे.

टॅग्स :raipur-pcरायपूरWomenमहिला