शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
2
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
3
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
4
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
5
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
6
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
7
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
8
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
9
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
10
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
11
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
12
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
13
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
14
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
15
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
16
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
17
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
18
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
19
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
20
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू

मणिपूरमध्ये ३ सरकारी कार्यालयांना आग

By admin | Updated: December 24, 2016 01:39 IST

मणिपूरमध्ये संयुक्त नागा परिषदेकडून ५२ दिवसांपासून आर्थिक नाकेबंदी सुरू असून, शुक्रवारी कामजोंग जिल्ह्यातील

इम्फाळ : मणिपूरमध्ये संयुक्त नागा परिषदेकडून ५२ दिवसांपासून आर्थिक नाकेबंदी सुरू असून, शुक्रवारी कामजोंग जिल्ह्यातील कार्यालयासह तीन सरकारी कार्यालयांना आग लावण्यात आली. कामजोंगचे उपायुक्त आर्मस्ट्रोंग पेम यांनी सांगितले की, भल्या पहाटे ३ वाजेच्या सुमारास पाच ते सहा जणांनी उपविभागीय कार्यालयांना आग लावली. कामजोंग येथील नव्या कार्यालयाचे उद्घाटन बाकी असल्यामुळे हे कार्यालया सध्या तात्पुरत्या स्वरूपात एसडीओ कार्यालयासोबत सुरू होते. उखरूल जिल्ह्यातून वेगळे बनविलेल्या कम्जोंग जिल्ह्याला मोठा विरोध होत आहे. तंगखूल नागा लोंग आणि संयुक्त नागा परिषद यांचा या निर्मितीला विरोध आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्य एका घटनेत उखरूल जिल्ह्यात काही अज्ञात लोकांनी मिनी सचिवालयाच्या दोन खोल्यांना आग लावली. मोदींनी हस्तक्षेप करावा - मेरी कोम नवी दिल्ली : मणिपूरमधील आर्थिक नाकाबंदीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा, अशी मागणी राज्यसभा सदस्य आणि पाच वेळा विश्वविजेत्या ठरलेल्या बॉक्सर मेरी कोम यांनी केली आहे. मणिपूरमध्ये ५२ दिवसांपासून सुरू असलेल्या नाकाबंदीमुळे जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे.सरकार जबाबदारी झटकू शकत नाही : रिजिजूइंफाळ : नागा समुदायाकडून ५२ दिवसांपासून सुरू असलेल्या आर्थिक नाकेबंदीमुळे जे संकट निर्माण झाले आहे त्याची जबाबदारी राज्य सरकारला झटकता येणार नाही, असा संदेश केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी राज्यातील इबोबी सरकारला दिला आहे, तर कुणालाही राजकीय लाभ घेऊ दिला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.हा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सोबत काम करतील असे सांगून येथे एका पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, राज्य सरकार नाकेबंदी संपवू शकलेले नाही. ही परिस्थिती पूर्ववत व्हायला हवी, कारण कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी राज्य सरकारची आहे.मणिपूरमध्ये आर्थिक नाकाबंदी : केंद्राने घेतला आढावा इम्फाळ : मणिपूरमध्ये महामार्गावर होत असलेल्या आर्थिक नाकाबंदीचा केंद्र सरकारने आढावा घेतला आहे. ही चिंताजनक परिस्थिती संपविण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलावीत, असे आवाहन केंद्रीय मंत्री रिजिजू यांनी केले आहे. राज्यात सात नवे जिल्हे बनविण्यात आले आहेत. त्याला संयुक्त नागा परिषद विरोध करीत आहे.एका उच्चस्तरीय बैठकीत राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला केंद्रीय गृहराज्यमंत्री रिजिजू, मुख्यमंत्री ओ इबोबी सिंह आणि केंद्र व मणिपूर सरकारचे वरिष्ठ अधिकारी यांनी सहभाग घेतला. केंद्राचे दूूत म्हणून रिजिजू हे एक दिवसाच्या मणिपूर दौऱ्यावर आलेले आहेत.नाकेबंदी संपविण्यासाठी आणि राज्यात सामान्य स्थिती पूर्ववत करण्यासाठी मणिपूर सरकारने आपली घटनात्मक कर्तव्ये पार पाडावीत, असे ते म्हणाले. १ नोव्हेंबरपासून नाकेबंदी सुरू असून, त्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. २ वर अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.