शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

सहा वर्षांपूर्वीही मोदींना शेतकऱ्यांसमोर घ्यावी लागली होती माघार; नेमकं काय घडलं होतं..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 11:52 IST

तीन कृषी कायदे सरकारकडून रद्द; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

मुंबई: शेतकरी आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे. केंद्र सरकारनं तीन कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली. देशवासीयांना संबोधित करताना मोदींनी हा मोठा निर्णय जाहीर केला. गेल्या वर्षभर थंडी वाऱ्यात पावसात आंदोलन करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांचा हा विजय मानला जात आहे. मोदींनी केलेल्या घोषणेनंतर आंदोलक शेतकऱ्यांनी एकच जल्लोष केला.

शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या नेतृत्त्वाखाली गेल्या वर्षभरापासून दिल्लीच्या सीमेवर तीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा उल्लेख आज मोदींनी केला. 'केंद्र सरकारनं आंदोलकांशी विविध मार्गांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. ज्या तरतुदींबद्दल आक्षेप आहे, त्या बदलण्याची तयारी दर्शवली. कायदे दोन वर्षांसाठी निलंबित करण्याचा प्रस्ताव दिला. पण तरीही शेतकऱ्यांना समजवण्यात आम्ही कमी पडलो,' असं म्हणत मोदींनी तीन कायदे रद्द करण्याची घोषणा केली.

शेतकऱ्यांसमोर माघार घेण्याची मोदी सरकारची ही पहिली वेळ नाही. याआधी मोदी सरकारला आपल्या पहिल्या टर्ममध्ये भू संपादन अध्यादेश मागे घ्यावा लागला. त्यावेळी नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेऊन अवघे काही महिने झाले होते. सरकारनं भू संपादनाला वेग देण्यासाठी अध्यादेश आणले. मात्र त्याला शेतकऱ्यांनी मोठा विरोध दर्शवला.

नरेंद्र मोदी सत्तेत येताच भू संपादनासाठी अध्यादेश काढण्यात आला. हा अध्यादेश काढण्याआधी जमीन संपादित करण्यासाठी ८० टक्के शेतकऱ्यांची सहमती गरजेची होती. मात्र नव्या अध्यादेशातून ही तरतूद काढून टाकण्यात आली. शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला. विरोधी पक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. भू संपादनासाठी सरकारनं चारवेळा अध्यादेश काढला. त्यावेळी सरकारला राज्यसभेत पुरेशा संख्याबळाअभावी या संदर्भात कायदा मंजूर करून घेता आला नाही. शेतकऱ्यांनी होत असलेला विरोध पाहून सरकारनं ३१ ऑगस्ट २०१५ रोजी माघार घेतली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmers Protestशेतकरी आंदोलन