शहरं
Join us  
Trending Stories
1
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
2
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
3
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
4
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
5
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
6
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
7
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
8
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
9
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
10
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
11
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
12
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...
13
Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
14
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
15
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या
16
Video - "देवाने हे नियम बनवले नाहीत..."; शॉर्ट्स घालून महिलेने मंदिरात प्रवेश केल्याने मोठा गोंधळ
17
VIDEO: 'पॉवर हिटिंग'! ३ वर्षांच्या चिमुरड्याची बॅटिंग पाहून तुम्हीही म्हणाल- What a Shot!
18
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
19
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
20
कोजागरी शरद पौर्णिमा २०२५: पंचकाची अशुभ छाया अन् अमंगल काळ, शुभ मुहूर्त कधी? लक्ष्मी लाभेल!

सहा वर्षांपूर्वीही मोदींना शेतकऱ्यांसमोर घ्यावी लागली होती माघार; नेमकं काय घडलं होतं..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 11:52 IST

तीन कृषी कायदे सरकारकडून रद्द; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

मुंबई: शेतकरी आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे. केंद्र सरकारनं तीन कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली. देशवासीयांना संबोधित करताना मोदींनी हा मोठा निर्णय जाहीर केला. गेल्या वर्षभर थंडी वाऱ्यात पावसात आंदोलन करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांचा हा विजय मानला जात आहे. मोदींनी केलेल्या घोषणेनंतर आंदोलक शेतकऱ्यांनी एकच जल्लोष केला.

शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या नेतृत्त्वाखाली गेल्या वर्षभरापासून दिल्लीच्या सीमेवर तीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा उल्लेख आज मोदींनी केला. 'केंद्र सरकारनं आंदोलकांशी विविध मार्गांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. ज्या तरतुदींबद्दल आक्षेप आहे, त्या बदलण्याची तयारी दर्शवली. कायदे दोन वर्षांसाठी निलंबित करण्याचा प्रस्ताव दिला. पण तरीही शेतकऱ्यांना समजवण्यात आम्ही कमी पडलो,' असं म्हणत मोदींनी तीन कायदे रद्द करण्याची घोषणा केली.

शेतकऱ्यांसमोर माघार घेण्याची मोदी सरकारची ही पहिली वेळ नाही. याआधी मोदी सरकारला आपल्या पहिल्या टर्ममध्ये भू संपादन अध्यादेश मागे घ्यावा लागला. त्यावेळी नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेऊन अवघे काही महिने झाले होते. सरकारनं भू संपादनाला वेग देण्यासाठी अध्यादेश आणले. मात्र त्याला शेतकऱ्यांनी मोठा विरोध दर्शवला.

नरेंद्र मोदी सत्तेत येताच भू संपादनासाठी अध्यादेश काढण्यात आला. हा अध्यादेश काढण्याआधी जमीन संपादित करण्यासाठी ८० टक्के शेतकऱ्यांची सहमती गरजेची होती. मात्र नव्या अध्यादेशातून ही तरतूद काढून टाकण्यात आली. शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला. विरोधी पक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. भू संपादनासाठी सरकारनं चारवेळा अध्यादेश काढला. त्यावेळी सरकारला राज्यसभेत पुरेशा संख्याबळाअभावी या संदर्भात कायदा मंजूर करून घेता आला नाही. शेतकऱ्यांनी होत असलेला विरोध पाहून सरकारनं ३१ ऑगस्ट २०१५ रोजी माघार घेतली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmers Protestशेतकरी आंदोलन