शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
4
"राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
7
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
8
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
9
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
10
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
11
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
12
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
13
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
14
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
15
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
16
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
17
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
18
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
19
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
20
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...

तीन वर्षात रस्ते अपघातात अडीच हजार जणांचा मृत्यू रस्ते बनले मृत्यूचे सापळे : अंतर्गत रस्त्यावर सर्वाधिक अपघात

By admin | Published: January 14, 2017 12:06 AM

अरुण वाघमोडे

अरुण वाघमोडे
अहमदनगर : जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत ७ हजार २५५ अपघात झाले असून, यामध्ये २ हजार ४७७ जणांचा मृत्यू झाला आहे़ २ हजार ८४५ जण गंभीर तर ७४७ किरकोळ जखमी झाले आहेत़ यामध्ये राष्ट्रीय महामार्गावर १२४६, राज्य महामार्गावर २०८५ तर इतर रस्त्यांवर सर्वाधिक ३९२४ अपघात झाले असून, रस्ते प्रवासी आणि पादचार्‍यांसाठी मृत्यूचे सापळे बनले आहेत़
रस्ता सुरक्षा जनजागरण अभियानाच्या निमित्त जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने उपप्रादेशिक परिवहन विभागाला दिलेल्या अहवालात अपघातांची आकडेवारी देण्यात आली आलेली आहे़ २०१४ ते २०१६ या कालावधीत अपघातांची संख्या आणि मयतांचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या कमी झालेले दिसत नाही़ उपप्रादेशिक परिवहन व वाहतूक विभागाच्यावतीने दरवर्षी रस्ता सुरक्षा जनजागरण अभियान राबविण्यात येत असले तरी ठोस उपाययोजनांची अंमलबजावणी होत नसल्याने अपघातांमध्ये मरणारांचा आलेख वाढतच आहे़
जिल्ह्यातून कल्याण विशाखापट्टणम तर संगमनेर नाशिक-पुणे हे राष्ट्रीय तर नगर-मनमाड, नगर-पुणे, नगर-सोलापूर हे राज्य महामार्ग जातात़ या महामार्गांवर असणार्‍या अपघातस्थळीच वारंवार अपघात होत आहेत़ गेल्या वर्षभरात नगर-पुणे महामार्गावर सर्वाधिक अपघात झाल्याची नोंद आहे़ जिल्ह्यातून जाणार्‍या महामार्गावर साडेपाचशेपेक्षा जास्त धोकादायक ठिकाणे आहेत़ यामध्ये सूचना फलक नसणे, हायवेवरील दुभाजक फोडणे, गतिरोधक नसणे, सिग्नल नसणे, रस्त्यांमधील खड्डे, वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे आदी कारणांमुळे हे अपघात होत आहेत़ राष्ट्रीय आणि राज्य महामार्गापेक्षा जिल्ह्यातील गेल्या तीन वर्षांत अंतर्गत रस्त्यावर सर्वाधिक अपघात होऊन ९३१ जणांचा मृत्यू झाला आहे़ यामध्ये खराब रस्ते आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे हिच कारणे समोर येत आहेत़
-------------------------------
अपघातात मृत्यू झालेल्यांची संख्या
२०१४-
अपघातमयत जखमी
१८५२८०६१३७०

२०१५-
अपघातमयतजखमी
१७४३ ८४४१०९८

२०१६-
अपघातमयत जखमी
१६६०८२७१०६०
---------------------------------
तीन वर्षात मार्गनिहाय अपघात
मार्गअपघात
राष्ट्रीय १२४४
राज्य२०८५
इतर रस्ते ३९२४
--------------------------
अपूर्ण़़़़़़़़