शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

तीन वर्षात रस्ते अपघातात अडीच हजार जणांचा मृत्यू रस्ते बनले मृत्यूचे सापळे : अंतर्गत रस्त्यावर सर्वाधिक अपघात

By admin | Updated: January 14, 2017 00:06 IST

अरुण वाघमोडे

अरुण वाघमोडे
अहमदनगर : जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत ७ हजार २५५ अपघात झाले असून, यामध्ये २ हजार ४७७ जणांचा मृत्यू झाला आहे़ २ हजार ८४५ जण गंभीर तर ७४७ किरकोळ जखमी झाले आहेत़ यामध्ये राष्ट्रीय महामार्गावर १२४६, राज्य महामार्गावर २०८५ तर इतर रस्त्यांवर सर्वाधिक ३९२४ अपघात झाले असून, रस्ते प्रवासी आणि पादचार्‍यांसाठी मृत्यूचे सापळे बनले आहेत़
रस्ता सुरक्षा जनजागरण अभियानाच्या निमित्त जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने उपप्रादेशिक परिवहन विभागाला दिलेल्या अहवालात अपघातांची आकडेवारी देण्यात आली आलेली आहे़ २०१४ ते २०१६ या कालावधीत अपघातांची संख्या आणि मयतांचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या कमी झालेले दिसत नाही़ उपप्रादेशिक परिवहन व वाहतूक विभागाच्यावतीने दरवर्षी रस्ता सुरक्षा जनजागरण अभियान राबविण्यात येत असले तरी ठोस उपाययोजनांची अंमलबजावणी होत नसल्याने अपघातांमध्ये मरणारांचा आलेख वाढतच आहे़
जिल्ह्यातून कल्याण विशाखापट्टणम तर संगमनेर नाशिक-पुणे हे राष्ट्रीय तर नगर-मनमाड, नगर-पुणे, नगर-सोलापूर हे राज्य महामार्ग जातात़ या महामार्गांवर असणार्‍या अपघातस्थळीच वारंवार अपघात होत आहेत़ गेल्या वर्षभरात नगर-पुणे महामार्गावर सर्वाधिक अपघात झाल्याची नोंद आहे़ जिल्ह्यातून जाणार्‍या महामार्गावर साडेपाचशेपेक्षा जास्त धोकादायक ठिकाणे आहेत़ यामध्ये सूचना फलक नसणे, हायवेवरील दुभाजक फोडणे, गतिरोधक नसणे, सिग्नल नसणे, रस्त्यांमधील खड्डे, वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे आदी कारणांमुळे हे अपघात होत आहेत़ राष्ट्रीय आणि राज्य महामार्गापेक्षा जिल्ह्यातील गेल्या तीन वर्षांत अंतर्गत रस्त्यावर सर्वाधिक अपघात होऊन ९३१ जणांचा मृत्यू झाला आहे़ यामध्ये खराब रस्ते आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे हिच कारणे समोर येत आहेत़
-------------------------------
अपघातात मृत्यू झालेल्यांची संख्या
२०१४-
अपघातमयत जखमी
१८५२८०६१३७०

२०१५-
अपघातमयतजखमी
१७४३ ८४४१०९८

२०१६-
अपघातमयत जखमी
१६६०८२७१०६०
---------------------------------
तीन वर्षात मार्गनिहाय अपघात
मार्गअपघात
राष्ट्रीय १२४४
राज्य२०८५
इतर रस्ते ३९२४
--------------------------
अपूर्ण़़़़़़़़