शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

तीन वर्षात रस्ते अपघातात अडीच हजार जणांचा मृत्यू रस्ते बनले मृत्यूचे सापळे : अंतर्गत रस्त्यावर सर्वाधिक अपघात

By admin | Updated: January 14, 2017 00:06 IST

अरुण वाघमोडे

अरुण वाघमोडे
अहमदनगर : जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत ७ हजार २५५ अपघात झाले असून, यामध्ये २ हजार ४७७ जणांचा मृत्यू झाला आहे़ २ हजार ८४५ जण गंभीर तर ७४७ किरकोळ जखमी झाले आहेत़ यामध्ये राष्ट्रीय महामार्गावर १२४६, राज्य महामार्गावर २०८५ तर इतर रस्त्यांवर सर्वाधिक ३९२४ अपघात झाले असून, रस्ते प्रवासी आणि पादचार्‍यांसाठी मृत्यूचे सापळे बनले आहेत़
रस्ता सुरक्षा जनजागरण अभियानाच्या निमित्त जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने उपप्रादेशिक परिवहन विभागाला दिलेल्या अहवालात अपघातांची आकडेवारी देण्यात आली आलेली आहे़ २०१४ ते २०१६ या कालावधीत अपघातांची संख्या आणि मयतांचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या कमी झालेले दिसत नाही़ उपप्रादेशिक परिवहन व वाहतूक विभागाच्यावतीने दरवर्षी रस्ता सुरक्षा जनजागरण अभियान राबविण्यात येत असले तरी ठोस उपाययोजनांची अंमलबजावणी होत नसल्याने अपघातांमध्ये मरणारांचा आलेख वाढतच आहे़
जिल्ह्यातून कल्याण विशाखापट्टणम तर संगमनेर नाशिक-पुणे हे राष्ट्रीय तर नगर-मनमाड, नगर-पुणे, नगर-सोलापूर हे राज्य महामार्ग जातात़ या महामार्गांवर असणार्‍या अपघातस्थळीच वारंवार अपघात होत आहेत़ गेल्या वर्षभरात नगर-पुणे महामार्गावर सर्वाधिक अपघात झाल्याची नोंद आहे़ जिल्ह्यातून जाणार्‍या महामार्गावर साडेपाचशेपेक्षा जास्त धोकादायक ठिकाणे आहेत़ यामध्ये सूचना फलक नसणे, हायवेवरील दुभाजक फोडणे, गतिरोधक नसणे, सिग्नल नसणे, रस्त्यांमधील खड्डे, वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे आदी कारणांमुळे हे अपघात होत आहेत़ राष्ट्रीय आणि राज्य महामार्गापेक्षा जिल्ह्यातील गेल्या तीन वर्षांत अंतर्गत रस्त्यावर सर्वाधिक अपघात होऊन ९३१ जणांचा मृत्यू झाला आहे़ यामध्ये खराब रस्ते आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे हिच कारणे समोर येत आहेत़
-------------------------------
अपघातात मृत्यू झालेल्यांची संख्या
२०१४-
अपघातमयत जखमी
१८५२८०६१३७०

२०१५-
अपघातमयतजखमी
१७४३ ८४४१०९८

२०१६-
अपघातमयत जखमी
१६६०८२७१०६०
---------------------------------
तीन वर्षात मार्गनिहाय अपघात
मार्गअपघात
राष्ट्रीय १२४४
राज्य२०८५
इतर रस्ते ३९२४
--------------------------
अपूर्ण़़़़़़़़