शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

'5 वर्षात भारताचे पाकिस्तानवर तीन एअर स्ट्राईक, तिसऱ्याची माहिती देणार नाही' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 17:26 IST

भारताने गेल्या 5 वर्षात पाकिस्तानच्या हद्दीत घुसून तीनवेळा एअर स्ट्राईक करुन यशस्वी हल्ला चढवला.

मंगळुरू - केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी एअर स्ट्राईकसंदर्भात बोलताना भारताने तीन स्ट्राईक केल्याचं सांगून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. कर्नाटकातील मंगळुरू येथे बोलताना राजनाथसिंह यांनी भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून आतापर्यंत तीन स्ट्राईक केल्याचं म्हटलं. मात्र, मी तुम्हाला केवळ दोन स्ट्राईकबद्दल सांगणार असून तिसऱ्या स्ट्राईकबद्दल सांगणार नाही, असे राजनाथसिंह यांनी म्हटले आहे. 

भारताने गेल्या 5 वर्षात पाकिस्तानच्या हद्दीत घुसून तीनवेळा एअर स्ट्राईक करुन यशस्वी हल्ला चढवला. मात्र, मी तुम्हाला केवळ दोनच स्ट्राईकची माहिती देणार आहे. तुम्हाला तिसऱ्या स्ट्राईकची माहिती देणार नाही, असे म्हणत राजनाथसिंह यांनी तिसऱ्या स्ट्राईकची उत्कंठा वाढवली आहे. कारण, माहिती देताना राजनाथसिंह यांनी उरी सर्जिकल स्ट्राईकचा हल्ला आणि पुलवामा हल्ल्यानंतरचा एअर स्ट्राईक याबाबत सांगितले. त्यामुळे तिसरा स्ट्राईक नेमका कोणता असा प्रश्न उपस्थितांना पडला असून आता देशातील जनतेलाही त्या तिसऱ्या स्ट्राईकबद्दल उत्कंठा लागून राहिली आहे. 

आताचा भारत दुबळा राहिला नाही, सशक्त भारत आहे. त्यामुळेच, गेल्या 5 वर्षात भारताने पाकिस्तानला सडेतोड उत्तर देताना तीन स्ट्राईक केले. मात्र, राजनाथसिंह यांनी तिसऱ्या स्ट्राईकबाबत काहीही सांगणार नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये 14 फेब्रुवारीला 'जैश-ए-मोहम्मद'च्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. त्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. या कारवाईत बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या तळांवर भारताच्या ‘मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी 1000 किलोचे बॉम्ब फेकले होते. यात जवळपास 300 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे सांगण्यात येते. या कारवाईनंतर भारत-पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण बनले आहे. तर लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलेच राजकारण होताना दिसत आहे.  

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकPakistanपाकिस्तानHome Ministryगृह मंत्रालय