शहरं
Join us  
Trending Stories
1
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
2
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
3
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
4
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
5
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
6
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
7
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
8
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
9
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
10
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
11
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
12
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
13
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
14
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
15
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
16
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
17
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
18
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
19
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
20
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!

पवारांच्या ‘नितीशकुमार मिसाईल’मुळे खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2016 03:44 IST

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे ‘नंबर वन’ असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठेवलेला प्रस्ताव बहुतांश विरोधी पक्षांनी फेटाळला आहे.

हरीश गुप्ता,

नवी दिल्ली-भाजपेतर पक्षांची आघाडी उभारायची झाल्यास बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे ‘नंबर वन’ असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठेवलेला प्रस्ताव बहुतांश विरोधी पक्षांनी फेटाळला आहे.नितीशकुमार हे सेतूसारखी शक्ती म्हणून काम करणार असेल तर त्यांच्या नेतृत्वात भाजपेतर पक्षांची आघाडी उभारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस खुलेपणाने विचार करेल, अशा आशयाचे विधान पवारांनी केल्यामुळे राजकीय वादळ उभे ठाकले आहे. काँग्रेस, समाजवादी पक्ष, बसपा आणि अन्य प्रमुख पक्षांनी असे समीकरण मान्य होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. रालोआविरुद्ध लढाईचे नेतृत्व राहुल गांधी करणार असून तेच सर्वाधिक सक्षम नेते आहेत, असे काँग्रेसचे नेते प्रमोद तिवारी यांनी स्पष्ट केले. नितीशकुमार यांच्या नेतृत्वात कोणतीही आघाडी स्थापन करण्याची कल्पना फेटाळून लावतानाच बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी अशा आघाडीचा भाग बनणार नसल्याचे नमूद केले. देशात भाजपविरोधी आघाडी उभारण्यासाठी मुलायमसिंग यादव हेच एकमेव सक्षम नेते आहेत, असे समाजवादी पक्षाचे नरेश अग्रवाल यांनी म्हटले. ममता बॅनर्जी नितीशकुमार यांना समर्थन देणार असतील तर ते आश्चर्यच ठरेल, असा टोलाही त्यांनी हाणला. (वृत्तसंस्था)>दिल्ली दूर; पाटणाच बरा - राजदचा सल्लाबिहार सरकारच्या नेतृत्वाची जबाबदारी राजदने नितीशकुमार यांच्याकडे सोपविली असली तरी त्यांनी बिहारचे व्यापक हित लक्षात घेत दिल्लीकडे नव्हे पाटण्याकडे लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला राजदच्या नेत्यांनी दिला आहे. राष्ट्रीय राजकारणात भूमिका बजावण्याला प्राधान्य देणार असल्याचे सांगत राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी याआधीच आपला मनसुबा स्पष्ट केला आहे.>सोनिया गांधींचीही प्रशंसा...पवार यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधताना सोनिया गांधी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली होती. सोनिया गांधी सर्वांना सामावून घेणाऱ्या आणि एकत्र ठेवणाऱ्या नेत्या असून विरोधी पक्षांमध्येही त्यांच्याबद्दल अधिक अनुकूलता आहे. राहुल गांधी हे राष्ट्रीय पातळीवर पकड मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांचे नेतृत्व समोर येत आहे; मात्र निर्णय देणे खूप घाईचे ठरेल. येत्या तीन वर्षांत राहुल कशी कामगिरी करतात यावर ते निर्भर असेल. बहुतांश राज्यांना स्वत: भेटी देणारे ते एकमेव नेते आहेत, अशी पुस्तीही पवारांनी जोडली होती.पवारांची सारवासारव....पवारांनी नितीशकुमार यांच्याकडे तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व सोपविण्याची भाषा केल्यानंतर विविध घटकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यावर पवारांनी मी राहुल गांधी यांच्याविषयी काहीही बोललो नाही. केवळ नितीशकुमार हे सक्षम आहेत, असे विधान केले होते, असे सांगत शुक्रवारी सारवासारव केली. नितीशकुमार यांच्यात भाजपेतर आघाडी उभारण्याची क्षमता असून ते सर्व पक्षांची मोट बांधणारा सेतू ठरतील, या पवारांच्या विधानाचे समर्थन करताना नितीशकुमार यांच्या संजदचे नेते के.सी. त्यागी यांनीही सावध भूमिका घेतली. नितीशकुमार यांच्याकडे क्षमता आहे, एवढेच ते म्हणाले. निवडणुकीत व्यग्र असलेल्या अण्णा द्रमुक, द्रमुक, तृणमूल काँग्रेस यासारख्या प्रादेशिक पक्षांनी पवारांच्या विधानावर भाष्य केलेले नाही.