ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी मिळाल्याचे माहिती समोर आली आहे. या संदर्भात भारत सरकारने बांगलादेश उच्चायुक्तांना समन्स बजावले आहे. कोणत्या प्रकारची धमकी देण्यात आली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. बांगलादेशने विजय दिन साजरा केल्यानंतर एक दिवसानंतर ही घटना घडली. सध्या भारत सरकारने या प्रकरणावर अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
बुधवारी बांगलादेशची राजधानी ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाच्या सुरक्षेबाबत चर्चा झाली. परराष्ट्र मंत्रालयाने भारतातील बांगलादेश उच्चायुक्तांना बोलावून घेतले.
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
भारतीय उच्चायुक्तांनाही समन्स बजावण्यात आले
मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांना समन्स बजावले. पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांनी केलेल्या "प्रक्षोभक विधानांवर" "गंभीर चिंता" व्यक्त केली. हसीना सध्या भारतात आहेत. देशातील एका विशेष न्यायाधिकरणाने त्यांना मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी दोषी ठरवले आणि त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. बांगलादेश भारताकडून हसीनाचे प्रत्यार्पण करण्याची मागणी करत आहे.
बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, "परराष्ट्र मंत्रालयाने आज भारतीय उच्चायुक्तांना समन्स बजावले आणि भारत सरकारला बांगलादेश सरकारची गंभीर चिंता कळवली की शेख हसीना यांना बांगलादेशात दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांच्या समर्थकांना प्रवृत्त करणारी प्रक्षोभक विधाने करण्याची परवानगी दिली जात आहे. त्यांच्या विधानांचा उद्देश बांगलादेशातील आगामी संसदीय निवडणुकांना तोडफोड करणे आहे."
भारताला धमकी मिळाली
बांगलादेशच्या नॅशनल सिटीझन पार्टीचे नेते हसनत अब्दुल्ला यांनी सोमवारी म्हटले की, जर नवी दिल्लीने त्यांच्या देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न केला तर ढाका भारताच्या ईशान्येकडील राज्यांना वेगळे करेल आणि या प्रदेशातील फुटीरतावादी घटकांना पाठिंबा देईल.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी या विधानांवर तीव्र आक्षेप घेतला. "गेल्या वर्षभरात, त्या देशाकडून वारंवार असे विधान केले जात आहे की ईशान्य भारतातील राज्ये वेगळे करून बांगलादेशचा भाग बनवावीत. भारत हा एक खूप मोठा देश आहे, अणुऊर्जेवर चालणारा देश आहे आणि जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. बांगलादेश हे कसे विचार करू शकतो?, असा सवालही त्यांनी केला.
Web Summary : Following a threat to the Indian High Commission in Dhaka, India summoned a Bangladeshi official. The nature of the threat is unclear. Bangladesh also summoned the Indian High Commissioner regarding comments made by Sheikh Hasina. A Bangladeshi leader threatened to destabilize India's northeast if provoked.
Web Summary : ढाका में भारतीय उच्चायोग को धमकी मिलने के बाद, भारत ने एक बांग्लादेशी अधिकारी को तलब किया। खतरे की प्रकृति स्पष्ट नहीं है। शेख हसीना की टिप्पणियों के संबंध में बांग्लादेश ने भारतीय उच्चायुक्त को भी तलब किया। एक बांग्लादेशी नेता ने उकसाने पर भारत के पूर्वोत्तर को अस्थिर करने की धमकी दी।