शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

कुलभूषण जाधव यांचा खटला न लढण्याची वकिलांना धमकी

By admin | Updated: April 14, 2017 16:23 IST

भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांचा खटला जो कोणी वकील लढेल त्याच्याविरोधात कारवाई केली जाईल

ऑनलाइन लोकमत
लाहोर, दि. 14 - भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांचा खटला जो कोणी वकील लढेल त्याच्याविरोधात कारवाई केली जाईल असं लाहोर उच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनने म्हटलं आहे. लाहोर उच्च न्यायालय बार असोसिएशनचे सचिव जनरल आमेर सईद रान यांनी शुक्रवारी एका बैठकीनंतर ही माहिती दिली. बार असोसिएशनने पाकिस्तान सरकारला कोणत्याही परदेशी ताकदीसमोर न झुकण्याचं आवाहन केलं आहे. 
 
""जाधव हे भारतीय नागरिक असल्याचं भारताने मान्य केलं असून त्यांना सोडवण्यासाठी पाकिस्तानवर दबाव आणण्याचा प्रय़त्न करत आहे. पाकिस्तानी नागरिकांच्या जीवाशी खेळणा-या गुप्तहेराला वाचवलं जाऊ नये, सरकारने त्याला फाशी द्यावी"" अशी मागणी सईद यांनी केली. 
 
दरम्यान, इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्त गौतम बंबावले पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव तहमीना जनजुआ यांच्यासोबत जाधव प्रकरणावर भेट घेणार असल्याचं वृत्त आहे. या प्रकरणी गेल्या वर्षी पाकिस्तानने भारताकडून करण्यात आलेल्या 13 अपील फेटाळल्या होत्या.  
अशाप्रकारे भारताला टाळता येईल कुलभूषण जाधवांची फाशी-
पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने सोमवारी कुलभूषण जाधव यांना  फाशीची शिक्षा सुनावली. त्यानंतर भारताकडून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.  जाधव यांना फाशी झाल्यास तो हत्येचा पूर्वनियोजित कट ठरेल अशा शब्दात भारताने पाकिस्तानला ठणकावले आहे. भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी पाकिस्तानी उच्चायुक्त अब्दुल बासित यांना बोलावून विरोधाचे पत्र देऊन चांगलेच खडसावले. या पत्रात भारताने कुलभूषण जाधव यांना शिक्षा सुनावली जाताना अनेक कायदेशीर हक्कांची पायमल्ली केल्याचं म्हटलं आहे.   
 
काय आहेत पर्याय-
 
-कुलभूषण यांना कायदेशीर मदत न दिल्याचा आरोप भारताने केला आहे. त्यामुळे योग्य ती कायदेशीर मदत मिळाल्यास फाशीच्या शिक्षेविरोधात पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतो.
 
-ज्याप्रकारे पाकिस्तानने वर्षभराच्या आत खटला चालवत तडकाफडकी फाशीची शिक्षा सुनावली त्यामुळे जाधव यांच्या अनेक कायदेशीर हक्कांची पायमल्ली झाली. हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्थरावर योग्यप्रकारे मांडून आणि संयुक्त राष्ट्रात हा मुद्दा उचलून धरल्यास पाकिस्तानवर दबाव निर्माण होऊ शकतो.
 
-कूटनीतीचा वापर करून पाकिस्तानवर दबाव वाढवण्याचा भारताकडे पर्याय आहे. पाकिस्तानच्या वर्मावर बोट ठेवून कुलभूषण यांना न्याय मिळण्याची अपेक्षा भारत ठेवू शकतो.
 
- याशिवाय सर्वात महत्वाचा पर्याय म्हणजे दोन्ही देशांच्या प्रमुखांनी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी या प्रकरणी हस्तक्षेप करून चर्चा करावी, या मुद्यावरून दोन्ही देशांतील संबंध आणखी ताणले जाऊ नयेत यासाठी जाधव यांची फाशी रद्द करण्याचा निर्णय होऊ शकतो.