शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
3
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
4
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
5
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
7
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
8
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
9
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
10
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
11
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
12
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
13
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
14
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
15
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
16
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
17
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
18
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
19
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

अब्जावधी वर्षांपूर्वी भारत होता अंटार्टिकाचा भाग

By admin | Updated: August 5, 2016 04:28 IST

भारतीय उपखंड अब्जावधी वर्षांपूर्वी अंटार्टिकाचा भाग होता या गृहीतकाला बळ देणारे पुरावे शास्त्रज्ञांना सापडले

कोलकाता : भारतीय उपखंड अब्जावधी वर्षांपूर्वी अंटार्टिकाचा भाग होता या गृहीतकाला बळ देणारे पुरावे शास्त्रज्ञांना सापडले आहेत. हे दोन्ही भूभाग मिळून एकच विशाल खंड होता. मात्र, मानव उत्पत्तीपूर्वी प्रस्तरांच्या उलथापालथीमुळे ते एकमेकांपासून वेगळे व पुन्हा एकजीव होण्याची क्रिया अनेकदा घडल्याचे मानले जाते. भारत व स्वीत्झर्लंडचे भूवैज्ञानिक पृथ्वीचे कवच कसे विकसित झाले यावर संशोधन करीत आहेत. त्यांनी भारतीय उपखंडाच्या पूर्व घाटातील प्राचीन दगडांचा अभ्यास केला. त्यातून त्यांना या उपखंडाच्या निर्मितीचे महत्त्वपूर्ण धागेदोरे हाती लागले. अंटार्टिका खंड व भारतीय उपखंड मिळून कधीकाळी एकच विशाल खंड होता. दीड अब्ज वर्षांपूर्वी त्याचे विभाजन झाल्याचे गृहीतक असून, ते सिद्ध करणे आम्हाला पहिल्यांदाच शक्य झाले आहे, असे आयआयटी खरगपूरचे भूवैज्ञानिक देवाशिष उपाध्याय यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. (वृत्तसंस्था)>अशी झाली पृथ्वीवरील उलथापालथभारत आणि अंटार्टिका एकच होते. त्यांना समुद्राने वेगवेगळे केले. पुढे विशाल भूभागाच्या हालचालींमुळे समुद्र बंद होऊन ते पुन्हा संपर्कात आले. एक अब्ज वर्षांपूर्वी ते एकमेकांवर आदळून पुन्हा वेगळे झाले. याच उलथापालथीतून पूर्व घाटातील पर्वतराजी तयार झाली आहे. वेगळे झाल्यानंतर या दोन खंडांत आधी ज्या ठिकाणी जुना समुद्र होता तेथेच पुन्हा नवा समुद्र तयार झाला. हे संशोधन एल्सवायर या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. वेगळे झालेल्या या खंडांची ६०० दशलक्ष वर्षांपूर्वी पुन्हा धडक होऊन पूर्व घाटांत पर्वतांची आणखी एक शृंखला निर्माण झाली.या पर्वतराजीचा काही भाग पूर्व घाटांत व काही मॅडागास्करमध्ये आहे. मॅडागास्कर एकेकाळी भारतीय उपखंडाचा एक भाग होता, असे स्वीत्झर्लंडच्या बर्न विद्यापीठातील भूविज्ञान विभागाचे प्रोफेसर क्लॉस मेझगर यांनी सांगितले. शेवटच्या धडकेनंतर भारत- अंटार्टिका पुन्हा वेगळे झाले आणि आता त्यांच्यात महासागर आहे. पृथ्वीच्या इतिहासात हे दोन्ही खंड अनेकदा एकजीव आणि वेगळे झाल्याचे संशोधन अहवालात म्हटले आहे.