शहरं
Join us  
Trending Stories
1
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
2
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
3
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
4
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
5
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
6
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
7
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
8
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
9
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
10
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
11
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
12
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
14
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
15
Crime: धक्कादायक! आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार
16
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
17
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
18
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
19
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
20
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

अब्जावधी वर्षांपूर्वी भारत होता अंटार्टिकाचा भाग

By admin | Updated: August 5, 2016 04:28 IST

भारतीय उपखंड अब्जावधी वर्षांपूर्वी अंटार्टिकाचा भाग होता या गृहीतकाला बळ देणारे पुरावे शास्त्रज्ञांना सापडले

कोलकाता : भारतीय उपखंड अब्जावधी वर्षांपूर्वी अंटार्टिकाचा भाग होता या गृहीतकाला बळ देणारे पुरावे शास्त्रज्ञांना सापडले आहेत. हे दोन्ही भूभाग मिळून एकच विशाल खंड होता. मात्र, मानव उत्पत्तीपूर्वी प्रस्तरांच्या उलथापालथीमुळे ते एकमेकांपासून वेगळे व पुन्हा एकजीव होण्याची क्रिया अनेकदा घडल्याचे मानले जाते. भारत व स्वीत्झर्लंडचे भूवैज्ञानिक पृथ्वीचे कवच कसे विकसित झाले यावर संशोधन करीत आहेत. त्यांनी भारतीय उपखंडाच्या पूर्व घाटातील प्राचीन दगडांचा अभ्यास केला. त्यातून त्यांना या उपखंडाच्या निर्मितीचे महत्त्वपूर्ण धागेदोरे हाती लागले. अंटार्टिका खंड व भारतीय उपखंड मिळून कधीकाळी एकच विशाल खंड होता. दीड अब्ज वर्षांपूर्वी त्याचे विभाजन झाल्याचे गृहीतक असून, ते सिद्ध करणे आम्हाला पहिल्यांदाच शक्य झाले आहे, असे आयआयटी खरगपूरचे भूवैज्ञानिक देवाशिष उपाध्याय यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. (वृत्तसंस्था)>अशी झाली पृथ्वीवरील उलथापालथभारत आणि अंटार्टिका एकच होते. त्यांना समुद्राने वेगवेगळे केले. पुढे विशाल भूभागाच्या हालचालींमुळे समुद्र बंद होऊन ते पुन्हा संपर्कात आले. एक अब्ज वर्षांपूर्वी ते एकमेकांवर आदळून पुन्हा वेगळे झाले. याच उलथापालथीतून पूर्व घाटातील पर्वतराजी तयार झाली आहे. वेगळे झाल्यानंतर या दोन खंडांत आधी ज्या ठिकाणी जुना समुद्र होता तेथेच पुन्हा नवा समुद्र तयार झाला. हे संशोधन एल्सवायर या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. वेगळे झालेल्या या खंडांची ६०० दशलक्ष वर्षांपूर्वी पुन्हा धडक होऊन पूर्व घाटांत पर्वतांची आणखी एक शृंखला निर्माण झाली.या पर्वतराजीचा काही भाग पूर्व घाटांत व काही मॅडागास्करमध्ये आहे. मॅडागास्कर एकेकाळी भारतीय उपखंडाचा एक भाग होता, असे स्वीत्झर्लंडच्या बर्न विद्यापीठातील भूविज्ञान विभागाचे प्रोफेसर क्लॉस मेझगर यांनी सांगितले. शेवटच्या धडकेनंतर भारत- अंटार्टिका पुन्हा वेगळे झाले आणि आता त्यांच्यात महासागर आहे. पृथ्वीच्या इतिहासात हे दोन्ही खंड अनेकदा एकजीव आणि वेगळे झाल्याचे संशोधन अहवालात म्हटले आहे.