शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

द्वेषाच्या अजेंड्यास विरोध करणाऱ्यांस ठरविले जाते नक्षली - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2020 01:36 IST

सरकारची ‘कळसूत्री बाहुली’ म्हणून काम करणारी एनआयए विरोधाचे प्रतीक मिटवू शकणार नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले.

नवी दिल्ली : केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या ‘द्वेषमूलक अजेंड्या’स जो कोणी विरोध करील, त्यास ‘शहरी नक्षलवादी’ ठरविण्यात येत असल्याची कठोर टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी केली.केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास ‘एनआयए’कडे सोपविण्याचा निर्णय घाईघाईने जाहीर केल्यानंतर दुस-याच दिवशी राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. सरकारची ‘कळसूत्री बाहुली’ म्हणून काम करणारी एनआयए विरोधाचे प्रतीक मिटवू शकणार नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले.राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, ‘जो कोणी द्वेषमूलक अजेंड्यास विरोध करील, तो शहरी नक्षलवादी ठरतो. कोरेगाव भीमा हे प्रतिकाराचे प्रतीक असून सरकारची एनआयए कठपुतळी ते मिटवू शकणार नाही’ २०१८ मध्ये घडलेल्या कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या चौकशीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक बैठक घेतली होती. त्यानंतर शुक्रवारी काही तासांतच केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास घाईघाईने राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) दिला. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकार संतप्त झाले आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी