शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

गरीब कुटुंबात जन्मणारेही स्वप्न पाहू शकतात - मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:19 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अनेक लोकांनी थट्टा केली आणि एका मागास कुटुंबातील मुलाने प्रगती करु नये

नवी दिल्ली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अनेक लोकांनी थट्टा केली आणि एका मागास कुटुंबातील मुलाने प्रगती करु नये यासाठी प्रयत्न केले, असे सांंगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. तथापि, आजचा भारत हा पूर्ण वेगळा आणि गरीब व मागासवर्गीयांचा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.मोदी म्हणाले की, डॉ. आंबेडकरांनी हे दाखवून दिले की, यशस्वी होण्यासाठी संपन्न कुटुंबातच जन्म घेणे आवश्यक नाही. तर, भारतात गरीब कुटुंबात जन्म घेणारेही स्वप्न पाहू शकतात आणि हे स्वप्न पूर्ण करण्याची हिंमत ठेऊ शकतात.‘मन की बात’ कार्यक्रमात त्यांनी महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री, राम मनोहर लोहिया, चरण सिंह आणि देवीलाल यासारख्या नेत्यांच्या भूमिकेचे कौतुक केले. या नेत्यांनी राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत कृषि आणि शेतकऱ्यांचे महत्व ओळखले होते, असेही ते म्हणाले.मोदी म्हणाले की, डॉ. आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल ते ५ मे या काळात ‘ग्राम स्वराज अभियान’आयोजित करण्यात येणार आहे. याअंतर्गत पूर्ण भारतात ग्राम विकास, गरीबांच्या कल्याणासाठी आणि सामाजिक न्याय याबाबत कार्यक्रम होतील.