शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

त्यामुळेच कुनो पालपूरची चित्ता अभयारण्यासाठी निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2022 06:47 IST

सिंह व पट्टेदार वाघाच्या उलट चित्त्यांना घनदाट जंगल मानवत नाही. ते गवताळ मैदानात राहणे अधिक पसंत करतात.

शरद गुप्तालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : नामिबीयातून आणण्यात येणाऱ्या चित्त्यांसाठी अधिवास म्हणून मध्य प्रदेशातील बांधवगड, पेंच आणि पन्ना यांसारख्या जगप्रसिद्ध वन्यजीव अभयारण्यांऐवजी कुनो-पालपूरच्या जंगलाची निवड करण्यात आली. विस्तीर्ण गवताळ प्रदेश व भक्ष्याच्या मुबलक उपलब्धतेमुळे चित्त्यांसाठी हे जंगलच अधिक पोषक राहणार असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

सिंह व पट्टेदार वाघाच्या उलट चित्त्यांना घनदाट जंगल मानवत नाही. ते गवताळ मैदानात राहणे अधिक पसंत करतात. कुनो पालपूरच्या ७४८ चौरस किलोमीटरच्या जंगलामध्ये विशाल गवताळ मैदान असून, भक्ष्याचीही ददात नाही. सोबतच तेथे मनुष्याचाही हस्तक्षेप नाही, असे वन्यजीव तज्ज्ञांचे म्हणणे आहे. वाइल्ड लाइफ ट्रस्ट ऑफ इंडियाचे डॉ. एन. के. रंजीत सिंह व वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे डॉ. वाय. व्ही. झाला यांनी २००९ पासून चित्त्यांना भारतात आणण्याची शक्यता तपासणे सुरू केले होते. त्यांच्या अभ्यासाच्या आधारेच जानेवारी २०२० मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या योजनेला मंजुरी दिली होती.

२०१० ते २०१२ दरम्यान मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात व उत्तर प्रदेशातील जवळपास दहा जंगलांचे सर्वेक्षण केल्यानंतर चित्त्यांच्या अधिवासासाठी कुनो पालपूर जंगल सर्वात अनुकूल असल्याचे आढळून आले होते. या जंगलातील २४ गावे रिकामी करून तेथील रहिवाशांना जंगलाबाहेर विस्थापित करण्यात आले आहे. त्यामुळे चित्त्यांचा मानवाशी संघर्ष होण्याची शक्यता कमी आहे.

सिंह आणि वाघ घनदाट जंगलात सावज पकडणे पसंत करतात. कारण, ते पूर्ण क्षमतेने केवळ ४० ते ५० मीटरच धावू शकतात. याउलट चित्ते जवळपास अर्धा ते एक किलोमीटरपर्यंत विजेच्या वेगाने धावतात. त्याचबरोबर ते झुंडीने शिकार करतात. कुनो पालपूरमध्ये चितळ, सांबर, रानडुक्कर, नीलगाय व बाराशिंगा यांसारख्या सावजाची मोठ्या प्रमाणात उपलब्धता आहे. त्यामुळे चित्त्यांचे अस्तित्व टिकून राहण्यासह त्यांच्या वंशवृद्धीची शक्यता अधिक आहे, असे प्रसिद्ध वन्यजीवतज्ज्ञ अजय सुरी म्हणाले.

टॅग्स :forestजंगलMadhya Pradeshमध्य प्रदेश