शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

त्यामुळेच कुनो पालपूरची चित्ता अभयारण्यासाठी निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2022 06:47 IST

सिंह व पट्टेदार वाघाच्या उलट चित्त्यांना घनदाट जंगल मानवत नाही. ते गवताळ मैदानात राहणे अधिक पसंत करतात.

शरद गुप्तालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : नामिबीयातून आणण्यात येणाऱ्या चित्त्यांसाठी अधिवास म्हणून मध्य प्रदेशातील बांधवगड, पेंच आणि पन्ना यांसारख्या जगप्रसिद्ध वन्यजीव अभयारण्यांऐवजी कुनो-पालपूरच्या जंगलाची निवड करण्यात आली. विस्तीर्ण गवताळ प्रदेश व भक्ष्याच्या मुबलक उपलब्धतेमुळे चित्त्यांसाठी हे जंगलच अधिक पोषक राहणार असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

सिंह व पट्टेदार वाघाच्या उलट चित्त्यांना घनदाट जंगल मानवत नाही. ते गवताळ मैदानात राहणे अधिक पसंत करतात. कुनो पालपूरच्या ७४८ चौरस किलोमीटरच्या जंगलामध्ये विशाल गवताळ मैदान असून, भक्ष्याचीही ददात नाही. सोबतच तेथे मनुष्याचाही हस्तक्षेप नाही, असे वन्यजीव तज्ज्ञांचे म्हणणे आहे. वाइल्ड लाइफ ट्रस्ट ऑफ इंडियाचे डॉ. एन. के. रंजीत सिंह व वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे डॉ. वाय. व्ही. झाला यांनी २००९ पासून चित्त्यांना भारतात आणण्याची शक्यता तपासणे सुरू केले होते. त्यांच्या अभ्यासाच्या आधारेच जानेवारी २०२० मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या योजनेला मंजुरी दिली होती.

२०१० ते २०१२ दरम्यान मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात व उत्तर प्रदेशातील जवळपास दहा जंगलांचे सर्वेक्षण केल्यानंतर चित्त्यांच्या अधिवासासाठी कुनो पालपूर जंगल सर्वात अनुकूल असल्याचे आढळून आले होते. या जंगलातील २४ गावे रिकामी करून तेथील रहिवाशांना जंगलाबाहेर विस्थापित करण्यात आले आहे. त्यामुळे चित्त्यांचा मानवाशी संघर्ष होण्याची शक्यता कमी आहे.

सिंह आणि वाघ घनदाट जंगलात सावज पकडणे पसंत करतात. कारण, ते पूर्ण क्षमतेने केवळ ४० ते ५० मीटरच धावू शकतात. याउलट चित्ते जवळपास अर्धा ते एक किलोमीटरपर्यंत विजेच्या वेगाने धावतात. त्याचबरोबर ते झुंडीने शिकार करतात. कुनो पालपूरमध्ये चितळ, सांबर, रानडुक्कर, नीलगाय व बाराशिंगा यांसारख्या सावजाची मोठ्या प्रमाणात उपलब्धता आहे. त्यामुळे चित्त्यांचे अस्तित्व टिकून राहण्यासह त्यांच्या वंशवृद्धीची शक्यता अधिक आहे, असे प्रसिद्ध वन्यजीवतज्ज्ञ अजय सुरी म्हणाले.

टॅग्स :forestजंगलMadhya Pradeshमध्य प्रदेश