शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

"हा हिंदुस्थान आहे आणि बहुसंख्याकांच्या मर्जीने चालेल देश"; इलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 16:22 IST

Shekhar Kumar Yadav: इलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांनी केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमात त्यांनी हे विधान केले. 

Allahabad High Court Judge: 'हे बोलण्यात अजिबात संकोच नाही की, देश, हिंदुस्थानात राहणाऱ्या बहुसंख्याक लोकांच्या मर्जीने चालणार. कायदा आहे आणि कायदा साहजिकच बहुसंख्याकाच्या मतानुसार काम करतो", असे विधान इलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांनी केले. 

लाईव्ह लॉ वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, हे कुटुंब वा समाजाच्या दृष्टिकोणातून बघायला हवे. तेच स्वीकारलं जावं, जे बहुसंख्याकांच्या कल्याणासाठी आणि आनंदासाठी फायदेशीर आहे, असे ते म्हणाले. 

प्रयागराजमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या वतीने एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. समान नागरी कायदा विषयावर बोलताना त्यांनी हे विधान केले. या कार्यक्रमाला न्यायमूर्ती दिनेश पाठक हेही उपस्थित होते. 

न्यायमूर्ती यादव शेखर कुमार यादव मुस्लीम समुदायाचा उल्लेख न करता म्हणाले, "अनेक पत्नी ठेवणे, तीन तलाक आणि हलाला सारख्या प्रथा अस्वीकार्य आहे. जर तुम्ही म्हणत असाल की, पर्सनल लॉ याला परवानगी देतो, तरी तो स्वीकारला जाणार नाही."

"महिला आपल्या शास्त्रात आणि वेदांमध्ये देवी समान मानले आहे, त्यामुळे आपण स्त्रियांचा अपमान करू शकत नाही. चार पत्नी ठेवणे, हलाला करणे किंवा तलाकच्या अधिकाराचा दावा करू शकत नाही. आम्हाला तीन तलाक देण्याचा आणि महिलांचे भरणपोषण करण्याचा अधिकार आहे, पण हा अधिकार चालणार नाही", असेही ते म्हणाले. 

न्यायमूर्ती यादव म्हणाले, "हिंदू धर्मात बाल विवाह आणि सती प्रथेसारखे सामाजिक दोष होते पण, राजाराम मोहन राय यांच्यासारख्या सुधारकांनी या प्रथा संपवण्यासाठी संघर्ष केला. आपल्या देशात आपल्याला शिकवलं जातं की, लहान पशु-पक्ष्यांना त्रास देऊ नका. अगदी मुंगीलाही मारू नका. त्यामुळेच आपण सहिष्णु आणि दयाळू आहोत."

न्यायमूर्ती यादव यांनी देशात समान नागरी कायदा लागू होईल अशी आशा व्यक्त केली. "अयोध्येमध्ये राम मंदिर निर्माण होण्यास वेळ लागला, पण तो दिवस दूर नाही जेव्हा हे स्पष्ट होईल की एक देश आहे, तर एक कायदा आणि एक शिक्षा असायला हवी. जे लोक फसवतात वा आपला अजेंडा चालवण्याचा प्रयत्न करतात, ते जास्त काळ टिकणार नाही", असेही ते म्हणाले.