शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
3
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
4
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
5
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
6
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
7
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
8
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
9
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
10
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
11
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
12
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
13
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
14
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
15
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
16
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
17
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
18
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
19
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
20
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर

ही तर मनुस्मृतीविरुद्ध संविधानाची लढाई; राहुल गांधी यांचे लोकसभेत चर्चेवेळी कठोर टीकास्त्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2024 05:31 IST

सावरकरांनी संविधानात कोणतीच बाब भारतीय नसल्याचे म्हटले होते. सावरकरांनी संविधानाच्या तुलनेत मनुस्मृतीलाच महत्त्व दिले होते, असे राहुल गांधी म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी लोकसभेत संविधानावर चर्चेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेल्या एका भाष्याचा हवाला देत, भाजप तसेच केंद्र सरकारवर कठोर टीका केली. एकलव्याचा जसा अंगठा कापून घेतला गेला, तसेच देशातील युवकांचे अंगठे कापले जात आहेत, असे सांगून आज देशात 'संविधान विरुद्ध मनुस्मृती' अशी लढाई असल्याचे त्यांनी नमूद केले.

संविधानाच्या ७५ वर्षांच्या गौरवयात्रेवर लोकसभेत सुरू असलेल्या चर्चेत सहभागी होताना राहुल गांधी यांनी दावा केला की, सावरकरांनी संविधानात कोणतीच बाब भारतीय नसल्याचे म्हटले होते. सावरकरांनी संविधानाच्या तुलनेत मनुस्मृतीलाच महत्त्व दिले होते, असेही राहुल म्हणाले.

याच संसदेत आम्ही जात जनगणना लागू करू, असे वचन दिले होते. ५० टक्के आरक्षणाची भिंत आम्ही पाडून दाखवू, असा पुनरुच्चारही राहुल यांनी केला.

एकलव्याचा दाखला

एकलव्याने जशी तपस्या केली होती तसे देशातील युवक सकाळ- पासून वेगवेगळ्ळ्या परीक्षांची तयारी करतात. मात्र, सरकारने 'अग्निवीर' लागू केले आणि एकप्रकारे युवकांचा अंगठाच कापला. देशात परीक्षेचे पेपर फुटतात तेव्हा एक प्रकारे युवकांचे अंगठेच कापले जातात, असेही ते म्हणाले.

'...हा तर सावरकरांचा अपमान'

सत्ताधारी पक्षाचे लोक संविधान रक्षणाच्या गोष्टी करतात, म्हणजे ते आपले 'सर्वोच्च नेते' सावरकर यांचा एकप्रकारे अपमानच करतात, अशी टीका राहुल यांनी केली. विरोधी पक्ष सत्तेत आल्यानंतर जातीय जनगणना करील आणि आरक्षणाचा ५० टक्क्यांचा अडथळाही दूर करील, असे राहुल गांधी म्हणाले.

'शेतकऱ्यांचा अंगठा कापण्याचे काम करता...'

आपण एका उद्योगपतीला जेव्हा धारावी प्रकल्प, बंदरे आणि विमानतळांची कामे देता, तेव्हा एक प्रकारे देशाचा अंगठाच कापता. शेतकरी किमान हमीभावाची मागणी करतो, तेव्हा आपण दोन बड्या उद्योगपतींनाच लाभ देत शेतकऱ्यांचा अंगठा कापण्याचे काम करता. इंदिरा गांधी यांना मी सावरकर यांच्याबद्दल विचारले, तेव्हा त्यांनी सांगितले होते की, सावरकरांनी इंग्रजांशी जुळवून घेत लेखी माफी मागितली होती. तेव्हा इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या, महात्मा गांधी, पंडित नेहरू तुरुंगात गेले; परंतु सावरकरांनी माफी मागितली होती.

 

टॅग्स :ParliamentसंसदRahul Gandhiराहुल गांधीlok sabhaलोकसभा