शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

ही तर मनुस्मृतीविरुद्ध संविधानाची लढाई; राहुल गांधी यांचे लोकसभेत चर्चेवेळी कठोर टीकास्त्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2024 05:31 IST

सावरकरांनी संविधानात कोणतीच बाब भारतीय नसल्याचे म्हटले होते. सावरकरांनी संविधानाच्या तुलनेत मनुस्मृतीलाच महत्त्व दिले होते, असे राहुल गांधी म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी लोकसभेत संविधानावर चर्चेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेल्या एका भाष्याचा हवाला देत, भाजप तसेच केंद्र सरकारवर कठोर टीका केली. एकलव्याचा जसा अंगठा कापून घेतला गेला, तसेच देशातील युवकांचे अंगठे कापले जात आहेत, असे सांगून आज देशात 'संविधान विरुद्ध मनुस्मृती' अशी लढाई असल्याचे त्यांनी नमूद केले.

संविधानाच्या ७५ वर्षांच्या गौरवयात्रेवर लोकसभेत सुरू असलेल्या चर्चेत सहभागी होताना राहुल गांधी यांनी दावा केला की, सावरकरांनी संविधानात कोणतीच बाब भारतीय नसल्याचे म्हटले होते. सावरकरांनी संविधानाच्या तुलनेत मनुस्मृतीलाच महत्त्व दिले होते, असेही राहुल म्हणाले.

याच संसदेत आम्ही जात जनगणना लागू करू, असे वचन दिले होते. ५० टक्के आरक्षणाची भिंत आम्ही पाडून दाखवू, असा पुनरुच्चारही राहुल यांनी केला.

एकलव्याचा दाखला

एकलव्याने जशी तपस्या केली होती तसे देशातील युवक सकाळ- पासून वेगवेगळ्ळ्या परीक्षांची तयारी करतात. मात्र, सरकारने 'अग्निवीर' लागू केले आणि एकप्रकारे युवकांचा अंगठाच कापला. देशात परीक्षेचे पेपर फुटतात तेव्हा एक प्रकारे युवकांचे अंगठेच कापले जातात, असेही ते म्हणाले.

'...हा तर सावरकरांचा अपमान'

सत्ताधारी पक्षाचे लोक संविधान रक्षणाच्या गोष्टी करतात, म्हणजे ते आपले 'सर्वोच्च नेते' सावरकर यांचा एकप्रकारे अपमानच करतात, अशी टीका राहुल यांनी केली. विरोधी पक्ष सत्तेत आल्यानंतर जातीय जनगणना करील आणि आरक्षणाचा ५० टक्क्यांचा अडथळाही दूर करील, असे राहुल गांधी म्हणाले.

'शेतकऱ्यांचा अंगठा कापण्याचे काम करता...'

आपण एका उद्योगपतीला जेव्हा धारावी प्रकल्प, बंदरे आणि विमानतळांची कामे देता, तेव्हा एक प्रकारे देशाचा अंगठाच कापता. शेतकरी किमान हमीभावाची मागणी करतो, तेव्हा आपण दोन बड्या उद्योगपतींनाच लाभ देत शेतकऱ्यांचा अंगठा कापण्याचे काम करता. इंदिरा गांधी यांना मी सावरकर यांच्याबद्दल विचारले, तेव्हा त्यांनी सांगितले होते की, सावरकरांनी इंग्रजांशी जुळवून घेत लेखी माफी मागितली होती. तेव्हा इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या, महात्मा गांधी, पंडित नेहरू तुरुंगात गेले; परंतु सावरकरांनी माफी मागितली होती.

 

टॅग्स :ParliamentसंसदRahul Gandhiराहुल गांधीlok sabhaलोकसभा