शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

Fact Check : मोठी बातमी! कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत केंद्र सरकार देतेय 5000 रुपये? PIB नं दिली महत्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2022 18:50 IST

देशात पुन्हा एकदा कोरोनाची तिसरी लाट आली आहे. अशा स्थितीत सोशल मीडियावर अनेक प्रकारचे मेसेज व्हायरल होत आहेत. यातच, भारत सरकार कोरोना फंडातून 5000 रुपये देत असल्याचा दावाही एका मेसेजमध्ये करण्यात आला आहे. 

नवी दिल्ली - कोरोना काळात केंद्र सरकारने देशातील गरीब आणि गरजूंना विविध प्रकारची मदत केली. कुणावरही अन्नासाठी चिंतित होण्याची वेळ येऊ नये, असा या मागचा हेतू होता. देशात पुन्हा एकदा कोरोनाची तिसरी लाट आली आहे. अशा स्थितीत सोशल मीडियावर अनेक प्रकारचे मेसेज व्हायरल होत आहेत. यातच, भारत सरकार कोरोना फंडातून 5000 रुपये देत असल्याचा दावाही एका मेसेजमध्ये करण्यात आला आहे. 

सरकार देतेय 5000 रुपये -कोरोना काळात सोशल मीडियावर अनेक फेक मेसेज व्हायरल होत आहेत. अशाच व्हायरल होत असलेल्या एका मेसेजमध्ये, भारत सरकारकडून 5000 रुपये देण्यात येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. एवढेच नाही, तर आपल्यालाही हे 5000 रुपये हवे असल्यास लगेच फॉर्म भरा, असेही या मेसेजमध्ये म्हणण्यात आले आहे.

पीआयबीने केले फॅक्ट चेक -जेव्हा PIB ला या व्हायरल मेसेजसंदर्भात माहिती मिळाली तेव्हा PIB ने त्या मेसेजची सत्यता तपासली. यानंतर, हा मेसेज पूर्णपणे खोटा असल्याचे पीआयबीने म्हटले आहे. यासंदर्भात, पीआयबीने आपल्या अधिकृत ट्विटरवर ट्विट करून माहितीही दिली आहे.

PIB ने केले ट्विट -पीआयबीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, संबंधित फेक मेसेजमध्ये दावा करण्यात आला आहे, की भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडून कोरोना फंडअंतर्गत 5000 रुपये दिले जात आहेत. हा मेसेज पूर्णपणे फेक आहे. अशा प्रकारचे फेक मेसेज फॉरवर्ड करू नका. अशा संशयास्पद वेबसाइटवर आपली कोणतीही वैयक्तिक माहिती शेअर करू नका. 

अशा प्रकारच्या मेसेजपासून सावध राहा -फॅक्ट चेक केल्यानंतर पीआयबीने हा संबंधित मेसेज पूर्णपणे फेक असल्याचे म्हटले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अशा मेसेजपासून प्रत्येकाने सावध रहायला हवे. 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या