शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
3
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
4
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
5
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
6
रक्षा बंधन २०२५: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
7
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
8
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
9
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
10
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
11
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
12
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
13
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
14
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
15
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
16
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
18
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
19
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
20
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान

काश्मीरमध्ये तिस-या दहशतवाद्याचा खात्मा, चकमक सुरूच

By admin | Updated: July 10, 2017 15:00 IST

जम्मू-काश्मीरमधील नौगाम सेक्टरमध्ये तिस-या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास भारतीय लष्कराच्या जवानांना यश मिळाले आहे.

ऑनलाइन लोकमत
जम्मू-काश्मीर, दि. 10 - जम्मू-काश्मीरमधील नौगाम सेक्टरमध्ये तिस-या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास भारतीय लष्कराच्या जवानांना यश मिळाले आहे.
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील नौगाम सेक्टरमधील नियंत्रण रेषेजवळ काल रात्रीपासून दहशतवादी आणि लष्कर यांच्यात चकमक सुरु आहे. नौगाम सेक्टरमध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न लष्कराच्या जवानांनी हाणून पाडला आहे. आत्तापर्यंत लष्कराच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला असून अद्याप सर्च ऑपरेशन सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. 
लष्करी अधिका-यांने दिलेल्या माहितीनुसार, नौगाम सेक्टरमधील नियंत्रण रेषेजवळ काल रात्री काही संशयास्पद हालचाली दिसून आल्या. त्यानंतर लष्कराने सर्च ऑपरेशन हाती घेतले आणि सकाळी दहशतवादी घुसल्याचे समजते. दहशवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देत लष्कराच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले. त्यानंतर सुद्धा या परिसरात सर्च ऑपरेशन सुरु ठेवले होते. यानंतर दुपारच्या सुमारास तिस-या एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला.

(जम्मू काश्मीर : दहशतवादी हल्ल्यात 3 जवान जखमी)

(बुरहान वानीला ठार मारल्याला झालं एक वर्ष, काश्मीरमध्ये अनेकठिकाणी संचारबंदी)

(कुरापती पाकिस्तान : गोळीबारात एक जवान शहीद, पत्नीचाही झाला मृत्यू)

दुसरीकडे,  दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले होते. नियंत्रण रेषेजवळ पूंछ सेक्टरमध्ये शनिवारी (8 जुलै ) सकाळपासून पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात एक जवान शहीद झाला. तर, सीमेवर सुरू असलेल्या या गोळीबारात जवानाच्या पत्नीचाही मृत्यू झाला आहे. पाकिस्तानच्या या कुरापतींना भारतीय लष्कराच्या जवानांनी जशास तसे चोख प्रत्युत्तर दिले. 
 
काश्मीरमध्ये अनेकठिकाणी संचारबंदी...
बुरहान वानी या दहशतवाद्याला लष्कराने कंठस्नान घातलेल्या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे येथील फुटीरतावाद्यांवर चाप बसवण्यासाठी जम्मू काश्मीरमधील तीन ठिकाणी संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. कायदा व सुरक्षा राखण्यासाठी लष्कराचे तसेच निमलष्करी दलाचे जवान जागोजागी तैनात करण्यात आले आहेत. वानीचं मूळगाव असलेल्या पुलवामा जिल्ह्यातील त्रालमध्येही संचारबंदी आहे. काश्मिर खोऱ्यामध्ये शांतता रहावी म्हणून खबरदारी घेण्यात येत असल्याचे लष्कराने स्पष्ट केले आहे.