शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये तिस-या दहशतवाद्याचा खात्मा, चकमक सुरूच

By admin | Updated: July 10, 2017 15:00 IST

जम्मू-काश्मीरमधील नौगाम सेक्टरमध्ये तिस-या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास भारतीय लष्कराच्या जवानांना यश मिळाले आहे.

ऑनलाइन लोकमत
जम्मू-काश्मीर, दि. 10 - जम्मू-काश्मीरमधील नौगाम सेक्टरमध्ये तिस-या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास भारतीय लष्कराच्या जवानांना यश मिळाले आहे.
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील नौगाम सेक्टरमधील नियंत्रण रेषेजवळ काल रात्रीपासून दहशतवादी आणि लष्कर यांच्यात चकमक सुरु आहे. नौगाम सेक्टरमध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न लष्कराच्या जवानांनी हाणून पाडला आहे. आत्तापर्यंत लष्कराच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला असून अद्याप सर्च ऑपरेशन सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. 
लष्करी अधिका-यांने दिलेल्या माहितीनुसार, नौगाम सेक्टरमधील नियंत्रण रेषेजवळ काल रात्री काही संशयास्पद हालचाली दिसून आल्या. त्यानंतर लष्कराने सर्च ऑपरेशन हाती घेतले आणि सकाळी दहशतवादी घुसल्याचे समजते. दहशवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देत लष्कराच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले. त्यानंतर सुद्धा या परिसरात सर्च ऑपरेशन सुरु ठेवले होते. यानंतर दुपारच्या सुमारास तिस-या एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला.

(जम्मू काश्मीर : दहशतवादी हल्ल्यात 3 जवान जखमी)

(बुरहान वानीला ठार मारल्याला झालं एक वर्ष, काश्मीरमध्ये अनेकठिकाणी संचारबंदी)

(कुरापती पाकिस्तान : गोळीबारात एक जवान शहीद, पत्नीचाही झाला मृत्यू)

दुसरीकडे,  दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले होते. नियंत्रण रेषेजवळ पूंछ सेक्टरमध्ये शनिवारी (8 जुलै ) सकाळपासून पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात एक जवान शहीद झाला. तर, सीमेवर सुरू असलेल्या या गोळीबारात जवानाच्या पत्नीचाही मृत्यू झाला आहे. पाकिस्तानच्या या कुरापतींना भारतीय लष्कराच्या जवानांनी जशास तसे चोख प्रत्युत्तर दिले. 
 
काश्मीरमध्ये अनेकठिकाणी संचारबंदी...
बुरहान वानी या दहशतवाद्याला लष्कराने कंठस्नान घातलेल्या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे येथील फुटीरतावाद्यांवर चाप बसवण्यासाठी जम्मू काश्मीरमधील तीन ठिकाणी संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. कायदा व सुरक्षा राखण्यासाठी लष्कराचे तसेच निमलष्करी दलाचे जवान जागोजागी तैनात करण्यात आले आहेत. वानीचं मूळगाव असलेल्या पुलवामा जिल्ह्यातील त्रालमध्येही संचारबंदी आहे. काश्मिर खोऱ्यामध्ये शांतता रहावी म्हणून खबरदारी घेण्यात येत असल्याचे लष्कराने स्पष्ट केले आहे.