शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

दिवाळीच्या मुहूर्तावर धावणार तिसरी ‘राजधानी’, मुंबई-दिल्ली प्रवास आणखी जलद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 04:20 IST

बहुचर्चित आणि वेगवान अशी तिसरी राजधानी एक्स्प्रेस १६ आॅक्टोबरपासून धावणार आहे. मुंबई-दिल्ली मार्गावर आठवड्यातील तीन दिवस ही ट्रेन धावणार आहे.

मुंबई : बहुचर्चित आणि वेगवान अशी तिसरी राजधानी एक्स्प्रेस १६ आॅक्टोबरपासून धावणार आहे. मुंबई-दिल्ली मार्गावर आठवड्यातील तीन दिवस ही ट्रेन धावणार आहे. या राजधानी एक्स्प्रेसमुळे मुंबई-दिल्ली हे १ हजार ३६५ किलोमीटरचे अंतर १३ तास ५५ मिनिटांत पूर्ण करता येईल. नवीन एक्स्प्रेसमध्ये सेकंड वातानुकूलित ७०० ते ८०० आणि तृतीय वातानुकूलितसाठी ५०० ते ६०० रुपये मोजावे लागणार आहेत. सध्या धावत असलेल्या राजधानीच्या तुलनेत १९ टक्के भाडे कमी असणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.देशाची राजधानी आणि आर्थिक राजधानी यांच्यातील अंतर जलद गतीने पूर्ण करण्यासाठी नवीन राजधानी एक्स्प्रेस आणण्यात आली. नव्या एक्स्प्रेसचा वेग वाढविण्यासाठी आधुनिक डब्ल्यूएपी ५ श्रेणीतील २ इंजिन जोडण्यात येणार आहेत. दोन्ही इंजिन ५ हजार ४०० अश्वशक्ती आहे. यांची कमाल वेगमर्यादा १३० किलोमीटर प्रतितास आहे.एक प्रथम वातानुुकूलित, दोन द्वितीय वातानुकूलित, १२ तृतीय वातानुकूलित आणि एक पेन्ट्री बोगी असे स्वरूप विशेष राजधानीचे असणार आहे. नवीन एक्स्प्रेसचे तिकीट दर बदलत्या दरांनुसार आकारले जाणार नसल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.विशेष राजधानी एक्स्प्रेसनुसार मुंबई-दिल्ली हे अंतर १३ तास ५५ मिनिटांत पूर्ण करण्यात येणार आहे. एकच रेक असल्यामुळे आठवड्यातून तीन दिवस ही गाडी धावणार आहे. सध्या धावत असलेल्या राजधानी एक्स्प्रेसला मुंबई-दिल्ली हे अंतर पूर्ण करण्यासाठी १५ तास ५० मिनिटांचा वेळ लागत आहे. सद्यस्थितीत मुंबई-दिल्ली मार्गावर २ राजधानी एक्स्प्रेससह ३० मेल एक्स्प्रेस धावतात.विशेष राजधानी मुंबई-दिल्लीवांद्रे टर्मिनस येथून दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी दिल्लीच्या दिशेने ही गाडी मार्गस्थ होणार आहे. दुपारी ४.०५ मिनिटांनी ही राजधानी सुटणार असून, दुसºया दिवशी सकाळी ६ वाजता हजरत निजामुद्दीन (दिल्ली) स्थानकावर पोहोचणार आहे.

टॅग्स :Rajdhani Expressराजधानी एक्स्प्रेसMumbaiमुंबईNew Delhiनवी दिल्ली