शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

दिवाळीच्या मुहूर्तावर धावणार तिसरी ‘राजधानी’, मुंबई-दिल्ली प्रवास आणखी जलद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 04:20 IST

बहुचर्चित आणि वेगवान अशी तिसरी राजधानी एक्स्प्रेस १६ आॅक्टोबरपासून धावणार आहे. मुंबई-दिल्ली मार्गावर आठवड्यातील तीन दिवस ही ट्रेन धावणार आहे.

मुंबई : बहुचर्चित आणि वेगवान अशी तिसरी राजधानी एक्स्प्रेस १६ आॅक्टोबरपासून धावणार आहे. मुंबई-दिल्ली मार्गावर आठवड्यातील तीन दिवस ही ट्रेन धावणार आहे. या राजधानी एक्स्प्रेसमुळे मुंबई-दिल्ली हे १ हजार ३६५ किलोमीटरचे अंतर १३ तास ५५ मिनिटांत पूर्ण करता येईल. नवीन एक्स्प्रेसमध्ये सेकंड वातानुकूलित ७०० ते ८०० आणि तृतीय वातानुकूलितसाठी ५०० ते ६०० रुपये मोजावे लागणार आहेत. सध्या धावत असलेल्या राजधानीच्या तुलनेत १९ टक्के भाडे कमी असणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.देशाची राजधानी आणि आर्थिक राजधानी यांच्यातील अंतर जलद गतीने पूर्ण करण्यासाठी नवीन राजधानी एक्स्प्रेस आणण्यात आली. नव्या एक्स्प्रेसचा वेग वाढविण्यासाठी आधुनिक डब्ल्यूएपी ५ श्रेणीतील २ इंजिन जोडण्यात येणार आहेत. दोन्ही इंजिन ५ हजार ४०० अश्वशक्ती आहे. यांची कमाल वेगमर्यादा १३० किलोमीटर प्रतितास आहे.एक प्रथम वातानुुकूलित, दोन द्वितीय वातानुकूलित, १२ तृतीय वातानुकूलित आणि एक पेन्ट्री बोगी असे स्वरूप विशेष राजधानीचे असणार आहे. नवीन एक्स्प्रेसचे तिकीट दर बदलत्या दरांनुसार आकारले जाणार नसल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.विशेष राजधानी एक्स्प्रेसनुसार मुंबई-दिल्ली हे अंतर १३ तास ५५ मिनिटांत पूर्ण करण्यात येणार आहे. एकच रेक असल्यामुळे आठवड्यातून तीन दिवस ही गाडी धावणार आहे. सध्या धावत असलेल्या राजधानी एक्स्प्रेसला मुंबई-दिल्ली हे अंतर पूर्ण करण्यासाठी १५ तास ५० मिनिटांचा वेळ लागत आहे. सद्यस्थितीत मुंबई-दिल्ली मार्गावर २ राजधानी एक्स्प्रेससह ३० मेल एक्स्प्रेस धावतात.विशेष राजधानी मुंबई-दिल्लीवांद्रे टर्मिनस येथून दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी दिल्लीच्या दिशेने ही गाडी मार्गस्थ होणार आहे. दुपारी ४.०५ मिनिटांनी ही राजधानी सुटणार असून, दुसºया दिवशी सकाळी ६ वाजता हजरत निजामुद्दीन (दिल्ली) स्थानकावर पोहोचणार आहे.

टॅग्स :Rajdhani Expressराजधानी एक्स्प्रेसMumbaiमुंबईNew Delhiनवी दिल्ली