शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
2
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
3
सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लाागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
4
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
5
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
6
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
7
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
8
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
9
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
10
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
11
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
12
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
13
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
14
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
15
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
16
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
17
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
18
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
19
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
20
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन कायम ठेवून काही सेवा सुरू करण्याचा विचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2020 05:45 IST

ई-कॉमर्स कंपन्यांना आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यास परवानगी द्यावी की नाही? ४० हजार कोटींच्या अन्य वस्तूं रस्त्यावरील ट्रक आणि कारखान्याबाहेर वितरणासाठी तयार आहेत.

नवी दिल्ली : लॉकडाऊन चालू ठेवून टप्प्याटप्प्यात नियोजनबद्धपद्धतीने काही भागात व्यवहार सुरू करू करण्याची परवानगी द्यावी की नाही, यावर केंद्र सरकार विचार करीत आहे. चाचणीचे प्रमाण वाढविल्यानंतरही दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. संसर्गित रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता असलेले संवदेशनील अति असुरक्षित भाग सील करून अन्य भागात लॉकडाऊन कायम ठेवायचे. तसेच १५ एप्रिलनंतर कोणत्या भागात व्यवहार सुरू करता येऊ शकतात, अशा भागांची यादीच सरकारकडे आहे.१४ एप्रिलपासून सोंगणीचा हंगाम सुरु होत असल्याने बाजारात अन्नधान्यासह अन्य शेतमालाची आवक होणार असल्याने अन्नप्रक्रिया उद्योग सुरु करण्याचा मुद्दा कार्यसूचीत अग्रणी आहे.ई-कॉमर्स कंपन्यांना आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यास परवानगी द्यावी की नाही? ४० हजार कोटींच्या अन्य वस्तूं रस्त्यावरील ट्रक आणि कारखान्याबाहेर वितरणासाठी तयार आहेत. राष्ट्रीय महामार्गावर ट्रक वाहतूक आणि सेवा केंद्र सुरु आहे. तथापि, रस्त्यालगतची हॉटेल्स, खानपानगृह आणि संबंधित व्यवहार बंदआहेत.सरकारी किंवा खाजगी क्षेत्रातील दारू दुकाने महसूलाचा मुख्य स्रोत आहेत. मर्यादित अवधीसाठी दारूची दुकाने खुली ठेवावीत का? या विषय सरकारच्या विचाराधी आहे. नळ कारागिर, इलेक्ट्रेशियन्स आणि इतर दुरुस्तीशी संबंधित व्यवहार परवान्यासह मर्यादित अवधीत कसे सुरु ठेवता येतील? तसेच अ‍ॅप्सआधारित टॅक्सीसेवा मर्यादित अवधीत सुरु करता येईल का? यासोबतच खाजगी वाहनांना कठोर नियमातहत वाहतुकीसाठी परवानगी देता येईल का? हा मुद्याही सरकारच्या विचाराधीन आहे.मेट्रो आणि बससेवा पूर्णत: बंद ठेवली जाईल; परंतु एका प्रवाशासह तीनचाकी वाहनांना (आॅटोरिक्षा) प्रवासी वाहतुकीची परवागी देण्याचा प्रस्तावही विचाराधीन आहे.मोबाईलची दुकाने तसेच मोबाईल फोनशी संबंधित कंपन्यांचे व्यवहार मर्यादित वेळेसाठी सुरू ठेवणे.शेत मजूर आणि कारख्यान्यातील कामगारांना घरातून बाहेर काढणे जरुरी आहे. पण हे कसे करावे, हा मोठा प्रश्न आहे.रेल्वे व वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी आवश्यक उद्योग सुरु करणे आणि त्यासाठी वाहतुकीची सुविधा उपलब्ध करणे जरुरी असल्याचे आग्रही मत व्यक्त केले आहे.बव्हंशी इस्पितळे कोरोना रुग्णांनाच प्राधान्य देत आहेत. अन्य आजार असलेले रुग्ण मृत्यू पावत आहेत. या सर्व स्थितीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखालील मंत्रीगट आणि ११ कृती गट विचार करीत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या