नवी दिल्ली : देशाची संघराज्यीय प्रणाली मजबूत करण्यासाठी मी काम करणाऱ माझ्या कार्यालयाने राज्यांनी उचलेल्या मुद्यांवर प्राधान्यक्रमाने विचार करावा, अशी माझी अपेक्षा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बुधवारी स्पष्ट केले़ पंतप्रधानपदाचा औपचारिक पदभार सांभाळल्यानंतर आज दुसर्या दिवशी मोदींनी पंतप्रधान कार्यालयातील(पीएमओ) अधिकार्यांची पहिली बैठक घेतली़ पंतप्रधान कार्यालयाकडे आलेल्या मुद्यांची प्रभावी दखल, त्यावरचा तोडगा आणि त्याअनुषंगाने आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर भर यावर आपला भर असला पाहिजे, असे मोदींनी या बैठकीत सांगितल्याचे पीएमओने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे़ या बैठकीत मोदींना पंतप्रधान कार्यालयाचे स्वरूप आणि कामकाजाबाबत विस्तृत सादरीकरण(प्रेझेंटेशन) दिले गेले़ बैठकीत मोदींनी लोकांच्या तक्रारींचा निपटारा ‘फास्ट ट्रॅक’ (जलदगती) आधारावर करण्यावर जोर दिला़ विशेषत: राज्यांकडून उपस्थित मुद्यांवर प्राधान्यक्रमाने संवेदनशीलपणे विचार व्हावा़ कारण भारताची प्रगती ही राज्यांची प्रगती आहे आणि यामुळे आपली संघराज्यीय प्रणाली बळकट होईल, असे मोदींनी बैठकीत सांगितले़ ‘टीम वर्क’ वर भर देत, पीएमओचा कुठलाही अधिकारी कधीही आपल्याला भेटू शकतो, असे सांगून मोदींनी आपल्या अधिकार्यांचा उत्साह वाढविला़ (लोकमत न्यूज नेटवर्क)
राज्यांच्या प्रश्नांवर प्राधान्यक्रमाने विचार
By admin | Updated: May 29, 2014 04:12 IST