शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

मोदींना पॉवरफुल नेता बनविणारे 'हे' आहेत तीन चाणक्य अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 11:02 IST

केंद्र सरकारमधील हे तीन अधिकारी आहेत ज्यांच्यावर पंतप्रधान मोदींना सर्वात जास्त विश्वास आहे. हे अधिकारी कोण हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

नवी दिल्ली - पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या सरकारच्या कार्यकाळाला सुरुवात झाली आहे. नरेंद्र मोदी नेहमी आपल्या अधिकाऱ्यांशी ताळमेळ ठेऊन निर्णय घेत असतात. गुजरातमध्ये मुख्यमंत्री असतानाही नरेंद्र मोदी यांनी नेहमीच प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्राधान्य दिलं आहे. मागील पाच वर्षाच्या काळातही मोदींची अधिकाऱ्यांनासोबत घेऊन निर्णय घेतले. मात्र केंद्र सरकारमधील हे तीन अधिकारी आहेत ज्यांच्यावर पंतप्रधान मोदींना सर्वात जास्त विश्वास आहे. हे अधिकारी कोण हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

पहिले अधिकारी आहेत यूपी कॅडरमधील 1967 बॅचचे आयएएस अधिकारी नृपेंद्र मिश्र. सध्या नृपेंद्र मिश्र हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रालयातील ज्येष्ठ अधिकारी आहेत. त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा आहे. पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून नृपेंद्र मिश्र जबाबदारी सांभाळतात. पंतप्रधान योजनांच्या कामांवर नृपेंद्र मिश्र यांचे विशेष लक्ष असतं. तसेच पंतप्रधान कार्यालय, इतर विभागीय मंत्रालय आणि राज्य सरकार यांच्यात ताळमेळ राखण्याचं महत्वाचं काम ते करतात. हार्वर्ड केनेडी स्कूल ऑफ गर्व्हनमेंट आणि अलाहाबाद विद्यापीठाचे विद्यार्थी राहिलेले नृपेंद्र मिश्र नोकरशाहीसोबत राजकारण या विषयावरही बारीक लक्ष देतात. 

दुसरे अधिकारी आहेत गुजरात कॅडरमधील 1972 बॅचचे आयएएस अधिकारी पीके मिश्र. मोदींच्या दुसऱ्या सरकारच्या कार्यकाळात पीके मिश्र यांच्याकडे अतिरिक्त प्रधान सचिवाचा कारभार आहे. पीके मिश्र यांनाही कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा आहे. महत्वाच्या पदांवर उमेदवारांची निवड करणे यामध्ये पीके मिश्र यांची भूमिका महत्वाची मानली जाते. कॅबिनेट सचिवालयासोबत समन्वय राखणे, प्रशासकीय कामकाजात सुधारणा आणणे. पंतप्रधानांच्या कृषी योजनांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्याचं काम ते करतात. अर्थशास्त्रात पीएचडी झालेले पीके मिश्र हे जागतिक बँकेच्या सल्लागार समितीमध्येही सहभागी आहेत. 

तिसरे अधिकारी आहेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल. मोदी सरकारचे संकटमोचक म्हणून प्रसिद्ध असलेले अजित डोवाल हे आयबीचे संचालकपदी 2004-05 दरम्यान होते. गुप्तचर यंत्रणांमध्ये अजित डोवाल यांचा महत्वाचा वाटा आहे. सर्जिकल स्ट्राईकपासून बालकोट एअर स्ट्राईकपर्यंतच्या अनेक निर्णयात अजित डोवाल यांचा सहभाग होता. देशाच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मोदींना कणखर नेता म्हणून प्रसिद्धी मिळाली. यात डोवाल यांनी पडद्यामागून मोठी भूमिका बजावली.   

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAjit Dovalअजित डोवालprime ministerपंतप्रधान