शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
3
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
4
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
5
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
6
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
7
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
8
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
9
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
10
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
11
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
12
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
13
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
14
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
15
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
16
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
17
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
18
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
19
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
20
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 

मोदींना पॉवरफुल नेता बनविणारे 'हे' आहेत तीन चाणक्य अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 11:02 IST

केंद्र सरकारमधील हे तीन अधिकारी आहेत ज्यांच्यावर पंतप्रधान मोदींना सर्वात जास्त विश्वास आहे. हे अधिकारी कोण हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

नवी दिल्ली - पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या सरकारच्या कार्यकाळाला सुरुवात झाली आहे. नरेंद्र मोदी नेहमी आपल्या अधिकाऱ्यांशी ताळमेळ ठेऊन निर्णय घेत असतात. गुजरातमध्ये मुख्यमंत्री असतानाही नरेंद्र मोदी यांनी नेहमीच प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्राधान्य दिलं आहे. मागील पाच वर्षाच्या काळातही मोदींची अधिकाऱ्यांनासोबत घेऊन निर्णय घेतले. मात्र केंद्र सरकारमधील हे तीन अधिकारी आहेत ज्यांच्यावर पंतप्रधान मोदींना सर्वात जास्त विश्वास आहे. हे अधिकारी कोण हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

पहिले अधिकारी आहेत यूपी कॅडरमधील 1967 बॅचचे आयएएस अधिकारी नृपेंद्र मिश्र. सध्या नृपेंद्र मिश्र हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रालयातील ज्येष्ठ अधिकारी आहेत. त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा आहे. पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून नृपेंद्र मिश्र जबाबदारी सांभाळतात. पंतप्रधान योजनांच्या कामांवर नृपेंद्र मिश्र यांचे विशेष लक्ष असतं. तसेच पंतप्रधान कार्यालय, इतर विभागीय मंत्रालय आणि राज्य सरकार यांच्यात ताळमेळ राखण्याचं महत्वाचं काम ते करतात. हार्वर्ड केनेडी स्कूल ऑफ गर्व्हनमेंट आणि अलाहाबाद विद्यापीठाचे विद्यार्थी राहिलेले नृपेंद्र मिश्र नोकरशाहीसोबत राजकारण या विषयावरही बारीक लक्ष देतात. 

दुसरे अधिकारी आहेत गुजरात कॅडरमधील 1972 बॅचचे आयएएस अधिकारी पीके मिश्र. मोदींच्या दुसऱ्या सरकारच्या कार्यकाळात पीके मिश्र यांच्याकडे अतिरिक्त प्रधान सचिवाचा कारभार आहे. पीके मिश्र यांनाही कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा आहे. महत्वाच्या पदांवर उमेदवारांची निवड करणे यामध्ये पीके मिश्र यांची भूमिका महत्वाची मानली जाते. कॅबिनेट सचिवालयासोबत समन्वय राखणे, प्रशासकीय कामकाजात सुधारणा आणणे. पंतप्रधानांच्या कृषी योजनांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्याचं काम ते करतात. अर्थशास्त्रात पीएचडी झालेले पीके मिश्र हे जागतिक बँकेच्या सल्लागार समितीमध्येही सहभागी आहेत. 

तिसरे अधिकारी आहेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल. मोदी सरकारचे संकटमोचक म्हणून प्रसिद्ध असलेले अजित डोवाल हे आयबीचे संचालकपदी 2004-05 दरम्यान होते. गुप्तचर यंत्रणांमध्ये अजित डोवाल यांचा महत्वाचा वाटा आहे. सर्जिकल स्ट्राईकपासून बालकोट एअर स्ट्राईकपर्यंतच्या अनेक निर्णयात अजित डोवाल यांचा सहभाग होता. देशाच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मोदींना कणखर नेता म्हणून प्रसिद्धी मिळाली. यात डोवाल यांनी पडद्यामागून मोठी भूमिका बजावली.   

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAjit Dovalअजित डोवालprime ministerपंतप्रधान