शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

कोणत्याही परिस्थितीत भ्रष्टाचारावर तडजोड नाही - नितीश कुमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2017 14:29 IST

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन बिहारमध्ये राजकीय भूकंप आणणारे नितीश कुमार यांनी अखेर ट्विटरच्या माध्यमातून आपलं मौन सोडलं आहे

पाटणा, दि. 27 - मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन बिहारमध्ये राजकीय भूकंप आणणारे नितीश कुमार यांनी अखेर ट्विटरच्या माध्यमातून आपलं मौन सोडलं आहे. नितीश कुमार यांनी कोणत्याही परिस्थितीत भ्रष्टाचारावर तडजोड केली जाणार नाही असा पुनरुच्चार केला आहे. तेजस्वी यादव यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर झालेल्या खडाजंगीनंतर नितीश कुमार यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. विशेष म्हणजे राजीनामा दिल्यानंतर पुढील 24 तासांत त्यांनी पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 

नितीश कुमार यांनी ट्विट केलं आहे. पंतप्रधान मोदींनी दिलेल्या शुभेच्छांसाठी आभार. कोणत्याही परिस्थितीत भ्रष्टाचारावर तडजोड केली जाणार नाही. केंद्राकडून मिळणा-या सहकार्याच्या आधारे बिहार विकासाकडे वाटचाल करेल', असं नितीश कुमार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान याआधी लालूप्रसाद यादव यांनी पत्रकार परिषद घेत नितीश कुमार यांच्यावर सडेतोड टीका केली. 'मी सांगितलं शंकराप्रमाणे जा आणि राज्य कर, पण हा तर भस्मासूर निघाला', अशी टीका आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर केली. 'जेव्हा कधी वेळ आली तेव्हा नितीश कुमार यांना पुढे पाठवलं. जर माझ्या मनात पाप असतं तर त्यांना मुख्यमंत्री बनवलं नसतं', असंही लालूप्रसाद यादव यांनी यावेळी सांगितलं. 

'गेल्या 15 ते 20 वर्षांपासून मी न्यायालयीन लढाई लढत आहे. पण मला शिक्षा सुनावताना घाई करण्यात आली. नितीश कुमार आणि भाजपाने रचलेलं हे षडयंत्र होतं', असा आरोप लालूप्रसाद यादव यांनी केला. 'नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना बिहारमधून बाहेर काढण्यासाठी लोकांनी भाजपाविरोधात जाऊन आम्हाला कौल दिला होता. गोमांस खाल्लं पाहिजे असं मी सांगितल्याचा खोटा प्रचार करण्यात आला, आम्ही जिंकलो तर पाकिस्तानात फटाके फुटतील असंही सांगण्यात आलं होतं', अशी माहिती लालूप्रसाद यादव यांनी दिली. नितीश कुमार खूप मोठे संधीसाधू असल्याचा आरोपही त्यांनी केला.  

दुसरीकडे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून हे प्लानिंग सुरु असल्याची आम्हाला माहिती होती, आपल्या स्वार्थासाठी एखादी व्यक्ती काहीही करु शकते असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे. 

'बिहारच्या जनतेने जातीयवादाविरोधात लढा देण्यासाठी नितीश कुमार यांच्या हाती सत्ता दिली होती. मात्र आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी त्यांनी भाजपाशी हातमिळवणी केली आहे. खरं सांगायचं तर गेल्या तीन ते चार महिन्यांपासून हे प्लानिंग सुरु असल्याचं आम्हाला माहित होतं. आपल्या स्वार्थासाठी एखादी व्यक्ती काहीही करु शकते', असं राहुल गांधी यांनी सांगितलं. 'भारतामधील राजकारणात हीच मोठी समस्या आहे की, सत्तेसाठी व्यक्ती काहीही करतो. कोणताही नियम नाही, विश्वासार्हता नाही', असंही राहुल गांधी बोलले आहेत.