शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

आमच्या राजवटीत तीन वेळा सर्जिकल स्ट्राईक्स झाल्या - काँग्रेस

By admin | Updated: October 5, 2016 12:26 IST

नेतृत्वाची परिपक्वता आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अशा कारवाईनंतर आम्ही मोठे दावे करायचे टाळले. अशा कारवाईला पूर्णपणे राजकीय समर्थन होते असे काँग्रेसने म्हटले आहे.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ५ - केंद्रात आमचे सरकार असताना आम्ही तीन वेळा शत्रू प्रदेशात सर्जिकल स्ट्राईक्स केल्या पण राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कधीही त्याचा गवगवा केला नाही असे काँग्रेसने म्हटले आहे. यापूर्वी तीनवेळा सैन्यदलाने यशस्वी सर्जिकल स्ट्राईक्स केल्या आहेत. त्याचा आम्हाला अभिमान आहे. 
 
१ सप्टेंबर २०११, २८ जुलै २०१३ आणि १४ जानेवारी २०१४ या तारखांना आपल्या सैन्य दलाने शत्रूला चोख प्रत्युत्तर दिले असे काँग्रेस प्रवक्ते रणदीपसिंग सूरजेवाला यांनी सांगितले. नेतृत्वाची परिपक्वता आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अशा कारवाईनंतर आम्ही मोठे दावे करायचे टाळले. अशा कारवाईला पूर्णपणे राजकीय समर्थन होते असे काँग्रेसने म्हटले आहे. 
 
उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पीओकेमध्ये घुसून दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. केंद्र सरकारच्या परवानगीमुळे सैन्याला ही कारवाई करता आली. सहाजिकच मोदी सरकारला याचा राजकीय लाभ होणार आहे. त्यामुळे आता काँग्रेसनेही संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या दुस-या कार्यकाळात सर्जिकल स्ट्राईक्स केल्याचा दावा केला आहे. या राजकारणाला आगामी उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकांचीही किनार आहे.