शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
4
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
5
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
6
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
7
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
8
World Cup FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
9
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
10
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
11
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
12
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
13
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
14
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
15
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
16
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
17
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
18
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
19
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
20
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना

आमच्या राजवटीत तीन वेळा सर्जिकल स्ट्राईक्स झाल्या - काँग्रेस

By admin | Updated: October 5, 2016 12:26 IST

नेतृत्वाची परिपक्वता आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अशा कारवाईनंतर आम्ही मोठे दावे करायचे टाळले. अशा कारवाईला पूर्णपणे राजकीय समर्थन होते असे काँग्रेसने म्हटले आहे.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ५ - केंद्रात आमचे सरकार असताना आम्ही तीन वेळा शत्रू प्रदेशात सर्जिकल स्ट्राईक्स केल्या पण राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कधीही त्याचा गवगवा केला नाही असे काँग्रेसने म्हटले आहे. यापूर्वी तीनवेळा सैन्यदलाने यशस्वी सर्जिकल स्ट्राईक्स केल्या आहेत. त्याचा आम्हाला अभिमान आहे. 
 
१ सप्टेंबर २०११, २८ जुलै २०१३ आणि १४ जानेवारी २०१४ या तारखांना आपल्या सैन्य दलाने शत्रूला चोख प्रत्युत्तर दिले असे काँग्रेस प्रवक्ते रणदीपसिंग सूरजेवाला यांनी सांगितले. नेतृत्वाची परिपक्वता आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अशा कारवाईनंतर आम्ही मोठे दावे करायचे टाळले. अशा कारवाईला पूर्णपणे राजकीय समर्थन होते असे काँग्रेसने म्हटले आहे. 
 
उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पीओकेमध्ये घुसून दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. केंद्र सरकारच्या परवानगीमुळे सैन्याला ही कारवाई करता आली. सहाजिकच मोदी सरकारला याचा राजकीय लाभ होणार आहे. त्यामुळे आता काँग्रेसनेही संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या दुस-या कार्यकाळात सर्जिकल स्ट्राईक्स केल्याचा दावा केला आहे. या राजकारणाला आगामी उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकांचीही किनार आहे.