शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

मुख्यमंत्रिपदाचा मोह नाही, निर्णय रालोआचा; नितीशकुमार यांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2020 06:59 IST

बिहार निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन ४८ तास उलटल्यानंतर नितीशकुमार गुरुवारी प्रसारमाध्यमांना सामोरे गेले.

पाटणा : विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर कमी जागा येऊनही मुख्यमंत्रिपदी वर्णी लागणार असल्याने टीकेचे धनी होणारे नितीश कुमार यांनी अखेर मौन सोडले. आपल्याला खुर्चीचा मोह नाही, जो निर्णय घ्यायचा असेल तो एनडीएच्या बैठकीत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 

बिहार निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन ४८ तास उलटल्यानंतर नितीशकुमार गुरुवारी प्रसारमाध्यमांना सामोरे गेले. राज्याच्या मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार, याचा निर्णय रालोआच्या बैठकीत घेतला जाईल. लोक जनशक्ती पक्षाला रालोआत सहभागी करून घ्यायचे की नाही, हेही त्यावेळी ठरेल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.  २४३ सदस्यांच्या बिहार विधानसभा निवडणुकीत मतदारांनी रालोआला १२५ जागांवर विजयी केले. राष्ट्रीय जनता दलप्रणीत महाआघाडीला ११० जागांवर समाधान मानावे लागले. 

नितीशजी, अंतरात्म्याचे ऐकणार का? 

विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेलेल्या जदयुचे नेते नितीशकुमार आता तरी अंतरात्म्याचा आवाज ऐकून सत्तेची खुर्ची सोडतील का’, असा सवाल राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी उपस्थित केला आहे.  जदप्रणीत महाआघाडीला बहुमतासाठी १२ जागा कमी पडल्या. या पार्श्वभूमीवर गुरुवारी महाआघाडीची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवडीसाठी बैठक झाली. तीत एकमुखाने तेजस्वी यांची महाआघाडीच्या विधिमंडळातील नेतेपदी निवड करण्यात आली.  निवडणुकीत अनेक ठिकाणी गैरप्रकार झाले. फेरमतमोजणीसाठी आम्ही आग्रह धरणार असल्याचेही तेजस्वी म्हणाले.

बिहारच्या जनतेने रालोआला स्पष्ट जनादेश दिला. त्यामुळे सरकार रालोआच स्थापन करेल. मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार, याचा रालोआच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल.- नितीशकुमार

निवडणुकीत नितीशकुमार यांचा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. तरीही ते मुख्यमंत्रिपदी आरूढ होणार आहेत. आता तरी ते अंतरात्म्याचा आवाज ऐकत खुर्चीचा मोह सोडतील का?- तेज्सवी यादव

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूक