शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

मुख्यमंत्रिपदाचा मोह नाही, निर्णय रालोआचा; नितीशकुमार यांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2020 06:59 IST

बिहार निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन ४८ तास उलटल्यानंतर नितीशकुमार गुरुवारी प्रसारमाध्यमांना सामोरे गेले.

पाटणा : विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर कमी जागा येऊनही मुख्यमंत्रिपदी वर्णी लागणार असल्याने टीकेचे धनी होणारे नितीश कुमार यांनी अखेर मौन सोडले. आपल्याला खुर्चीचा मोह नाही, जो निर्णय घ्यायचा असेल तो एनडीएच्या बैठकीत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 

बिहार निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन ४८ तास उलटल्यानंतर नितीशकुमार गुरुवारी प्रसारमाध्यमांना सामोरे गेले. राज्याच्या मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार, याचा निर्णय रालोआच्या बैठकीत घेतला जाईल. लोक जनशक्ती पक्षाला रालोआत सहभागी करून घ्यायचे की नाही, हेही त्यावेळी ठरेल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.  २४३ सदस्यांच्या बिहार विधानसभा निवडणुकीत मतदारांनी रालोआला १२५ जागांवर विजयी केले. राष्ट्रीय जनता दलप्रणीत महाआघाडीला ११० जागांवर समाधान मानावे लागले. 

नितीशजी, अंतरात्म्याचे ऐकणार का? 

विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेलेल्या जदयुचे नेते नितीशकुमार आता तरी अंतरात्म्याचा आवाज ऐकून सत्तेची खुर्ची सोडतील का’, असा सवाल राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी उपस्थित केला आहे.  जदप्रणीत महाआघाडीला बहुमतासाठी १२ जागा कमी पडल्या. या पार्श्वभूमीवर गुरुवारी महाआघाडीची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवडीसाठी बैठक झाली. तीत एकमुखाने तेजस्वी यांची महाआघाडीच्या विधिमंडळातील नेतेपदी निवड करण्यात आली.  निवडणुकीत अनेक ठिकाणी गैरप्रकार झाले. फेरमतमोजणीसाठी आम्ही आग्रह धरणार असल्याचेही तेजस्वी म्हणाले.

बिहारच्या जनतेने रालोआला स्पष्ट जनादेश दिला. त्यामुळे सरकार रालोआच स्थापन करेल. मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार, याचा रालोआच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल.- नितीशकुमार

निवडणुकीत नितीशकुमार यांचा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. तरीही ते मुख्यमंत्रिपदी आरूढ होणार आहेत. आता तरी ते अंतरात्म्याचा आवाज ऐकत खुर्चीचा मोह सोडतील का?- तेज्सवी यादव

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूक