शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

शहरात सर्वत्र पाणीच पाणी दुसर्‍या दिवशीही सूर्यदर्शन नाही : सलग ३६ तासांपेक्षा जास्त वेळ रिपरिप, आता पाऊस थांबण्याची प्रतीक्षा

By admin | Updated: July 12, 2016 00:07 IST

जळगाव : रविवारी सकाळपासून सुरू झालेल्या पावसाचा दुसर्‍या दिवशीही मुक्काम कायम असल्याने शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून दुसर्‍या दिवशीही सूर्यदर्शन झाले नाही. सलग ३६ तासांपेक्षा जास्त वेळ पावसाची रिपरिप सुरू असल्याने आता सर्वांना पाऊस थांबण्याची प्रतीक्षा लागली आहे. या पावसामुळे शहरातील पवन नगर भागात घरामध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले. तसेच आज आठवड्याचा पहिला दिवस असल्याने सकाळी कार्यालयामध्ये जाणार्‍यांसह शाळकरी विद्यार्थ्यांचेही हाल झाले.

जळगाव : रविवारी सकाळपासून सुरू झालेल्या पावसाचा दुसर्‍या दिवशीही मुक्काम कायम असल्याने शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून दुसर्‍या दिवशीही सूर्यदर्शन झाले नाही. सलग ३६ तासांपेक्षा जास्त वेळ पावसाची रिपरिप सुरू असल्याने आता सर्वांना पाऊस थांबण्याची प्रतीक्षा लागली आहे. या पावसामुळे शहरातील पवन नगर भागात घरामध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले. तसेच आज आठवड्याचा पहिला दिवस असल्याने सकाळी कार्यालयामध्ये जाणार्‍यांसह शाळकरी विद्यार्थ्यांचेही हाल झाले.
गेल्या आठवड्यात रविवारी व सोमवारी झालेल्या दमदार पावसानंतर गायब झालेला पाऊस रविवारी सकाळी झडी घेऊनच आला. १० जुलै रोजी सकाळी आठ वाजता सुरुवात झाली आणि दिवस व रात्रभर तो सुरूच राहिला. सोमवारीदेखील दिवसभर या पावसाचा मुक्काम कायम होता. सोमवारी दुपारी केवळ बारा ते एक वाजे दरम्यान थोडा कमी झाला. मात्र रात्रीपर्यंत रिपरिप सुरूच होती.

दुसर्‍या दिवशीही सूर्यदर्शन नाही....
रविवारी सु˜ीवर गेलेले सूर्यनारायण दुसर्‍या दिवशीही उगवले नाही. त्यामुळे सलग दुसर्‍या दिवशी सूर्यदर्शन झाले नाही.

गारवा वाढवा....
सततच्या पावसामुळे तापमानातही कमालीची घट होऊन दिवसादेखील गारवा जाणवत होता. या वातावरण बदलामुळे लहान मुलांना सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवू लागला आहे.

सर्वत्र पाणीच पाणी....
यंदा या पूर्वी झालेल्या पावसामुळे जमिनीतील पाण्याची पातळी चांगलीच वाढली असून त्यात आता दोन दिवसांपासून सुरू असलेल्या भिजपावसामुळे जमिनीतही पाणी मुरत नसल्याने शहरातील सखल भागासह रस्त्याच्या कडेला, नाले, खड्यांमध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.
नवीपेठेत जयप्रकाश नारायण चौकात सरस्वती डेअरीनजीकच्या सखल भागात पाणी साचले होते. गटारीचे पाणी काही प्रमाणात रस्त्यावर आले होते. गोलाणी मार्केटजवळ शिरपूर बँकेनजीक मुख्य रस्त्यावर, स्टेट बँकेच्या मुख्य शाखेच्या भिंतीनजीक, जिल्हा क्रीडा संकुल परिसरात पाणी साचले होते.
पिंप्राळा रेल्वे गेटनजीक दोन्ही बाजूला पाणी तुंबलेले होते. फाटक बंद असताना वाहनधारकांना या पाण्यातच उभे रहावे लागत होते. केसी पार्कनजीक रस्त्यावरही ठिकठिकाणी पाणी साचले होते. या रस्त्यावरून केसी पार्क, त्रिभुवन कॉलनी भागातील नागरिकांसह कानळदा, आव्हाणे आदी ठिकाणचे ग्रामस्थ ये-जा करतात. शिवाजीनगर पूल पार केल्यानंतर भिकमचंद जैन शाळेसमोर मुख्य रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.