शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
3
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
4
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
5
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
7
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
8
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
9
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
10
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
11
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
12
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
13
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
14
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
15
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
16
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
17
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
18
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
19
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
20
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं

आगामी दहा दिवस राज्यात पाऊस नाही

By admin | Updated: August 18, 2015 21:37 IST

सप्टेंबरमध्ये चांगल्या प्रमाणात पुणे : मॉन्सूनचा पाऊस आगामी दहा दिवस राज्यात होणार नाही. त्यामुळे सर्व पिकांना ताण सहन करावा लागेल, जनावरांच्या चा-याची समस्या निर्माण होऊ शकेल, मात्र सप्टेंबरमध्ये चांगल्या प्रमाणात पाऊस होईल, अशी माहिती ज्येष्ठ हवामानाशास्त्रज्ञ डॉ.रामचंद्र साबळे यांनी आज येथे सांगितली. ते म्हणाले जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसात खंड ...


सप्टेंबरमध्ये चांगल्या प्रमाणात
पुणे : मॉन्सूनचा पाऊस आगामी दहा दिवस राज्यात होणार नाही. त्यामुळे सर्व पिकांना ताण सहन करावा लागेल, जनावरांच्या चा-याची समस्या निर्माण होऊ शकेल, मात्र सप्टेंबरमध्ये चांगल्या प्रमाणात पाऊस होईल, अशी माहिती ज्येष्ठ हवामानाशास्त्रज्ञ डॉ.रामचंद्र साबळे यांनी आज येथे सांगितली.
ते म्हणाले जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसात खंड पडेल, असे भाकित मी वर्तविले होते, ते प्रत्यक्षात आले आहे.आगामी दहा दिवस पावसात खंड पडणार आहे. त्यामुळे खरिपाच्या सर्व पिकांना पाण्याचा ताण सहन करावा लागेल. जिरायती भागात जेथे उशीरा उगवण झाली आहे, त्या पिकांना धोका उदभवेल. सध्याचा चारा पुढच्या दहा दिवसांत संपून नव्या चा-याची उगवण होईपर्यंत जनावरांच्या चा-याचा तुटवडा होऊ शकेल. पिण्याच्या पाण्याचे बाष्पिभवन होऊन काही ठिकाणी समस्या उदभवू शकेल.
डॉ. साबळे म्हणाले २७ किंवा २८ जूनपासून पुन्हा पावसाला सुरुवात होईल. सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण चांगले असेल. १५ ऑक्टोबरपर्यंत चांगला पाऊस होईल. त्याचा फायदा रब्बीच्या पेरण्यांना होईल.
हवामान शास्त्र विभागाने पावसात दहा टक्के घट होईल, असे म्हटले आहे. मात्र तो जून ते ऑगस्ट दरम्यानचा अंदाज आहे. अल निनोचा परिणाम पुढच्या पावसावर दिसेल, असाही अंदाज व्यक्त केला आहे, मात्र मला माझ्या अभ्यासानुसार अल निनोचा परिणाम जाणवणार नाही असे वाटते, असेही त्यांनी नमूद केले.