शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

"केरळच्या पुराला राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची कायद्यात तरतूद नाही''

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 09:35 IST

केरळमध्ये गेल्या 13 दिवसांपासून पावसानं हाहाकार माजवलाय. या पावसानं आलेल्या पुरात केरळचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

नवी दिल्ली- केरळमध्ये गेल्या 13 दिवसांपासून पावसानं हाहाकार माजवलाय. या पावसानं आलेल्या पुरात केरळचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्याच पार्श्वभूमीवर केरळच्या पुराला राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्यावरून काँग्रेस आणि मोदी सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोपही झाले आहेत. परंतु केरळच्या पुराला राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची कायद्यात कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे केरळच्या पुराला राष्ट्रीय आपत्ती घोषित करू शकत नसल्याचं स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री अल्फोन्स कन्ननथानम यांनी दिलं आहे. तसेच काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्याची केलेली मागणीही फेटाळून लावली आहे.आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005मध्ये अशी कोणत्याही प्रकारची तरतूद नाही. काँग्रेस नेते ए. के. अँटोनी यांच्या विधानाचा समाचार घेत केंद्रीय मंत्री म्हणाले, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 हा कायदा काँग्रेसचं सरकार संसदेत असताना मंजूर करण्यात आला आहे. त्यात पुराला राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्याची कोणतीही तरतूद नाही. काँग्रेस जेव्हा 2004 ते 2014पर्यंत सत्तेत होती, त्यावेळी त्यांनी कोणत्याही संकटांना राष्ट्रीय आपत्ती घोषित केलं नाही. तर दुसरीकडे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनीही केंद्राकडे केरळमधील पुराला राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्याची मागणी केली आहे. काय आहे आपत्ती ?2005च्या आपत्ती कायद्यानुसार, कोणत्याही भागात नैसर्गिक किंवा मानवरहित कारणांनी संकट ओढवलं आणि त्याच्याशी लढा देणं शक्य नसल्यास आपत्ती जाहीर करण्यात येते. भूकंप, पूर, भूस्खलन, त्सुनामीला नैसर्गिक आपत्ती घोषित केली जाते. तर न्यूक्लिअर, बॉयोलॉजिकल, केमिकल संकटांना मानवनिर्मित संकटं समजली जातात. 

टॅग्स :KeralaकेरळKerala Floodsकेरळ पूर