शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट नाही

By admin | Updated: February 16, 2015 21:12 IST

२० फेब्रुवारीला विश्वासमत जिंकणार- जितनराम मांझी

२० फेब्रुवारीला विश्वासमत जिंकणार- जितनराम मांझी
नवी दिल्ली- बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी मी भाजपाच्या संगनमताने षडयंत्र रचत असल्याची अफवा पसरवून आमदारांना घाबरविण्याचा प्रयत्न नितीशकुमार यांच्या गोटातून केला जात आहे, असा आरोप बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी सोमवारी येथे केला. विरोधकांकडून राष्ट्रपती व राज्यपालांसमक्ष बनावट आमदारांची परेड करविण्यात आल्याचाही त्यांचा दावा आहे.
शासकीय कामानिमित्त आपण राजधानीत असून काही केंद्रीय मंत्री आणि राज्यपालांची भेट घेतल्याचे मांझी यांनी सांगितले. या भेटीगाठींनंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, मला पाठिंबा द्यायचा की नाही हे भाजपाने ठरवायचे आहे. राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्रयत्न करीत असल्याचा माझ्यावरील आरोप धादांत खोटा आहे. माझी इच्छा असती तर फार पूर्वीच तशी शिफारस केली असती. पण मी २० फेब्रुवारीला विश्वासमत जिंकणार आहे. सर्व पक्षांनी आपल्याला पाठिंबा द्यावा,असे आवाहन मांझी यांनी केले.
मुख्यमंत्रिपद सोडण्यास नकार देणारे मांझी यांना संयुक्त जनता दलातून (संजद) बडतर्फ करण्यात आले आहे.
संजदचे विधिमंडळ पक्ष नेते नितीशकुमार यांनी १३० आमदार त्यांच्या पाठीशी असल्याचा दावा केला असून या सर्वांना घेऊन त्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांची भेट घेतली होती. याकडे लक्ष वेधले असता यापैकी काही आमदार बनावट असल्याचा दावा मांझी यांनी केला.
मांझी भाजपाच्या तालावर नाचत असल्याचा आरोप संजदने रविवारी केला होता. संजद आणि त्याचे मित्र पक्ष राष्ट्रीय जनता दल (राजद), काँग्रेस आणि भाकपाने राज्यातील राजकीय अस्थिरतेसाठी राज्यपाल त्रिपाठी आणि भाजपाला जबाबदार धरले आहे.
(वृत्तसंस्था)