शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

देशात असहिष्णुता आणि भेदभावाला थारा नाही - सोनिया गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 06:01 IST

देशात असहिष्णुता आणि भेदभावाला कोणताही वाव नाही. देशाने अन्याय, असहिष्णुता आणि भेदभावाविरुद्ध उभे ठाकत खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याला बळकटी द्यावी

नवी दिल्ली : देशात असहिष्णुता आणि भेदभावाला कोणताही वाव नाही. देशाने अन्याय, असहिष्णुता आणि भेदभावाविरुद्ध उभे ठाकत खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याला बळकटी द्यावी,असे काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त संदेशात नमूद केले आहे.काँग्रेसच्या मुख्यालयात ध्वजारोहण केल्यानंतर त्यांनी देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. देशाने अनेक क्षेत्रात आघाडी घेतली असली तरी सत्य, अहिंसा, दयाभाव आणि देशभक्ती या मूलतत्त्वांचे पालन व्हायला हवे. दयाभाव, सहजीवन आणि सर्वसमावेशक विकासाच्या तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले. लोकशाहीवादी आणि लवचिक असलेला आपला देश ७३ वा स्वातंत्र्यदिन साजरा करीत आहे. येथे असहिष्णुता, अंधश्रद्धा, वंशवाद, धर्मवाद, अन्यायाला कोणताही वाव नाही, तथापि असंख्य लोकांना दररोज भेदभावाचा मुकाबला करावा लागत आहे. देशाने अन्याय, असहिष्णुता आणि भेदभावाविरुद्ध उभे ठाकत खºया अर्थाने स्वातंत्र्य बळकट करायला हवे, असेही त्या म्हणाल्या. ध्वजारोहणाच्या वेळी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, राहुल गांधी, अहमद पटेल, भूपिंदरसिंग हुडा, कपिल सिब्बल, मोतीलाल व्होरा, गुलाम नबी आझाद आदी ज्येष्ठ नेते उपस्थित होते. सोनिया गांधी यांनी देशवासीयांना रक्षाबंधनानिमित्त शुभेच्छाही दिल्या. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीIndependence Dayस्वातंत्र्य दिन