शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

संसदेला टाळण्यासाठी अध्यादेश नाही - अरुण जेटली

By admin | Published: February 24, 2015 12:08 PM

भूमी अधिग्रहण आणि अन्य विधेयकांवरील अध्यादेशांची पाठराखण करत संसदेला टाळण्यासाठी अध्यादेश काढले नव्हते असे स्पष्टीकरण केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत दिले.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. २४ - भूमी अधिग्रहण आणि अन्य विधेयकांवरील अध्यादेशांची पाठराखण करत संसदेला टाळण्यासाठी अध्यादेश काढले नव्हते असे स्पष्टीकरण केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत दिले. यापूर्वीच्या सरकारच्या काळातही अध्यादेश निघत होते, नेहरुंच्या काळात तब्बल ७० अध्यादेश काढण्यात आले होते अशी आठवण करुन देत जेटलींनी विरोधकांवर कटाक्ष टाकला. 
सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून अधिवेशनाच्या दुस-या दिवशी बहुचर्चित भूमी अधिग्रहण विधेयक संसदेत मांडले जाणार आहे. दुस-या दिवसाच्या सुरुवातीला तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी संसदेबाहेर घोषणाबाजी करत भूमी अधिग्रहण विधेयकाचा विरोध दर्शवला. राज्यसभेत कामकाजाला सुरुवात होताच विरोधकांनी भूमी अधिग्रहण विधेयकावरील अध्यादेशावरुन केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. राज्यसभेत उत्तर देताना अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले, संसदेला टाळण्यासाठी आम्ही अध्यादेश काढले हा चुकीचा प्रचार सुरु आहे. संसदेला टाळून देशात कोणताही कायदा तयार होत नाही. देशात आत्तापर्यंत ६०० हून अधिक अध्यादेश काढण्यात आले व त्यातील ८० टक्के विधेयक काँग्रेस सरकारच्या काळात निघाले असे अरुण जेटलींनी सांगितले. तर काँग्रेसने जनहितासाठी विधेयक काढले होते, विद्यमान केंद्र सरकार खासगी कंपन्यांच्या हितासाठी अध्यादेश काढले असे प्रत्युत्तर काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी दिले. केंद्र सरकारचा अध्यादेश हा शेतकरी विरोधी असल्याची टीका जदयू व बसपा खासदारांनी केली. विकासकामांना कोणीही विरोध करणार नाही. पण केंद्र सरकारने अध्यादेश काढण्यापूर्वी संसदेत चर्चा करणे गरजेचे होते असे समाजवादी पक्षांच्या खासदारांनी सांगितले.