शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

संसदेला टाळण्यासाठी अध्यादेश नाही - अरुण जेटली

By admin | Updated: February 24, 2015 12:58 IST

भूमी अधिग्रहण आणि अन्य विधेयकांवरील अध्यादेशांची पाठराखण करत संसदेला टाळण्यासाठी अध्यादेश काढले नव्हते असे स्पष्टीकरण केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत दिले.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. २४ - भूमी अधिग्रहण आणि अन्य विधेयकांवरील अध्यादेशांची पाठराखण करत संसदेला टाळण्यासाठी अध्यादेश काढले नव्हते असे स्पष्टीकरण केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत दिले. यापूर्वीच्या सरकारच्या काळातही अध्यादेश निघत होते, नेहरुंच्या काळात तब्बल ७० अध्यादेश काढण्यात आले होते अशी आठवण करुन देत जेटलींनी विरोधकांवर कटाक्ष टाकला. 
सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून अधिवेशनाच्या दुस-या दिवशी बहुचर्चित भूमी अधिग्रहण विधेयक संसदेत मांडले जाणार आहे. दुस-या दिवसाच्या सुरुवातीला तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी संसदेबाहेर घोषणाबाजी करत भूमी अधिग्रहण विधेयकाचा विरोध दर्शवला. राज्यसभेत कामकाजाला सुरुवात होताच विरोधकांनी भूमी अधिग्रहण विधेयकावरील अध्यादेशावरुन केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. राज्यसभेत उत्तर देताना अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले, संसदेला टाळण्यासाठी आम्ही अध्यादेश काढले हा चुकीचा प्रचार सुरु आहे. संसदेला टाळून देशात कोणताही कायदा तयार होत नाही. देशात आत्तापर्यंत ६०० हून अधिक अध्यादेश काढण्यात आले व त्यातील ८० टक्के विधेयक काँग्रेस सरकारच्या काळात निघाले असे अरुण जेटलींनी सांगितले. तर काँग्रेसने जनहितासाठी विधेयक काढले होते, विद्यमान केंद्र सरकार खासगी कंपन्यांच्या हितासाठी अध्यादेश काढले असे प्रत्युत्तर काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी दिले. केंद्र सरकारचा अध्यादेश हा शेतकरी विरोधी असल्याची टीका जदयू व बसपा खासदारांनी केली. विकासकामांना कोणीही विरोध करणार नाही. पण केंद्र सरकारने अध्यादेश काढण्यापूर्वी संसदेत चर्चा करणे गरजेचे होते असे समाजवादी पक्षांच्या खासदारांनी सांगितले.