शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

संसदेला टाळण्यासाठी अध्यादेश नाही - अरुण जेटली

By admin | Updated: February 24, 2015 12:58 IST

भूमी अधिग्रहण आणि अन्य विधेयकांवरील अध्यादेशांची पाठराखण करत संसदेला टाळण्यासाठी अध्यादेश काढले नव्हते असे स्पष्टीकरण केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत दिले.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. २४ - भूमी अधिग्रहण आणि अन्य विधेयकांवरील अध्यादेशांची पाठराखण करत संसदेला टाळण्यासाठी अध्यादेश काढले नव्हते असे स्पष्टीकरण केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत दिले. यापूर्वीच्या सरकारच्या काळातही अध्यादेश निघत होते, नेहरुंच्या काळात तब्बल ७० अध्यादेश काढण्यात आले होते अशी आठवण करुन देत जेटलींनी विरोधकांवर कटाक्ष टाकला. 
सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून अधिवेशनाच्या दुस-या दिवशी बहुचर्चित भूमी अधिग्रहण विधेयक संसदेत मांडले जाणार आहे. दुस-या दिवसाच्या सुरुवातीला तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी संसदेबाहेर घोषणाबाजी करत भूमी अधिग्रहण विधेयकाचा विरोध दर्शवला. राज्यसभेत कामकाजाला सुरुवात होताच विरोधकांनी भूमी अधिग्रहण विधेयकावरील अध्यादेशावरुन केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. राज्यसभेत उत्तर देताना अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले, संसदेला टाळण्यासाठी आम्ही अध्यादेश काढले हा चुकीचा प्रचार सुरु आहे. संसदेला टाळून देशात कोणताही कायदा तयार होत नाही. देशात आत्तापर्यंत ६०० हून अधिक अध्यादेश काढण्यात आले व त्यातील ८० टक्के विधेयक काँग्रेस सरकारच्या काळात निघाले असे अरुण जेटलींनी सांगितले. तर काँग्रेसने जनहितासाठी विधेयक काढले होते, विद्यमान केंद्र सरकार खासगी कंपन्यांच्या हितासाठी अध्यादेश काढले असे प्रत्युत्तर काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी दिले. केंद्र सरकारचा अध्यादेश हा शेतकरी विरोधी असल्याची टीका जदयू व बसपा खासदारांनी केली. विकासकामांना कोणीही विरोध करणार नाही. पण केंद्र सरकारने अध्यादेश काढण्यापूर्वी संसदेत चर्चा करणे गरजेचे होते असे समाजवादी पक्षांच्या खासदारांनी सांगितले.