शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

राममंदिराच्या उभारणीत कोणताही अडथळा नाही - राजनाथसिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 06:01 IST

अयोध्येत भव्य राममंदिर उभारणीच्या मार्गात जगातील कोणतीही शक्ती अडथळा आणू शकणार नाही, असे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी रविवारी म्हटले.

पांडू (झारखंड) : अयोध्येत भव्य राममंदिर उभारणीच्या मार्गात जगातील कोणतीही शक्ती अडथळा आणू शकणार नाही, असे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी रविवारी म्हटले. ते बिश्रामपूर विधानसभा मतदारसंघातील पांडू येथे प्रचारसभेत बोलत होते.राजनाथसिंह म्हणाले, फ्रान्सकडून घेतलेली राफेल लढावू विमाने सीमेपलीकडील दहशतवाद्यांच्या छावण्या नष्ट करण्यास सक्षम आहेत. ‘जय श्री राम’ अशा घोषणा दिल्या जात असताना सिंह म्हणाले की, राममंदिराच्या निर्माणाचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने मोकळा केलेला आहे. काश्मीरशी संबंधित अनुच्छेद ३७० रद्द करण्याबद्दल ते म्हणाले, १९५२ मध्ये डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी (भारतीय जन संघाचे संस्थापक) म्हणाले होते की, एका देशात दोन घटना, दोन पंतप्रधान आणि दोन ध्वज असू शकत नाहीत. आम्ही त्यांचे स्वप्न पूर्ण केले असून, आम्ही आमच्या जाहीरनाम्यात दिलेले आश्वासनही पूर्ण केले आहे.झारखंडमध्ये गेल्या दोन दिवसांत माओवाद्यांनी केलेल्या हिंसाचाराचा निषेध करून राजनाथसिंह म्हणाले की, या हल्ल्यांना जबाबदार असलेल्यांना भाजपची सरकारे (केंद्र आणि राज्यात) चोख प्रत्युत्तर देईल.झारखंडमध्ये दोन घटना घडल्याचे मी पाहिल्या आहेत. केंद्र आणि राज्यातील भाजपचे सरकार कोणालाही बंदूक हाती घेऊ देणार नाही, याबद्दल तुम्ही निश्चिंत असावे.लक्ष वळविण्याचा भाजपचा प्रयत्ननवी दिल्ली : झारखंडमध्ये विरोधी पक्ष स्थानिक प्रश्नांवर निवडणूक लढवत असताना सत्ताधारी भाजप सरकार आपल्या अपयशापासून मतदारांचे लक्ष दूर करण्यासाठी अयोध्येतील राममंदिराचा मुद्दा उपस्थित करीत असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष रामेश्वर ओरावोन यांनी केला.झारखंडमध्ये प्रचारसभेत बोलताना भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी राममंदिराचा प्रश्न सुटू नये म्हणून काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात अडथळे आणले, असा आरोप तीन दिवसांपूर्वी केल्यानंतर ओरावोन यांनी वरील आरोप केला.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याRajnath Singhराजनाथ सिंह