शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
7
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
8
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
9
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
10
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
11
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
12
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
13
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
14
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
15
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
16
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
17
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
18
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
20
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video

दुष्काळामागे ग्रीन हाऊस गॅसेस नाही

By admin | Updated: April 26, 2016 05:32 IST

हरितगृहातून उत्सर्जित वायू (ग्रीन हाऊस गॅसेस) गोळा होऊन जगभरातील तापमानात वाढ झाली आहे.

नवी दिल्ली : हरितगृहातून उत्सर्जित वायू (ग्रीन हाऊस गॅसेस) गोळा होऊन जगभरातील तापमानात वाढ झाली आहे. त्यापासून भारतही सुटलेला नाही, तथापि महाराष्ट्रासह देशभरातील भीषण तापमान, दुष्काळ आणि अतिवृष्टी हा त्याचा परिणाम नसल्याची स्पष्टोक्ती केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी राज्यसभेत खासदार विजय दर्डा यांच्या प्रश्नाला उत्तर देताना केली आहे.जागतिक तापमानात ०.६३ अंश सेल्सिअस एवढी वाढ झाल्यामुळे देशभरातील बहुतांश भागातील तसेच सरासरी वार्षिक तापमान वाढले आहे. याउलट राजस्थान, गुजरात आणि बिहारच्या काही भागात तापमान किंचित घटलेही आहे. मुंबई, राजस्थान, उत्तराखंड आणि काश्मीरच्या काही भागात अतिवृष्टीचा बसलेला फटका अपवादात्मक म्हणता (स्थानविशेष) येईल. हवामान विभागाच्या अभ्यासानुसार त्याला भारतीय मान्सूनप्रणालीतील नैसर्गिक बदलाचा भाग मानले गेले. ताज्या अभ्यासात गेल्या ४० ते ५० वर्षांदरम्यान अतिवृष्टीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे, मात्र वाढत्या जागतिक तापमानाशी त्याचा वैज्ञानिक आधारावर कोणताही संबंध असल्याचा निष्कर्ष काढता आलेला नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)>केंद्र सरकारने विकास योजनांमध्ये पर्यावरणाला(इकॉलॉजी) सातत्याने प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय जलवायू परिवर्तन कृतीयोजना(एनएपीसीसी) हाती घेतली असून त्या अनुषंगाने सर्व राज्यांनी कृती योजना आखली आहे. याशिवाय बाराव्या पंचवार्षिक योजनेत राष्ट्रीय अनुकुलन (अ‍ॅडाप्टेशन) निधीसाठी प्रारंभीची रक्कम म्हणून ३५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटांच्या काळात प्राण आणि संपत्तीच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, अशी माहितीही जावडेकर यांनी दिली.