शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

दुष्काळामागे ग्रीन हाऊस गॅसेस नाही

By admin | Updated: April 26, 2016 05:32 IST

हरितगृहातून उत्सर्जित वायू (ग्रीन हाऊस गॅसेस) गोळा होऊन जगभरातील तापमानात वाढ झाली आहे.

नवी दिल्ली : हरितगृहातून उत्सर्जित वायू (ग्रीन हाऊस गॅसेस) गोळा होऊन जगभरातील तापमानात वाढ झाली आहे. त्यापासून भारतही सुटलेला नाही, तथापि महाराष्ट्रासह देशभरातील भीषण तापमान, दुष्काळ आणि अतिवृष्टी हा त्याचा परिणाम नसल्याची स्पष्टोक्ती केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी राज्यसभेत खासदार विजय दर्डा यांच्या प्रश्नाला उत्तर देताना केली आहे.जागतिक तापमानात ०.६३ अंश सेल्सिअस एवढी वाढ झाल्यामुळे देशभरातील बहुतांश भागातील तसेच सरासरी वार्षिक तापमान वाढले आहे. याउलट राजस्थान, गुजरात आणि बिहारच्या काही भागात तापमान किंचित घटलेही आहे. मुंबई, राजस्थान, उत्तराखंड आणि काश्मीरच्या काही भागात अतिवृष्टीचा बसलेला फटका अपवादात्मक म्हणता (स्थानविशेष) येईल. हवामान विभागाच्या अभ्यासानुसार त्याला भारतीय मान्सूनप्रणालीतील नैसर्गिक बदलाचा भाग मानले गेले. ताज्या अभ्यासात गेल्या ४० ते ५० वर्षांदरम्यान अतिवृष्टीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे, मात्र वाढत्या जागतिक तापमानाशी त्याचा वैज्ञानिक आधारावर कोणताही संबंध असल्याचा निष्कर्ष काढता आलेला नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)>केंद्र सरकारने विकास योजनांमध्ये पर्यावरणाला(इकॉलॉजी) सातत्याने प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय जलवायू परिवर्तन कृतीयोजना(एनएपीसीसी) हाती घेतली असून त्या अनुषंगाने सर्व राज्यांनी कृती योजना आखली आहे. याशिवाय बाराव्या पंचवार्षिक योजनेत राष्ट्रीय अनुकुलन (अ‍ॅडाप्टेशन) निधीसाठी प्रारंभीची रक्कम म्हणून ३५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटांच्या काळात प्राण आणि संपत्तीच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, अशी माहितीही जावडेकर यांनी दिली.