शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

शेती खरडून गेलेल्यांना वर्षभरानंतरही आर्थिक मदत नाही

By admin | Updated: May 27, 2014 19:22 IST

बाळापूर तालुक्यातील अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेकडो हेक्टरवरील खरिपाची पिके वाहून जाण्यासह शेतीमधील सुपीक मातीही खरडून गेल्याने शेतकर्‍यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले; परंतु या शेतकर्‍यांना अद्यापही शासनाकडून आर्थिक मदत मिळाली नाही.

बोरगाव वैराळे: बाळापूर तालुक्यातील अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे मोर्णा व पूर्णा नदीला पूर येऊन शेकडो हेक्टरवरील खरिपाची पिके वाहून जाण्यासह शेतीमधील सुपीक मातीही खरडून गेल्याने शेतकर्‍यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले; परंतु या शेतकर्‍यांना अद्यापही शासनाकडून आर्थिक मदत मिळाली नाही.बाळापूर तालुक्यातील बोरगाव वैराळे, सोनाळा, अंदुरा, हातरूण परिसरात २०१३च्या ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोर्णा व पूर्णा नदीला पूर आला. यामध्ये शेकडो हेक्टरवरील खरिपाची पिके जमीनदोस्त झाली, तसेच शेतीमधील सुपीक मातीही वाहून गेली. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून त्याचे पंचनामे महसूल विभाग व कृषी विभागामार्फत करण्यात आल्यानंतर केंद्रीय समितीकडूनही शेतीची पाहणी करण्यात आली होती; परंतु या घटनेला वर्ष होत आले तरी, नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळालेली नाही. बाळापूर तालुक्याच्या उत्तरेला असलेल्या बोरगाव वैराळे, सोनाळा, अंदुरा, हातरूण परिसरातील खरिपाची पिके मोर्णा व पूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे उद्ध्वस्त होत आहेत. त्यामध्ये २०१२च्या ऑगस्ट आणि सप्टेबरमध्ये पुराने उद्ध्वस्त झालेल्या शेतजमिनीचे पंचनामे महसूल व कृषी विभागामार्फत करण्यात आले होते; परंतु त्याची नुकसान भरपाईसुद्धा आजवर मिळाली नाही. त्यानंतर २०१३ला आलेल्या पुरामुळे शेकडो हेक्टरवरील सोयाबीन, ज्वारी, कपाशी, तूर, मूग, उडीद, तीळ ही सर्व पिके जमीनदोस्त झाली. शेतीमधील सुपीक मातीही खरडून गेली. या शेतीला पुन्हा पेरणीयोग्य करण्यासाठी शेतकर्‍यांना १२ ते १५ हजार रुपयांपर्यंत खर्च आला. शासनाने खरडून गेलेल्या शेतीला हेक्टरी २५ हजार रुपये आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले; मात्र ही मदत अद्यापही शेतकर्‍यांना मिळाली नाही.