शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
3
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
4
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
5
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
6
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
7
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
8
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
9
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
10
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
11
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
12
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
13
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
14
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
15
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
16
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
17
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
18
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
19
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
20
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार

शेती खरडून गेलेल्यांना वर्षभरानंतरही आर्थिक मदत नाही

By admin | Updated: May 27, 2014 19:22 IST

बाळापूर तालुक्यातील अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेकडो हेक्टरवरील खरिपाची पिके वाहून जाण्यासह शेतीमधील सुपीक मातीही खरडून गेल्याने शेतकर्‍यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले; परंतु या शेतकर्‍यांना अद्यापही शासनाकडून आर्थिक मदत मिळाली नाही.

बोरगाव वैराळे: बाळापूर तालुक्यातील अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे मोर्णा व पूर्णा नदीला पूर येऊन शेकडो हेक्टरवरील खरिपाची पिके वाहून जाण्यासह शेतीमधील सुपीक मातीही खरडून गेल्याने शेतकर्‍यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले; परंतु या शेतकर्‍यांना अद्यापही शासनाकडून आर्थिक मदत मिळाली नाही.बाळापूर तालुक्यातील बोरगाव वैराळे, सोनाळा, अंदुरा, हातरूण परिसरात २०१३च्या ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोर्णा व पूर्णा नदीला पूर आला. यामध्ये शेकडो हेक्टरवरील खरिपाची पिके जमीनदोस्त झाली, तसेच शेतीमधील सुपीक मातीही वाहून गेली. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून त्याचे पंचनामे महसूल विभाग व कृषी विभागामार्फत करण्यात आल्यानंतर केंद्रीय समितीकडूनही शेतीची पाहणी करण्यात आली होती; परंतु या घटनेला वर्ष होत आले तरी, नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळालेली नाही. बाळापूर तालुक्याच्या उत्तरेला असलेल्या बोरगाव वैराळे, सोनाळा, अंदुरा, हातरूण परिसरातील खरिपाची पिके मोर्णा व पूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे उद्ध्वस्त होत आहेत. त्यामध्ये २०१२च्या ऑगस्ट आणि सप्टेबरमध्ये पुराने उद्ध्वस्त झालेल्या शेतजमिनीचे पंचनामे महसूल व कृषी विभागामार्फत करण्यात आले होते; परंतु त्याची नुकसान भरपाईसुद्धा आजवर मिळाली नाही. त्यानंतर २०१३ला आलेल्या पुरामुळे शेकडो हेक्टरवरील सोयाबीन, ज्वारी, कपाशी, तूर, मूग, उडीद, तीळ ही सर्व पिके जमीनदोस्त झाली. शेतीमधील सुपीक मातीही खरडून गेली. या शेतीला पुन्हा पेरणीयोग्य करण्यासाठी शेतकर्‍यांना १२ ते १५ हजार रुपयांपर्यंत खर्च आला. शासनाने खरडून गेलेल्या शेतीला हेक्टरी २५ हजार रुपये आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले; मात्र ही मदत अद्यापही शेतकर्‍यांना मिळाली नाही.