शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

काश्मीरशिवाय चर्चा नाही

By admin | Updated: July 14, 2015 03:25 IST

भारत व पाकिस्तानच्या नेत्यांची रशियात बैठक होऊन जेमतेम ७२ तास उलटताच सर्व आश्वासनांपासून घुमजाव करत काश्मीर मुद्दा समाविष्ट असल्याखेरीज भारत-पाक

इस्लामाबाद : भारत व पाकिस्तानच्या नेत्यांची रशियात बैठक होऊन जेमतेम ७२ तास उलटताच सर्व आश्वासनांपासून घुमजाव करत काश्मीर मुद्दा समाविष्ट असल्याखेरीज भारत-पाक चर्चा होणार नाही, अशी भूमिका घेत पाकिस्तानने आपला मूळ रंग दाखविला आहे. रशियातील बैठकीत दिलेल्या आवासनाकडे पाठ फिरवतानाच मुंबईवरील हल्ल्याच्या खटल्याला चालना देण्यासाठी भारताकडून आणखी पुरावे लागतील असे पाकिस्तानने स्पष्ट केले आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अजीज यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भात दोन पानी निवेदन जारी केले.भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या रशियातील उफा येथे झालेल्या बैठकीस सरताज अजीज उपस्थित होते. शरीफ व मोदी यांच्या वाटाघाटीनंतर दोन्ही नेत्यांचे संयुक्त निवेदन प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यात मुंबईवरील २६-११ च्या हल्ल्याच्या खटल्याला वेग देणे हा मुद्दा प्रामुख्याने समाविष्ट करण्यात आला होता. मात्र, मुंबई खटला पूर्ण करण्यास आम्हाला अधिक माहिती व अधिक पुरावे हवेत. त्यासाठी भारतानेच पुरावे द्यावेत असे सांगत अजीज यांनी जबाबदारी भारतावर ढकलली आहे. अजीज यांचे हे निवेदन पाकने रविवारी मुंबई हल्ल्याचा सूत्रधार लखवीच्या आवाजाचा नमुना देता येणार नाही असे जाहीर केल्यानंतरचे आहे. तसेच लखवीला पाक न्यायालयाने जामिनावर सोडून दिले असून, त्याला खटल्याला उपस्थित राहण्यापासूनही सूट देण्यात आली आहे.काश्मीर हाच मुख्य मुद्दा प्रलंबित प्रश्नात काश्मीर हा आमच्या दृष्टीने मुख्य मुद्दा आहे. सियाचिन, सर खाडी, पाण्याचे वाटप हेही मुद्दे आहेतच. पाकिस्तान या मुख्य मुद्द्याबाबत भूमिकेवर कायम असून, त्याबाबत कोणतीही तडजोड करणार नाही. - सरताज अजीज, पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारगदारोळानंतर उपरती-रशियातील उभय देशांच्या नेत्यांची बैठक व नंतर प्रसिद्ध झालेले संयुक्त निवेदन यात काश्मीर मुद्द्याचा उल्लेखच केला नव्हता. त्यामुळे स्वगृही परतल्यानंतर पाक पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर जोरदार टीका झाली. त्यानंतर पाकिस्तानने अजीज यांच्यामार्फत घूमजाव करीत आमच्या काश्मिरी बंधूना राजकीय, नैतिक व राजनैतिक पाठिंबा देणे चालू ठेवणार आहोत असे स्पष्ट केले आहे. शरीफ यांनी समझोता एक्स्प्रेसच्या खटल्याची प्रगतीही विचारली होती, असे अजीज आता म्हणत आहेत. - भारतीय नेत्यांचे प्रक्षोभक वक्तव्य व भारताचा पाकिस्तानमधील हस्तक्षेप याची पाकिस्तानला तीव्र चिंता आहे. बलुचमधील दहशतवादाला भारत अजूनही पाठिंबा देत आहे, असा आरोप अजीज यांनी केला आहे. या चिंतेवर चर्चा करण्यास भारत व पाक यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक प्रथम नवी दिल्ली येथे व नंतर इस्लामाबाद येथे आहे.पाकिस्तानी राजदूताकडून फुटीरवाद्यांना निमंत्रण- भारताच्या नाराजीची पर्वा न करता पाकिस्तानच्या भारतातील राजदूताने काश्मीर खोऱ्यातील फुटीरतावादी हुर्रीयत कॉन्फरन्सच्या नेत्यांना २१ जुलैला ईद ए मिलानचे निमंत्रण दिले आहे. काश्मीरमधील फुटीरवाद्यांशी चर्चा केल्यानंतर भारताने निषेध म्हणून पाकशी चर्चा बंद केल्याचे प्रकरण ताजे असतानाच ही आगळीक करण्यात आली आहे. - पाक उच्चायुक्त बासित यांनी फुटीरवाद्यांना आधी रमजानच्या काळात इफ्तारचेही निमंत्रण दिले होते. पण, मोदी व नवाज शरीफ यांची रशियातील उफा येथे भेट होणार हे ठरल्यानंतर इफ्तार पार्टी रद्द करण्यात आली.2014 - आॅगस्ट महिन्यात पाकिस्तानी दूत व हुर्रीयत नेते यांचे गुफ्तगू चालल्याचे लक्षात आल्यानंतर भारताने उभय देशांतील परराष्ट्र सचिव पातळीवरील बोलणी रद्द केली होती.