शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
2
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
8
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
9
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
10
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
11
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
12
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
13
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
14
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
15
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
16
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
17
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
18
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
19
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
20
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?

तात्काळ तिकिटाच्या किंवा इतर नियमात बदल नाही; रेल्वेचं स्पष्टीकरण

By admin | Updated: July 13, 2017 16:44 IST

इंडियन रेल्वे त्यांच्या तात्काळ तिकीटांच्या किंवा इतर कुठल्याही नियमांमध्ये बदल करत नसल्याचं स्पष्टीकरण रेल्वे मंत्रालयाने दिलं आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 13-  इंडियन रेल्वे 1 जुलैपासून सध्याच्या नियमांमध्ये मोठे बदल करते आहे, असं वृत्त काही दिवसांपासून प्रसारीत होत होतं. पण इंडियन रेल्वे त्यांच्या तात्काळ तिकिटांच्या किंवा इतर कुठल्याही नियमांमध्ये बदल करत नसल्याचं स्पष्टीकरण रेल्वे मंत्रालयाने दिलं आहे. रेल्वेच्या नियमांमध्ये 1 जुलैपासून बदल होतील, अशा बातम्या येत आहेत. पण असे कोणतेही बदल होणार नसल्याचं रेल्वेने म्हंटलं आहे. कॅशलेश तिकीट विक्रीवर असणाऱ्या नियमांमध्येही बदल केले जाणार आहेत तसंच रेल्वेचं तात्काळ तिकीट रद्द केल्यास 50 टक्के पैसे प्रवाशांना रिफंड केले जातील, अशी माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती.  
 
"गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर, व्हॉट्सअॅफ ग्रुपमध्ये आणि काही वेबसाइट्सवर इंडियन रेल्वे नवे नियम लागू करणार असल्याची माहिती प्रसारीत होत असल्याचं निदर्शनास आलं. 1 जुलै 2017 पासून रेल्वे नवे नियम लागू करेल असंही बोललं जात होतं. पण ही बातमी पूर्णपणे चुकीची आहे. या बातमीमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, असं स्पष्टीकरण रेल्वेने 30 जून रोजी दिलं आहे.  तसंच तात्काळा तिकीट बुक करण्यासाठी आधीचेच नियम लागू असतील असंही रेल्वेने सांगितलं आहे.
 
तात्काळ तिकीट बूक करण्यासाठी रेल्वेने 2015मध्ये नियम बदलला होता. एसीचं तात्काळ तिकीट बुकिंग सकाळी दहा वाजता आणि नॉन-एसीचं तिकीट बुकिग सकाळी अकरा वाजता सुरू होणार. प्रवासाच्या एक दिवस आधी प्रवाशाला तात्काळ तिकीट बूक करणं गरजेचं आहे. या नियमामध्ये कोणताही बदल होणार नाही, असं रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 
 
तसंच तात्काळ तिकीट रद्द केल्यावर तिकिटाचे पैसे परत मिळण्याच्या नियमामध्ये कोणताही बदल होणार नाही. तात्काळ तिकीट रद्द केल्यावर तिकीटाचे पैसे प्रवाशाला परत मिळणार नाहीत. हा नियम आधीप्रमाणेच लागू आहे. 
 
तात्काळ ई-तिकीट बूक करताना प्रत्येक पीएनआरवर दराने जास्तीत जास्त चार प्रवाशांचं तिकीट बूक करता येइल. 
 
1 जुलै 2017 पासून कोणतेही नवे नियम नाहीत. फक्त इतर विभागांप्रमाणे रेल्वेही जीएसटीची 1 जुलैपासून अंमलबजावणी होणार आहे.
रेल्वेकडून वेटिंग तिकिटाची यादी ऑनलाइन तसंच रेल्वे स्टेशनवर जारी केली जाइल. या नियमातही बदल नसेल.