शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

काँग्रेस व आप यांच्यात दिल्लीत समझोता नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 05:29 IST

सर्वत्र तिरंगी लढती : अन्य राज्यात ‘आप’ने जागा मागितल्याचा परिणाम

नवी दिल्ली : दिल्लीच्या मतदारसंघांमध्ये आम आदमी पक्षाशी आमचा समझोता होणार नाही, असे काँग्रेसतर्फे शुक्रवारी जाहीर करण्यात आले. त्यामुळे दिल्लीत सर्वत्र भाजप, काँग्रेस व आम आदमी पक्ष असे तिरंगी सामने होतील. काँग्रेस आपले उमेदवार १४ एप्रिल रोजी जाहीर करण्याची शक्यता आहे.

आम आदमी पक्षाने दिल्लीत काँग्रेसशी समझोता करण्याची इच्छा व तयारी दर्शवतानाच, हरयाणा व पंजाबमध्येही आपण जागावाटप करावे, अशी अट घातली होती. त्यास हरयाणा व पंजाबमधील काँग्रेस नेत्यांचा विरोध होता. त्यामुळे काँग्रेसने आपची मागणी अमान्य केली. आम आदमी पक्ष दिल्लीतील तीन जागा आमच्यासाठी सोडणार असेल, तर आजची आमची आपशी समझोत्याची तयारी आहे, असे काँग्रेसचे नेते पी. सी. चॅको यांनी सांगितले. दिल्लीत दोन्ही पक्षांत जागावाटप शेवटच्या टप्प्यात असतानाच आपने हरयाणा व पंजाबमध्येही आघाडीची अट ठेवली. त्यामुळे संपूर्ण समझोताच फिसकटला. चॅको म्हणाले की, २0१४ साली आम्हाला दिल्लीत २६ टक्के, तर आपला २१ टक्के मते मिळाली होती. त्यामुळे दोन्ही पक्षांची मते ४७ टक्के होती. या स्थितीत आपने आम्हाला किमान तीन जागा सोडणे अपेक्षित होते. तसे होणार असेल तर आजही आम्ही तयार आहोत.

याउलट विधानसभा निवडणुकांत मिळालेल्या मतांच्या आधारे जागा सोडण्याची आपची तयारी आहे. त्या निवडणुकीत काँग्रेसचा एकही उमेदवार विजयी झाला नव्हता आणि आपला ७0 पैकी ६७ ठिकाणी विजय मिळवला होता. उरलेल्या तीन जागा भाजपने मिळवल्या होत्या.
भाजपचे उमेदवार लवकरचआप व काँग्रेस यांच्यात समझोता होतो का, याकडे भाजपचे लक्ष लागले होते. त्यामुळे भाजपने दिल्लीतील उमेदवार जाहीर केले नव्हते. आता दोघांत आघाडी होत नसल्याने भाजपही उमेदवार लवकर घोषित करेल, असे सांगण्यात आले.

टॅग्स :Delhi Lok Sabha Election 2019दिल्ली लोकसभा निवडणूक 2019