शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

भारतात नोकऱ्या आहेत, पण पगाराची समस्या; इन्फोसिसच्या माजी सीएफओंचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2019 17:44 IST

भारतात चांगल्या नोकऱ्यांच्या संधी तयार होत नाहीत.

बंगळुरु : भारतात रोजगार निर्मितीवरून विरोधी पक्षांनी गेल्या निवडणुकीत मोदी सरकारवर टीकेची झोड उठविलेली होती. मात्र, इन्फोसिसचे माजी सीएफओ आणि गुंतवणूकदार टी. व्ही. मोहनदास पै यांनी भारतात नोकऱ्या नाही तर पगाराची समस्या असल्याचे म्हटले आहे. भारतात नोकऱ्या उपलब्ध आहेत. मात्र, कमी पगारामुळे पदवीधारक तयार नसल्याचे सांगत बेरोजगारीच्या आकड्यांवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी याबाबत वक्तव्य केले आहे. भारतात चांगल्या नोकऱ्यांच्या संधी तयार होत नाहीत. 10 ते 15 हजार रुपयांच्या पगाराच्या नोकऱ्या अधिक आहेत. यामुळे पदवीधारक अशा नोकऱ्यांकडे आकर्षित होत नाहीत. भारतात मजुरीची समस्या आहे, कामाची नाही. तसेच देशामध्ये क्षेत्रिय आणि भौगोलिक समस्या असल्याचेही पै यांनी सांगितले. 

पै यांनी यावर उपायही सुचविला आहे. भारतात चीनसारखे श्रम प्रधान उद्योग सुरु करावेत आणि बंदरांच्या जवळपास पायाभूत सुविधा बांधाव्यात. तसेच नोकरी करणाऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी उच्च प्रतीच्या संशोधनामध्ये गुंतवमूक करावी, असे त्यांनी म्हटले आहे. 

चीनने हेच केले आहे. इलेक्ट्रॉनिक जोडणी आणि चीप बनविण्यासाठी त्यांनी संशोधनामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली होती. तसेच मोठमोठ्या कंपन्यांना त्या देशाने बोलावले होते. किनारी भागात पायाभूत सुविधा उभारल्या, आपल्याकडे या नीतीचा अभाव असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

बेरोजगारीचे आकडे चुकीचे पै यांनी सांगितले की, सीएमआयईने जारी केलेले 2018 मधील 1.10 कोटी लोकांची नोकरी गेल्याचे बेरोजगारीचे आकडे चुकीचे आहेत. 15 ते 29 वर्षीय नोकरदारांच्या सर्व्हेमध्ये खूप त्रुटी आहेत. ईपीएफओचा आकडा खरा आहे. ज्यामध्ये 60 ते 70 लाख लोकांना वर्षाला रोजगार मिळाला आहे.

टॅग्स :Infosysइन्फोसिस