शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

भारतात नोकऱ्या आहेत, पण पगाराची समस्या; इन्फोसिसच्या माजी सीएफओंचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2019 17:44 IST

भारतात चांगल्या नोकऱ्यांच्या संधी तयार होत नाहीत.

बंगळुरु : भारतात रोजगार निर्मितीवरून विरोधी पक्षांनी गेल्या निवडणुकीत मोदी सरकारवर टीकेची झोड उठविलेली होती. मात्र, इन्फोसिसचे माजी सीएफओ आणि गुंतवणूकदार टी. व्ही. मोहनदास पै यांनी भारतात नोकऱ्या नाही तर पगाराची समस्या असल्याचे म्हटले आहे. भारतात नोकऱ्या उपलब्ध आहेत. मात्र, कमी पगारामुळे पदवीधारक तयार नसल्याचे सांगत बेरोजगारीच्या आकड्यांवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी याबाबत वक्तव्य केले आहे. भारतात चांगल्या नोकऱ्यांच्या संधी तयार होत नाहीत. 10 ते 15 हजार रुपयांच्या पगाराच्या नोकऱ्या अधिक आहेत. यामुळे पदवीधारक अशा नोकऱ्यांकडे आकर्षित होत नाहीत. भारतात मजुरीची समस्या आहे, कामाची नाही. तसेच देशामध्ये क्षेत्रिय आणि भौगोलिक समस्या असल्याचेही पै यांनी सांगितले. 

पै यांनी यावर उपायही सुचविला आहे. भारतात चीनसारखे श्रम प्रधान उद्योग सुरु करावेत आणि बंदरांच्या जवळपास पायाभूत सुविधा बांधाव्यात. तसेच नोकरी करणाऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी उच्च प्रतीच्या संशोधनामध्ये गुंतवमूक करावी, असे त्यांनी म्हटले आहे. 

चीनने हेच केले आहे. इलेक्ट्रॉनिक जोडणी आणि चीप बनविण्यासाठी त्यांनी संशोधनामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली होती. तसेच मोठमोठ्या कंपन्यांना त्या देशाने बोलावले होते. किनारी भागात पायाभूत सुविधा उभारल्या, आपल्याकडे या नीतीचा अभाव असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

बेरोजगारीचे आकडे चुकीचे पै यांनी सांगितले की, सीएमआयईने जारी केलेले 2018 मधील 1.10 कोटी लोकांची नोकरी गेल्याचे बेरोजगारीचे आकडे चुकीचे आहेत. 15 ते 29 वर्षीय नोकरदारांच्या सर्व्हेमध्ये खूप त्रुटी आहेत. ईपीएफओचा आकडा खरा आहे. ज्यामध्ये 60 ते 70 लाख लोकांना वर्षाला रोजगार मिळाला आहे.

टॅग्स :Infosysइन्फोसिस