शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 05:33 IST

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था असून, ती एसआयआर प्रक्रिया राबविताना कायद्याचे पालन करत असल्याचे आम्ही गृहीत धरले आहे. मात्र, त्यात बेकायदेशीर गोष्टी आढळल्या तर बिहारमधील एसआयआर प्रक्रिया बाद केली जाईल.

नवी दिल्ली :  बिहारमधील मतदार यादीच्या विशेष पुनरावलोकन प्रक्रियेदरम्यान (एसआयआर) कोणताही गैरप्रकार आढळल्यास तेथील ही प्रक्रिया रद्द करण्यात येईल, मात्र देशाच्या अन्य भागात ही प्रक्रिया राबविण्यापासून निवडणूक आयोगाला रोखता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी म्हटले. न्या. सूर्यकांत व न्या. जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने बिहारमधील एसआयआरच्या वैधतेबाबत अंतिम युक्तिवादासाठी ७ ऑक्टोबर ही तारीख निश्चित केली आहे. बिहारच्या एसआयआरसंदर्भातील निकालाचा परिणाम देशव्यापी एसआयआर प्रक्रियेवर होणार असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था असून, ती एसआयआर प्रक्रिया राबविताना कायद्याचे पालन करत असल्याचे आम्ही गृहीत धरले आहे. मात्र, त्यात बेकायदेशीर गोष्टी आढळल्या तर बिहारमधील एसआयआर प्रक्रिया बाद केली जाईल.

तसेच आधार कार्डला १२ वा वैध दस्तऐवज मानण्याच्या ८ सप्टेंबरच्या आदेशाच्या पुनर्विचारासाठी दाखल झालेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस जारी केली आहे.

तीन हजार ऑनलाइन अर्ज दाखल

बिहारमधील मोहिमेत पॅरा-लीगल स्वयंसेवकांनी गेल्या दोन आठवड्यांत ३,००० हून अधिक ऑनलाइन अर्ज सादर केले. राजकीय पक्ष व स्वयंसेवी संस्था मतदारांना मदत करत नसल्याची माहिती निवडणूक आयोगाने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात दिली. या स्वयंसेवकांनी ३,३११ दावा/हरकती/सुधारणा दाखल केल्या असून यापैकी १,०२७ प्रकरणांचा निपटारा झाला आहे.