शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

... तोपर्यंत पर्रीकर, आदित्यनाथ, मौर्य देणार नाहीत खासदारकीचा राजीनामा

By admin | Updated: March 22, 2017 12:14 IST

भाजपाचे तीन नेते योगी आदित्यनाथ, मनोहर पर्रीकर आणि केशव प्रसाद मौर्य जुलै महिन्यापर्यंत खासदारकीचा राजीनामा देणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 22 - भाजपाचे तीन नेते योगी आदित्यनाथ, मनोहर पर्रीकर आणि केशव प्रसाद मौर्य जुलै महिन्यात होणा-या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीपर्यंत आपल्या खासदारकीचा राजीनामा देणार नसल्याची माहिती समोर आली आहे.  नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर या नेत्यांना उत्तर प्रदेश आणि गोवा राज्यात पक्षाकडून महत्त्वपूर्ण पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.  मात्र राष्ट्रपती पद निवडीच्या पार्श्वभूमीवर हे तिन्ही नेते सध्यातरी संसदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणार नाहीत. 
 
मनोहर पर्रीकर यांनी पुन्हा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला आहे.  तर योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेश मुख्यमंत्री आणि केशव प्रसाद मौर्य उपमुख्यमंत्रीपद सोपवण्यात आले आहे.  योगी आदित्यनाथ हे गोरखपूर आणि मौर्य फुलपूरचे भाजपाचे खासदार आहेत. तर उत्तर प्रदेशचे दुसरे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा लखनौचे महापौर होते. त्यांनी मात्र आपल्या महापौरपदाचा राजीनामा दिला आहे. 
 
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बनलेल्या या भाजपा नेत्यांकडे आपल्या खासदारकीचा राजीनामा देण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी आहे. म्हणजे खासदारकीचा राजीनामा देण्यासाठी या तिन्ही नेत्यांकडे सप्टेंबर महिन्यांपर्यंतचा अवधी आहे. 
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, भाजपाने सध्या पोटनिवडणुकीपेक्षा सर्व लक्ष राष्ट्रपती पद निवडणुकीवर केंद्रीत केले आहे. नुकत्याच झालेल्या 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला मोठं यश मिळल्यानंतर पुढील राष्ट्रपती भाजपाच्या पसंतीचा असेल, असे म्हटले जात आहे.  
 
भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याच्या माहितीनुसार, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर 14 दिवसांच्या आत या तिघांनाही खासदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. त्यामुळे आम्हाला घाई नाही. पोटनिवडणुकीपेक्षाही अनेक गंभीर मुद्दे पक्षापुढे आहेत.
आदित्यनाथ आणि मौर्य यांच्यापुढे विधानसभेऐवजी विधानपरिषदेची पोटनिवडणूक लढण्याचादेखील पर्याय आहे. यापूर्वीचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि मायावती विधानपरिषदेचेच सदस्य होते.  कारण त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली नव्हती.  दरम्यान, योगी यांनाही खासदारकीचा राजीनामा देण्यासाठी कोणतीही घाई झालेली नाही. कारण त्यांच्यासाठी पक्षाचे अनेक आमदारांनी आपली विधानसभा जागा सोडण्यास तयार दर्शवली आहे.