शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

...तर पाकिस्तानी संघ भारतात येणार नाही

By admin | Updated: March 10, 2016 19:16 IST

भारत सरकार सुरक्षेची पूर्ण खात्री देत नाही तोपर्यंत पाकिस्तानी संघ आयसीसी टी-२० वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतात येणार नाही.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १० - भारत सरकार सुरक्षेची पूर्ण खात्री देत नाही तोपर्यंत पाकिस्तानी संघ आयसीसी टी-२० वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतात येणार नाही असे पाकिस्तानचे अंतर्गत मंत्री चौधरी निसार अली खान यांनी गुरुवारी सांगितले. 
पाकिस्तानने सुरक्षेची चिंता व्यक्त केल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी धरमशाळा येथील सामन्याचे नियोजित स्थळ बदलून कोलकात्याला हलवले. 
भारताकडून इतका सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर पाकिस्तान विनाकारण सुरक्षेला मुद्दा बनवत आहे. सामन्याचे स्थळ बदलले ही चांगली गोष्ट आहे पण सुरक्षेसंदर्भात भारत सरकारकडून जो प्रतिसाद मिळतोय त्यावर समाधानी नसल्याचे चौधरी निसार अली खान यांनी सांगितले. 
पाकिस्तानी संघाला भारतात धोका आहे, काही संघटना खेळात अडथळे आणण्याची धमकी देत आहेत, अशा परिस्थितीत क्रिकेट कसे खेळले जाऊ शकते असे चौधरी निसार अली खान यांचे म्हणणे आहे.