शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
2
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
3
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
4
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
5
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
6
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?
7
"4 दिवसांचं युद्ध..."; पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनीही PM शहबाज शरीफ यांच्या मोठ-मोठ्या बढाया, भारताविरोधात काय काय बोलले?
8
Janmashtami 2025: ढाक्कु माकुम ढाक्कु माकुम; 'या' राशींना फळणार गोपाळकाला, काय होणार लाभ?
9
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
10
शाहरुख खानचा 'किंग' पुढे ढकलला, काय आहे कारण? लेकीचा वडिलांसोबत पहिलाच सिनेमा
11
बायडेन यांच्या मुलानं असं काय म्हटलं की ट्रम्पच्या पत्नीला आला भयंकर राग; पाठवली १ अरब डॉलर्सची नोटिस
12
Sawaliya Foods Products shares: लिस्ट होताच IPO नं दिला १००% चा रिटर्न; पहिल्याच दिवशी दुप्पट झाले गुंतवणुकदारांचे पैसे
13
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
14
अर्जुन तेंडुलकर-सानिया जोडी जमली! या क्रिकेटर्सप्रमाणे त्याची कारकिर्दही बहरणार का?
15
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा
16
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
17
Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
18
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
19
त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट
20
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!

“…तेव्हा माझ्या मनात आत्महत्या करण्याचा विचार आला होता”; अण्णा हजारे यांनी केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 14:40 IST

युवकांमध्ये असलेली कौशल्य क्षमता वाढवण्यासाठी आणि त्यांच्या विचारांना नव्यानं संधी देण्यासाठी आशियातील सर्वात प्रतिष्ठीत श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्सतर्फे टेडएक्स कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

ठळक मुद्देआपल्या जीवनात ध्येय बनवा. काही तरी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवा आणि पुढील वाटचाल करा मला देशाची सेवा करायची आहे हे निश्चित केले. त्यानंतर मी माझ्या मार्गावर चालायला लागलो. युवकांनी धूम्रपान, तंबाखू आणि दारू यासारख्या नशेपासून दूर राहण्याचा सल्ला अण्णांनी दिला.

नवी दिल्ली – युवा अवस्थेत युवकांच्या मनात अनेक विचार येत असतात. तरूण वयात माझ्याही मनात खूप विचार यायचे. २५ व्या वर्षी मनात विचार आला की, या जीवनात काय आहे? कशासाठी आपण जगतोय? इतकचं नाही तर आत्महत्या करण्याचा विचारही माझ्या मनात आला होता. माझं जगणं मला व्यर्थ वाटू लागलं होतं असं विधान ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी केले आहे.

युवकांमध्ये असलेली कौशल्य क्षमता वाढवण्यासाठी आणि त्यांच्या विचारांना नव्यानं संधी देण्यासाठी आशियातील सर्वात प्रतिष्ठीत श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्सतर्फे टेडएक्स कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला अजीत बजाज, जावेद अख्तर आणि सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी युवकांना मार्गदर्शन केले. यावेळी अण्णा हजारे म्हणाले की, काही कामानिमित्त मी दिल्लीला आलो होतो. दिल्ली रेल्वे स्टेशनवर असलेल्या एका बुक स्टॉलवर मला स्वामी विवेकानंद यांचे पुस्तक दिसलं. मी ते विकत घेतले. ते पुस्तक मी वाचलं आणि मला जीवनाचा अर्थ कळाला असं ते म्हणाले.

या पुस्तकात विवेकानंदांनी लिहिलं होतं की, आपल्या जीवनात ध्येय बनवा. काही तरी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवा आणि पुढील वाटचाल करा. जेव्हा त्या मार्गावर चालाल तेव्हा अनेकदा अडचणींचा सामना करावा लागेल. बस्स तेव्हाच मला माझ्या मनातील सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. मला देशाची सेवा करायची आहे हे निश्चित केले. त्यानंतर मी माझ्या मार्गावर चालायला लागलो. खूप समस्या आल्या, खाण्यासाठी पैसे नव्हते. बसने प्रवास करायला पैसे नाहीत. परंतु पुढे जात राहिलो. छोटे छोटे प्रयत्न करत राहिलो. त्यात यश मिळालं असं अण्णा हजारेंनी सांगितले.

दरम्यान, युवकांनी धूम्रपान, तंबाखू आणि दारू यासारख्या नशेपासून दूर राहण्याचा सल्ला अण्णांनी दिला. या चांगल्या गोष्टी नाहीत. देशाला युवकांची गरज आहे. देशात अनेक समस्या आहेत ज्याला युवक संपवू शकतात. यावेळी अण्णांनी दिल्लीतील भ्रष्टाचारविरोधी आंदोलनांचा उल्लेख केला. देशातील विविध क्षेत्राच्या विकासासाठी युवकांची गरज आहे. तुम्ही तुमच्या जीवनाचं ध्येय बनवा आणि तुमचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करा असं आवाहन अण्णा हजारे यांनी युवकांना केले.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारे