शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

जग हिंदुत्वाकडं बघतय, प्रत्येक हिंदूपर्यंत पोहोचावं लागेल; थायलंडमधून मोहन भागवतांचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 16:41 IST

भागवत म्हणाले, भारत आनंदाचा आणि समाधानाचा मार्ग दाखवेल, हे कोरोना महामारीनंतर संपूर्ण जगाने मान्य केले आहे आणि सर्वसम्मतीने यावर विचारही करत आहे.

भौतिकवाद, साम्यवाद आणि भांडवलशाहीच्या प्रयोगांनंतर डगमगणाऱ्या जगाला आनंदाचा आणि समाधानाचा मार्ग भारत दाखवेल, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. ते शुक्रवारी थायलंडच्या राजधानीत आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या विश्व हिंदू काँग्रेसच्या उद्घाटन सत्रात बोलत होते. यावेळी त्यांनी जगभरातील हिंदूंना एकमेकांशी जोडले जाण्यासंदर्भात आवाहनही केले.

यावेळी भागवत, 'जगभरातील विचारवंत, कार्यकर्ते, नेते आणि उद्योजकांना संबोधित करताना म्हणाले, 'आपल्याला प्रत्येक हिंदूपर्यंत पोहोचावे लागेल, त्यांच्यासोबत संपर्क साधावा लागेल. सर्व हिंदू एकत्र येऊन जगभरातील हिंदूंसोबत संपर्क साधतील. हिंदू अधिकाधिक संख्येने एकमेकांसोबत जोडले जात आहेत आणि जगाशी संपर्क साधण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.'

भागवत म्हणाले, भारत आनंदाचा आणि समाधानाचा मार्ग दाखवेल, हे कोरोना महामारीनंतर संपूर्ण जगाने मान्य केले आहे आणि सर्वसम्मतीने यावर विचारही करत आहे. ते म्हणाले, सध्या संपूर्ण जग भौतिकवाद, साम्यवाद आणि भांडवलशाहीचे प्रयोगा करताना डगमगत आहे आणि आनंदाच्या शोधात हिंदुत्वाकडे बघत आहे.

सरसंघचालक म्हणाले, 'आजचे जग डगमगत आहे, चाचपडत आहे. गेली 2,000 वर्षे त्यांनी आनंद आणि शांतेसाठी भौतिकवाद, साम्यवाद आणि भांडवलशाहीचे प्रयोग केले. त्यांनी अनेक धर्मांशी संबंधित प्रयोगही केले. त्यांना भौतिक समृद्धी मिळाली. मात्र, समाधान मिळाले नाही. आता कोरोना महामारीनंतर, त्यांनी यावर पुनर्विचार करायला सुरुवात केली आहे. आता, भारतच मार्ग दाकवेल, यावर त्यांचे एकमत झाल्यासारखे वाटत आहे.

'आपल्याला सर्वांशी संपर्क साधावा लागेल आणि त्यांना आपल्या सेवांच्या माध्यमाने आमच्याकडे आणावे लागेल. आपल्याकडे उत्साह आहे. निःस्वार्थ सेवेसाठी आपण जगात अग्रेसर आहोत. हे आपल्या परंपरा आणि मूल्यांमध्ये आहे. यामुळे लोकांपर्यंत पोहोचा आणि त्यांची मने जिंका,' असेही भागवत म्हणाले. 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघHindutvaहिंदुत्व