शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

जग हिंदुत्वाकडं बघतय, प्रत्येक हिंदूपर्यंत पोहोचावं लागेल; थायलंडमधून मोहन भागवतांचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 16:41 IST

भागवत म्हणाले, भारत आनंदाचा आणि समाधानाचा मार्ग दाखवेल, हे कोरोना महामारीनंतर संपूर्ण जगाने मान्य केले आहे आणि सर्वसम्मतीने यावर विचारही करत आहे.

भौतिकवाद, साम्यवाद आणि भांडवलशाहीच्या प्रयोगांनंतर डगमगणाऱ्या जगाला आनंदाचा आणि समाधानाचा मार्ग भारत दाखवेल, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. ते शुक्रवारी थायलंडच्या राजधानीत आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या विश्व हिंदू काँग्रेसच्या उद्घाटन सत्रात बोलत होते. यावेळी त्यांनी जगभरातील हिंदूंना एकमेकांशी जोडले जाण्यासंदर्भात आवाहनही केले.

यावेळी भागवत, 'जगभरातील विचारवंत, कार्यकर्ते, नेते आणि उद्योजकांना संबोधित करताना म्हणाले, 'आपल्याला प्रत्येक हिंदूपर्यंत पोहोचावे लागेल, त्यांच्यासोबत संपर्क साधावा लागेल. सर्व हिंदू एकत्र येऊन जगभरातील हिंदूंसोबत संपर्क साधतील. हिंदू अधिकाधिक संख्येने एकमेकांसोबत जोडले जात आहेत आणि जगाशी संपर्क साधण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.'

भागवत म्हणाले, भारत आनंदाचा आणि समाधानाचा मार्ग दाखवेल, हे कोरोना महामारीनंतर संपूर्ण जगाने मान्य केले आहे आणि सर्वसम्मतीने यावर विचारही करत आहे. ते म्हणाले, सध्या संपूर्ण जग भौतिकवाद, साम्यवाद आणि भांडवलशाहीचे प्रयोगा करताना डगमगत आहे आणि आनंदाच्या शोधात हिंदुत्वाकडे बघत आहे.

सरसंघचालक म्हणाले, 'आजचे जग डगमगत आहे, चाचपडत आहे. गेली 2,000 वर्षे त्यांनी आनंद आणि शांतेसाठी भौतिकवाद, साम्यवाद आणि भांडवलशाहीचे प्रयोग केले. त्यांनी अनेक धर्मांशी संबंधित प्रयोगही केले. त्यांना भौतिक समृद्धी मिळाली. मात्र, समाधान मिळाले नाही. आता कोरोना महामारीनंतर, त्यांनी यावर पुनर्विचार करायला सुरुवात केली आहे. आता, भारतच मार्ग दाकवेल, यावर त्यांचे एकमत झाल्यासारखे वाटत आहे.

'आपल्याला सर्वांशी संपर्क साधावा लागेल आणि त्यांना आपल्या सेवांच्या माध्यमाने आमच्याकडे आणावे लागेल. आपल्याकडे उत्साह आहे. निःस्वार्थ सेवेसाठी आपण जगात अग्रेसर आहोत. हे आपल्या परंपरा आणि मूल्यांमध्ये आहे. यामुळे लोकांपर्यंत पोहोचा आणि त्यांची मने जिंका,' असेही भागवत म्हणाले. 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघHindutvaहिंदुत्व