शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

सरकारी खाक्या सोडून काम करा, अन्यथा गाशा गुंडाळा; ‘बीएसएनएल’ला दूरसंचार मंत्र्यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2022 07:23 IST

बीएसएनएलसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने १.६४ लाख कोटींचे पुनरुज्जीवन पॅकेज मंजूर केले आहे.

नवी दिल्ली : १.६४ लाख कोटी रुपयांचे भरघोस पुनरुज्जीवन पॅकेज मंजूर केल्यानंतर सरकारने बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांना गंभीर इशारा दिला आहे. ‘चलता है’ हा सरकारी खाक्या सोडा आणि उच्च दर्जाच्या व्यावसायिकतेने काम करा. ज्यांना जमणार नाही, त्यांना सक्तीने निवृत्त करून घरी पाठवले जाईल, अशी तंबी दूरसंचारमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.

बीएसएनएलसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने १.६४ लाख कोटींचे पुनरुज्जीवन पॅकेज मंजूर केले आहे. ६२ हजार मजबूत कर्मचारी वर्ग असलेल्या बीएसएनलच्या वरिष्ठ व्यवस्थापनाची एक महत्त्वाची बैठक वैष्णव यांनी घेतली. त्यावेळी त्यांनी म्हटले की, ‘कामगिरी दाखवा अथवा नष्ट व्हा’ हे आता ‘न्यू नाॅर्मल‘ असेल. जे कर्मचारी काम करणार नाहीत, त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन घरी जावे.

एमटीएनएल’बाबत आशा सोडली

दूरसंचार क्षेत्रात एमटीएनएल आणि बीएसएनएल या २ सरकारी कंपन्या कार्यरत आहेत. दोन्ही कंपन्या डबघाईला आल्या आहेत. एमटीएनएलबाबत तर आशाच सरकारने साेडली आहे. वैष्णव यांनी म्हटले की, ‘एमटीएनएलला कोणतेही भवितव्य नाही. त्यांच्यासाठी आम्ही फार काही करू शकत नाही. एमटीएनएलचे पुढे काय करायचे, याचा निर्णय लवकरच घेतला जाईल.’

टॅग्स :BSNLबीएसएनएलMTNLएमटीएनएल