शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

तिन्ही पत्नी ग्रा. पं. ला उभ्या राहिल्या; कोणाचा प्रचार करायचा, नवऱ्याने अशी शक्कल लढविली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 16:07 IST

तीन महिलांचा पती असलेल्या या पंचायत सचिवाची चांगलीच गोची झाली आहे. त्याच्यावर तिन्ही पत्नींनी आपलाच प्रचार करण्यासाठी दबाव टाकला आहे.

सध्या सर्वत्र निवडणुकीचे वारे आहेत. मध्य प्रदेशमधून एक खतरनाक खबर येत आहे. सिंगरौली जिल्ह्यातील एका पंचायत सचिवाच्या तीन पत्नी आहेत. या तिन्ही पत्नी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उभ्या ठाकल्या आहेत. मजेशीर बाब म्हणजे, दोन पत्नी या एकाच ग्रामपंचायतीतून सरपंच निवडणुकीसाठी एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत. तर तिसरी सदस्य पदासाठी उभी राहिली आहे. 

यामुळे बिचाऱ्या या पंचायत सचिवाची चांगलीच गोची झाली आहे. त्याच्यावर तिन्ही पत्नींनी आपलाच प्रचार करण्यासाठी दबाव टाकला आहे. तो एवढा पेचात अडकला आहे की त्याने घरच नाही तर गावही सोडून पलायन केले आहे. 

देवसरमधील घोंघरा ग्रा. पंचायतीमध्ये सुखराम सिंह हा सचिव आहे. त्याच्या तीन पत्नी आहेत. सुखरामची पहिली पत्नी देवसरमधून सदस्य पदासाठी निवडणूक लढवत आहे. दिसरी पत्नी कसुमकली आणि तिसरी पत्नी गीता सिंह या पिपरखड़ ग्राम पंचायत मध्ये सरपंच पदासाठी उभ्या ठाकल्या आहेत. कोणाही जिंकले तरी सरपंच पद घरातच असेल, अशी पाचही बोटे तुपात असतील अशा परिस्थितीत असलेला नवरा मात्र घर सोडून पळाला आहे. 

या दोघींनाही वाटतेय सुखरामने आपलाच प्रचार करावा. हे प्रकरण आता जनपदच्या सीईओंकडे जाऊन पोहोचले आहे. त्यांनी हिंदू कायद्यानुसार तिन्ही महिलांना एकाच व्यक्तीच्या पत्नी असल्याने नोटीस दिली आहे. परंतू अद्याप त्यांचा अर्ज रद्द करण्यात आलेला नाही. तसेच या महिलांनी देखील कोणतीही तक्रार दिलेली नाहीय. यामुळे जर पत्नींना कोणती समस्या नसेल तर आम्ही देखील कारवाई करू शकत नाही, जेव्हा तक्रार येईल तेव्हा कारवाई केली जाईल असे सीईओ बीके सिंह यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेश