शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
अर्चना तिवारी चतुर निघाली!ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
3
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
4
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
5
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
6
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
8
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
9
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
10
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
11
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
13
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
14
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
15
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
16
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
17
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
18
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
19
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
20
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ

६ हजार मीटर समुद्राच्या खोलीत जाणार टीम; काय आहे भारताचं मिशन 'समुद्रयान'?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 15:24 IST

टाइटेनियमपासून बनवलेली ही अत्याधुनिक पाणबुडी आहे. यातील ६० टक्के भाग स्वदेशी बनावटीचा आहे

नवी दिल्ली - समुद्रातील तळाशी असलेला खजिना आणि गूढ रहस्यांचा शोध घेण्यासाठी भारताचं मिशन समुद्रयान सुरू झाले आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी (NIOT), चेन्नईने यासाठी एक विशेष पाणबुडी विकसित केली आहे. मत्स्य ६०००. यातून तीन तज्ज्ञांची टीम समुद्रात ६००० मीटर खोलवर उतरेल, ज्याचा उद्देश ब्लू इकॉनॉमीसाठी संधी शोधणे हा आहे.

कशी झाली सुरुवात?याआधी वैज्ञानिकांनी ५०० मीटर खोल जाणारी पाणबुडी बनवली. बंगालच्या खाडीत सागर निधी जहाजातून त्याची चाचणी झाली. याच्या यशस्वी चाचणीनंतर २०२१ ला ग्रीन सिग्नल मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्वातंत्र्यदिनी याचा उल्लेख केला होता. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी या मिशनचा भाग आहे. ६ हजार कोटींची ही योजना असून आतापर्यंत ४ हजार ७७ कोटी खर्च झाल्याची माहिती आहे. 

टाइटेनियमपासून बनवलेली ही अत्याधुनिक पाणबुडी आहे. यातील ६० टक्के भाग स्वदेशी बनावटीचा आहे. या पाणबुडीचं व्यास २.१ मीटर आहे. त्यात पॉलिमेटेलिक मॅगजीन, नोड्यूल, हाइड्रेट्स गॅस, हाइड्रो थर्मल सल्फाइड उपलब्ध आहे. त्याचसोबत रडार आणि भूकंपविरहित उपकरणाचा यात समावेश आहे. हे समुद्रयान ३ जणांना समुद्राच्या तळाशी घेऊन जाईल. १२ कॅमेऱ्याच्या माध्यमातून मत्स्य ६००० ची प्रक्रिया पूर्ण होईल. जवळपास ९६ तास ही पाणबुडी ६ हजार मीटर समुद्रात राहू शकते. २०२३ च्या अखेरपर्यंत ५०० मीटरची पहिली चाचणी होईल. डिसेंबर २०२४ पर्यंत पाणबुडीच्या सर्व चाचणी पार पडतील. २०२६ पर्यंत हे मिशन पूर्ण होण्याची शक्यता आहे. 

ब्ल्यू इकोनॉमी...भारताला एकूण ७ हजार ५१७ किमी समुद्रकिनारा लाभला आहे. त्यात ९ समुद्रकिनारी राज्ये आणि १३८२ बेटे आहेत. या मिशनमुळे ब्ल्यू इकोनॉमी मजबूत केली जाणार आहे. मत्स्य पालन आणि जलकृषी यातून विकसित होईल. समुद्रात असणारे गॅस हाइड्रेट्स, पॉलिमेटेलिक, मॅगनीज, हाइड्रो थर्मल सल्फाइड आणि कोबाल्ट क्रस्ट खनिजे सापडण्याची शक्यता आहे. १००० ते ५५०० मीटर खोलीवर या गोष्टी आढळतात. यातून देशाच्या इकोनॉमीला बूस्टर डोस मिळेल.