शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात बुडालो'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
"प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
4
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
5
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
6
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
7
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
8
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
9
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
10
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
11
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना
12
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
13
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
14
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
15
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
16
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
17
मेट्रोत पुन्हा तांत्रिक बिघाड; प्रवाशांना गाडीतून उतरवले; कार्यालय सुटण्याच्या वेळीच गोंधळ
18
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
19
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
20
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल

"...मग त्या खाली मंदिर कसे असेल?"; अजमेर शरीफ दर्ग्यावरुन आध्यात्मिक प्रमुखांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 17:49 IST

राजस्थानच्या अजमेर शरीफ दर्ग्यातील शिवमंदिरावर दावा करणाऱ्या एका खटल्यात दर्ग्याच्या प्रमुखांनी आपली भूमिका मांडली आहे.

Ajmer Sharif Dargah : अजमेर दर्ग्यावरुन राजकारण शिगेला पोहोचले आहे. दर्ग्याच्या खाली शिवमंदिर असल्याचा दावा केला जात आहे. यासंदर्भातील याचिकाही कनिष्ठ न्यायालयात दाखल करण्यात आली होती, त्यावर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेण्याचे मान्य केले आहे. दुसरीकडे, राजस्थानच्या अजमेर शरीफ दर्ग्यातील शिवमंदिरावर दावा करणाऱ्या एका खटल्यात दर्ग्याचे आध्यात्मिक प्रमुख सय्यद जैनुल अबेदिन अली खान यांनी आपली भूमिका मांडली आहे. १५० वर्षांपासून कबर आहे तर त्या खाली मंदिर कसे असेल असा सवाल सय्यद जैनुल अबेदिन अली खान यांनी केला आहे.

हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी अजमेर शरीफ दर्गा या श्रद्धेय सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्याच्या सर्वेक्षणाची मागणी केली होती. अजमेर येथील एका न्यायालयाने बुधवारी ही याचिका मान्य केली. न्यायालयाने या प्रकरणी पुढील सुनावणीसाठी २० डिसेंबर ही तारीख निश्चित केली आहे. अशा वादग्रस्त वास्तूंच्या खाली असलेल्या मंदिरांच्या उपस्थितीची चौकशी करण्याचा निर्णय योग्य असल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला आहे. तर सय्यद जैनुल अबेदिन अली खान यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केलं आहे.

"अजमेर दर्ग्याबाबत सुरू असलेला वाद आणि विविध वाहिन्यांवर होत असलेली विविध विधाने पाहता मला येथे येऊन वस्तुस्थिती तुमच्यासमोर मांडावी लागली. मी जनतेला आवाहन करतो की, शांतता राखावी आणि असे काहीही करू नका वाद निर्माण होऊ शकतो. आम्हाला कायदेशीर अधिकार आहेत, आम्ही न्यायालयात जाऊ शकतो. जेव्हा भारत सरकार गरीब नवाज रहमतुल्ला अलैया कायदा (दर्गा ख्वाजा साहेब कायदा, १९५५) पास करत होते. त्याआधी १९५० मध्ये भारत सरकारने अलाहाबाद उच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश गुलाम हसन यांच्या अध्यक्षतेखाली दर्ग्याच्या गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. चौकशी समितीचा अहवाल सरकारकडे आहे. त्या वेळी हे सर्व 'कच्चे' होते, असे पान १८ वर स्पष्ट लिहिले आहे. गरीब नवाज रहमतुल्लाहम जेव्हा येथे आले तेव्हा ते 'कच्चा' मैदान होते आणि त्यावर त्यांची मजार बांधण्यात आली होती.  जेव्हा कबर कच्च्या जमिनीवर बांधली जाते आणि १५० वर्षे कबर कच्चीच राहते, मग त्या खाली मंदिर कसे असेल?," असा सवाल दर्गाचे  प्रमुख सय्यद जैनुल अबेदिन अली खान यांनी म्हटलं आहे.

"१९४७ पासून पंतप्रधान येथे चादर पाठवत आहेत. अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यपाल आणि आरएसएस प्रमुखांनीही येथे चादर दिली आहे. याशिवाय राजकीय पक्षांचे प्रमुख येथे चादर पाठवतात. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वतीने चादरही अर्पण केली जाते. इथली हिंदू लोकसंख्या रोज सकाळी दुकाने उघडण्याआधी इथून जाताना त्यांच्या दुकानाच्या चाव्या दर्ग्याच्या पायऱ्यांवर ठेवतात. स्त्रिया आपल्या मुलांसोबत मशिदीबाहेर उभ्या राहतात जेणेकरून जो कोणी नमाज अदा केल्यानंतर मशिदीतून जातो तो आपल्या मुलावर फुंकर मारतो जेणेकरून त्यांच्या मुलाला कोणताही आजार झाला असेल तो बरा होऊ शकेल," असेही सय्यद जैनुल अबेदिन अली खान म्हणाले. 

टॅग्स :Rajasthanराजस्थान