शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

"...मग त्या खाली मंदिर कसे असेल?"; अजमेर शरीफ दर्ग्यावरुन आध्यात्मिक प्रमुखांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 17:49 IST

राजस्थानच्या अजमेर शरीफ दर्ग्यातील शिवमंदिरावर दावा करणाऱ्या एका खटल्यात दर्ग्याच्या प्रमुखांनी आपली भूमिका मांडली आहे.

Ajmer Sharif Dargah : अजमेर दर्ग्यावरुन राजकारण शिगेला पोहोचले आहे. दर्ग्याच्या खाली शिवमंदिर असल्याचा दावा केला जात आहे. यासंदर्भातील याचिकाही कनिष्ठ न्यायालयात दाखल करण्यात आली होती, त्यावर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेण्याचे मान्य केले आहे. दुसरीकडे, राजस्थानच्या अजमेर शरीफ दर्ग्यातील शिवमंदिरावर दावा करणाऱ्या एका खटल्यात दर्ग्याचे आध्यात्मिक प्रमुख सय्यद जैनुल अबेदिन अली खान यांनी आपली भूमिका मांडली आहे. १५० वर्षांपासून कबर आहे तर त्या खाली मंदिर कसे असेल असा सवाल सय्यद जैनुल अबेदिन अली खान यांनी केला आहे.

हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी अजमेर शरीफ दर्गा या श्रद्धेय सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्याच्या सर्वेक्षणाची मागणी केली होती. अजमेर येथील एका न्यायालयाने बुधवारी ही याचिका मान्य केली. न्यायालयाने या प्रकरणी पुढील सुनावणीसाठी २० डिसेंबर ही तारीख निश्चित केली आहे. अशा वादग्रस्त वास्तूंच्या खाली असलेल्या मंदिरांच्या उपस्थितीची चौकशी करण्याचा निर्णय योग्य असल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला आहे. तर सय्यद जैनुल अबेदिन अली खान यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केलं आहे.

"अजमेर दर्ग्याबाबत सुरू असलेला वाद आणि विविध वाहिन्यांवर होत असलेली विविध विधाने पाहता मला येथे येऊन वस्तुस्थिती तुमच्यासमोर मांडावी लागली. मी जनतेला आवाहन करतो की, शांतता राखावी आणि असे काहीही करू नका वाद निर्माण होऊ शकतो. आम्हाला कायदेशीर अधिकार आहेत, आम्ही न्यायालयात जाऊ शकतो. जेव्हा भारत सरकार गरीब नवाज रहमतुल्ला अलैया कायदा (दर्गा ख्वाजा साहेब कायदा, १९५५) पास करत होते. त्याआधी १९५० मध्ये भारत सरकारने अलाहाबाद उच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश गुलाम हसन यांच्या अध्यक्षतेखाली दर्ग्याच्या गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. चौकशी समितीचा अहवाल सरकारकडे आहे. त्या वेळी हे सर्व 'कच्चे' होते, असे पान १८ वर स्पष्ट लिहिले आहे. गरीब नवाज रहमतुल्लाहम जेव्हा येथे आले तेव्हा ते 'कच्चा' मैदान होते आणि त्यावर त्यांची मजार बांधण्यात आली होती.  जेव्हा कबर कच्च्या जमिनीवर बांधली जाते आणि १५० वर्षे कबर कच्चीच राहते, मग त्या खाली मंदिर कसे असेल?," असा सवाल दर्गाचे  प्रमुख सय्यद जैनुल अबेदिन अली खान यांनी म्हटलं आहे.

"१९४७ पासून पंतप्रधान येथे चादर पाठवत आहेत. अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यपाल आणि आरएसएस प्रमुखांनीही येथे चादर दिली आहे. याशिवाय राजकीय पक्षांचे प्रमुख येथे चादर पाठवतात. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वतीने चादरही अर्पण केली जाते. इथली हिंदू लोकसंख्या रोज सकाळी दुकाने उघडण्याआधी इथून जाताना त्यांच्या दुकानाच्या चाव्या दर्ग्याच्या पायऱ्यांवर ठेवतात. स्त्रिया आपल्या मुलांसोबत मशिदीबाहेर उभ्या राहतात जेणेकरून जो कोणी नमाज अदा केल्यानंतर मशिदीतून जातो तो आपल्या मुलावर फुंकर मारतो जेणेकरून त्यांच्या मुलाला कोणताही आजार झाला असेल तो बरा होऊ शकेल," असेही सय्यद जैनुल अबेदिन अली खान म्हणाले. 

टॅग्स :Rajasthanराजस्थान