शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

"...मग त्या खाली मंदिर कसे असेल?"; अजमेर शरीफ दर्ग्यावरुन आध्यात्मिक प्रमुखांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 17:49 IST

राजस्थानच्या अजमेर शरीफ दर्ग्यातील शिवमंदिरावर दावा करणाऱ्या एका खटल्यात दर्ग्याच्या प्रमुखांनी आपली भूमिका मांडली आहे.

Ajmer Sharif Dargah : अजमेर दर्ग्यावरुन राजकारण शिगेला पोहोचले आहे. दर्ग्याच्या खाली शिवमंदिर असल्याचा दावा केला जात आहे. यासंदर्भातील याचिकाही कनिष्ठ न्यायालयात दाखल करण्यात आली होती, त्यावर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेण्याचे मान्य केले आहे. दुसरीकडे, राजस्थानच्या अजमेर शरीफ दर्ग्यातील शिवमंदिरावर दावा करणाऱ्या एका खटल्यात दर्ग्याचे आध्यात्मिक प्रमुख सय्यद जैनुल अबेदिन अली खान यांनी आपली भूमिका मांडली आहे. १५० वर्षांपासून कबर आहे तर त्या खाली मंदिर कसे असेल असा सवाल सय्यद जैनुल अबेदिन अली खान यांनी केला आहे.

हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी अजमेर शरीफ दर्गा या श्रद्धेय सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्याच्या सर्वेक्षणाची मागणी केली होती. अजमेर येथील एका न्यायालयाने बुधवारी ही याचिका मान्य केली. न्यायालयाने या प्रकरणी पुढील सुनावणीसाठी २० डिसेंबर ही तारीख निश्चित केली आहे. अशा वादग्रस्त वास्तूंच्या खाली असलेल्या मंदिरांच्या उपस्थितीची चौकशी करण्याचा निर्णय योग्य असल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला आहे. तर सय्यद जैनुल अबेदिन अली खान यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केलं आहे.

"अजमेर दर्ग्याबाबत सुरू असलेला वाद आणि विविध वाहिन्यांवर होत असलेली विविध विधाने पाहता मला येथे येऊन वस्तुस्थिती तुमच्यासमोर मांडावी लागली. मी जनतेला आवाहन करतो की, शांतता राखावी आणि असे काहीही करू नका वाद निर्माण होऊ शकतो. आम्हाला कायदेशीर अधिकार आहेत, आम्ही न्यायालयात जाऊ शकतो. जेव्हा भारत सरकार गरीब नवाज रहमतुल्ला अलैया कायदा (दर्गा ख्वाजा साहेब कायदा, १९५५) पास करत होते. त्याआधी १९५० मध्ये भारत सरकारने अलाहाबाद उच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश गुलाम हसन यांच्या अध्यक्षतेखाली दर्ग्याच्या गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. चौकशी समितीचा अहवाल सरकारकडे आहे. त्या वेळी हे सर्व 'कच्चे' होते, असे पान १८ वर स्पष्ट लिहिले आहे. गरीब नवाज रहमतुल्लाहम जेव्हा येथे आले तेव्हा ते 'कच्चा' मैदान होते आणि त्यावर त्यांची मजार बांधण्यात आली होती.  जेव्हा कबर कच्च्या जमिनीवर बांधली जाते आणि १५० वर्षे कबर कच्चीच राहते, मग त्या खाली मंदिर कसे असेल?," असा सवाल दर्गाचे  प्रमुख सय्यद जैनुल अबेदिन अली खान यांनी म्हटलं आहे.

"१९४७ पासून पंतप्रधान येथे चादर पाठवत आहेत. अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यपाल आणि आरएसएस प्रमुखांनीही येथे चादर दिली आहे. याशिवाय राजकीय पक्षांचे प्रमुख येथे चादर पाठवतात. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वतीने चादरही अर्पण केली जाते. इथली हिंदू लोकसंख्या रोज सकाळी दुकाने उघडण्याआधी इथून जाताना त्यांच्या दुकानाच्या चाव्या दर्ग्याच्या पायऱ्यांवर ठेवतात. स्त्रिया आपल्या मुलांसोबत मशिदीबाहेर उभ्या राहतात जेणेकरून जो कोणी नमाज अदा केल्यानंतर मशिदीतून जातो तो आपल्या मुलावर फुंकर मारतो जेणेकरून त्यांच्या मुलाला कोणताही आजार झाला असेल तो बरा होऊ शकेल," असेही सय्यद जैनुल अबेदिन अली खान म्हणाले. 

टॅग्स :Rajasthanराजस्थान