शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

"...मग त्या खाली मंदिर कसे असेल?"; अजमेर शरीफ दर्ग्यावरुन आध्यात्मिक प्रमुखांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 17:49 IST

राजस्थानच्या अजमेर शरीफ दर्ग्यातील शिवमंदिरावर दावा करणाऱ्या एका खटल्यात दर्ग्याच्या प्रमुखांनी आपली भूमिका मांडली आहे.

Ajmer Sharif Dargah : अजमेर दर्ग्यावरुन राजकारण शिगेला पोहोचले आहे. दर्ग्याच्या खाली शिवमंदिर असल्याचा दावा केला जात आहे. यासंदर्भातील याचिकाही कनिष्ठ न्यायालयात दाखल करण्यात आली होती, त्यावर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेण्याचे मान्य केले आहे. दुसरीकडे, राजस्थानच्या अजमेर शरीफ दर्ग्यातील शिवमंदिरावर दावा करणाऱ्या एका खटल्यात दर्ग्याचे आध्यात्मिक प्रमुख सय्यद जैनुल अबेदिन अली खान यांनी आपली भूमिका मांडली आहे. १५० वर्षांपासून कबर आहे तर त्या खाली मंदिर कसे असेल असा सवाल सय्यद जैनुल अबेदिन अली खान यांनी केला आहे.

हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी अजमेर शरीफ दर्गा या श्रद्धेय सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्याच्या सर्वेक्षणाची मागणी केली होती. अजमेर येथील एका न्यायालयाने बुधवारी ही याचिका मान्य केली. न्यायालयाने या प्रकरणी पुढील सुनावणीसाठी २० डिसेंबर ही तारीख निश्चित केली आहे. अशा वादग्रस्त वास्तूंच्या खाली असलेल्या मंदिरांच्या उपस्थितीची चौकशी करण्याचा निर्णय योग्य असल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला आहे. तर सय्यद जैनुल अबेदिन अली खान यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केलं आहे.

"अजमेर दर्ग्याबाबत सुरू असलेला वाद आणि विविध वाहिन्यांवर होत असलेली विविध विधाने पाहता मला येथे येऊन वस्तुस्थिती तुमच्यासमोर मांडावी लागली. मी जनतेला आवाहन करतो की, शांतता राखावी आणि असे काहीही करू नका वाद निर्माण होऊ शकतो. आम्हाला कायदेशीर अधिकार आहेत, आम्ही न्यायालयात जाऊ शकतो. जेव्हा भारत सरकार गरीब नवाज रहमतुल्ला अलैया कायदा (दर्गा ख्वाजा साहेब कायदा, १९५५) पास करत होते. त्याआधी १९५० मध्ये भारत सरकारने अलाहाबाद उच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश गुलाम हसन यांच्या अध्यक्षतेखाली दर्ग्याच्या गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. चौकशी समितीचा अहवाल सरकारकडे आहे. त्या वेळी हे सर्व 'कच्चे' होते, असे पान १८ वर स्पष्ट लिहिले आहे. गरीब नवाज रहमतुल्लाहम जेव्हा येथे आले तेव्हा ते 'कच्चा' मैदान होते आणि त्यावर त्यांची मजार बांधण्यात आली होती.  जेव्हा कबर कच्च्या जमिनीवर बांधली जाते आणि १५० वर्षे कबर कच्चीच राहते, मग त्या खाली मंदिर कसे असेल?," असा सवाल दर्गाचे  प्रमुख सय्यद जैनुल अबेदिन अली खान यांनी म्हटलं आहे.

"१९४७ पासून पंतप्रधान येथे चादर पाठवत आहेत. अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यपाल आणि आरएसएस प्रमुखांनीही येथे चादर दिली आहे. याशिवाय राजकीय पक्षांचे प्रमुख येथे चादर पाठवतात. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वतीने चादरही अर्पण केली जाते. इथली हिंदू लोकसंख्या रोज सकाळी दुकाने उघडण्याआधी इथून जाताना त्यांच्या दुकानाच्या चाव्या दर्ग्याच्या पायऱ्यांवर ठेवतात. स्त्रिया आपल्या मुलांसोबत मशिदीबाहेर उभ्या राहतात जेणेकरून जो कोणी नमाज अदा केल्यानंतर मशिदीतून जातो तो आपल्या मुलावर फुंकर मारतो जेणेकरून त्यांच्या मुलाला कोणताही आजार झाला असेल तो बरा होऊ शकेल," असेही सय्यद जैनुल अबेदिन अली खान म्हणाले. 

टॅग्स :Rajasthanराजस्थान